शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

जामखेड नगर परिषद हरकतींच्या निपटाऱ्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:28 IST

जामखेड : नगर परिषद प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणावर हरकती व सूचना आल्या आहेत. आवश्यक तेथे क्षेत्र भेटीद्वारे निर्णय ...

जामखेड : नगर परिषद प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणावर हरकती व सूचना आल्या आहेत. आवश्यक तेथे क्षेत्र भेटीद्वारे निर्णय घेण्यासाठी अधिक कालावधी लागणार आहे. त्यातच सध्या वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधीत १५ दिवसांनी वाढविला आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी १ मार्च ऐवजी १५ मार्चला प्रसिद्ध होणार आहे.

जामखेड नगर परिषदेची प्रारूप मतदार यादी १५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली होती. २२ पर्यंत हरकती व सूचना घेण्यासाठी कालावधी दिला होता. १ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. २२ तारखेपर्यंत २ हजार ६७ इतक्या हरकती नगर परिषदकडे प्राप्त झाल्या. त्यामुळे या हरकतींचा निपटारा करण्यासाठी प्रशासक अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी २१ प्रभागात तलाठी, ग्रामसेवक, नगर परिषद कर्मचारी व मतदार केंद्र प्रतिनिधी यांची नियुक्ती करून २५ फेब्रुवारीपर्यंत अहवाल देण्यास सांगितले होते.

प्रत्येक प्रभागात आलेल्या हरकती व सूचनांची दखल संबंधित नियुक्त समिती घेत नसल्याची तक्रार राहुल उगले, वसीम सय्यद, मनोज कुलकर्णी, प्रशांत राळेभात, दिगंबर चव्हाण, फिरोज बागवान, अमोल गिरमे यांनी केली. स्थळ पंचनामा करून संबंधित प्रभागात जेथे राहत असेल त्या प्रभागात मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासक जयश्री माळी यांनी हरकती व सूचनांवर आवश्यक तेथे क्षेत्र भेटीद्वारे वस्तूनिष्ठ निर्णय घेण्याकरिता अधिक कालावधी लागेल, असे सांगितले.

यावर मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी मतदार यादीत जे पत्ते आहेत, ते प्रभागनिहाय विधानसभा मतदार यादीनुसार त्या भागात आहेत त्याप्रमाणात तो माणूस त्या प्रभागात राहील, असे सुचवले; परंतु इच्छुक उमेदवारांचे समाधान झाले नाही. यावेळी अनेकांनी मागील नगर परिषदेसाठी जशी मतदार यादी आहे, त्याप्रमाणे मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली.

त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आता मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी १५ दिवस वाढवला असल्याने नियुक्त समितीचे कामकाज चालू राहील व सर्व शंकांचे निरसन होईल, असे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.