शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

जागेच्या आरक्षणात फेरबदलाचा विषय फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर : शहरातील कांदा मार्केट परिसरात १९९९मध्ये अग्निशमन विभागासाठी आरक्षित केलेल्या जागेच्या आरक्षणात फेरबदल करण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : शहरातील कांदा मार्केट परिसरात १९९९मध्ये अग्निशमन विभागासाठी आरक्षित केलेल्या जागेच्या आरक्षणात फेरबदल करण्याचा विषय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नामंजूर करण्यात आला. सरकारने संबंधित व्यक्तीला मोबदला देऊन आरक्षित केलेल्या जागेत २० वर्षांनंतर फेरबदल करण्याचे कोणतेही अधिकार पालिकेला नाहीत. तसे केल्यास नगरसेवकांना तुरुंगात जावे लागेल, अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली. त्यामुळे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना हा विषय मागे घ्यावा लागला.

पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगराध्यक्षा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली सभा सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालली. सभेतील मुख्य विषयांवर चर्चा करावी, या मागणीवरून काँग्रेस नगरसेवक बाळासाहेब गांगड व भाजप नगरसेविका भारती कांबळे यांच्यात मोठा वाद झाला. यावेळी गांगड यांना नगरसेवकांनी शांत करत खुर्चीवर बसवले. त्यानंतर वाद मिटला. शहरातील मंगल विकास झंवर यांनी आपल्या जागेवरील आरक्षणात फेरबदल करण्याचा अर्ज नगराध्यक्षा आदिक यांच्याकडे केला होता. त्यानंतर सभेपुढे तो गुरुवारी चर्चेला येताच नगरसेवक अंजूम शेख, शामलिंग शिंदे, श्रीनिवास बिहाणी यांनी त्याला जोरदार विरोध केला.

एकदा मंजूर झालेल्या योजनेत फेरबदलाचे सभेला अधिकार नाहीत. पालिकेच्या अभियंत्यांनी मूल्यमापन करून संबंधित जागा मालकाला त्याचा मोबदला दिला. त्यामुळे ती जागा पालिकेच्या नावावर झाली आहे. त्यामुळे असा विषय सभेपुढे घेऊ नये अन्यथा सर्व नगरसेवकांना तुरुंगवास भोगावा लागेल, असे अंजूम शेख म्हणाले. शहरातील एक लाख नागरिकांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन विभागाकरिता जागा आरक्षित झाली आहे. त्यामुळे एका व्यक्तीऐवजी शहरवासियांचे हित पाहावे, असे शेख म्हणाले. अशाप्रकारे आरक्षणात फेरबदल करावयाचा असेल तर सर्वच जागा खुल्या कराव्या, असे भाजपचे किरण लुणिया, दीपक चव्हाण, मुजफ्फर शेख, दिलीप नागरे यांनी सांगितले. तत्पूर्वी नगराध्यक्षा आदिक यांनी शहरातील अनेक मोक्याच्या जागा आरक्षित झाल्यामुळे काही लोकांवर अन्याय झाल्याचे सांगितले. त्यामुळे नगररचना विभागाकडे त्यात फेरबदलाचा ठराव करून पाठविण्याचे आवाहन सभेला केले होते.

-------

आमच्या मनगटात दम

एखाद्या जागेचे आरक्षण उठविणे हे काम सोपे नाही. त्याकरिता मनगटात दम असावा लागतो. खालपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कायदेशीर मार्गाने त्याकरिता प्रयत्न करावे लागतात. त्यात गैर काहीही नसते, असे शेख यांनी स्पष्ट केले.

---------