शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पाटबंधारे विभागाने वाढीव पाणीपट्टीचा पुनर्विचार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:20 IST

कोपरगाव : नाशिक पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टी आकारणीत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामासाठी पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी संदर्भात ...

कोपरगाव : नाशिक पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टी आकारणीत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामासाठी पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी संदर्भात पुनर्विचार करावा, या मागणीचे निवेदन कोपरगाव तालुक्यातील पाटपाणी लाभधारक शेतकऱ्यांनी गोदावरी डावा तट कालव्याचे कोपरगाव येथील उपकार्यकारी अभियंता यांना दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही कायम उन्हाळी आवर्तनासाठी गोदावरी कालव्यावर सात नंबर अर्ज भरून पाटपाण्याची मागणी करतो. त्यावर आकारण्यात येणारी पाणीपट्टीदेखील भरतो. परंतु, गेल्या वर्षापासून पाटबंधारे विभागामार्फत आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आम्हाला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून आकारण्यात येणारी पाणीपट्टी ही पूर्वीप्रमाणेच आकारण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर प्रवीण शिंदे, तुषार विध्वंस, अनिल लोणारी, राहुल लोणारी, अभिजीत लोणारी, विजया लोणारी, हर्षल परजणे, अमोल परजणे, राजेंद्र संवत्सरकर, भाऊसाहेब संवत्सरकर, शेखर परजणे, रंगनाथ परजणे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.