शहरं
Join us  
Trending Stories
1
हाडे तुटली, आतड्या फाटल्या, अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचा भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर
2
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
3
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
4
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
5
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
6
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
7
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
8
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
9
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
10
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
11
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
12
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
13
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
14
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
15
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
16
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
17
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
20
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा

७० हजार कोटींचे सिंचन आघाडीच्या घशात

By admin | Updated: March 20, 2024 13:05 IST

संगमनेर : गेल्या १५ वर्षांत एकाही पैशाची गुंतवणूक न झाल्याने महाराष्ट्रातील ४३ टक्के उद्योगधंदे घटले.

संगमनेर : गेल्या १५ वर्षांत एकाही पैशाची गुंतवणूक न झाल्याने महाराष्ट्रातील ४३ टक्के उद्योगधंदे घटले. काँग्रेस आघाडीवाल्यांनी ७० हजार कोटींचे सिंचन घशात घातले, अशी टीका करीत लाल दिवा हे माझं ध्येय नाही, तर माझ्या बाबांचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी उभी आहे, असे प्रतिपादन आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी केले. संगमनेर येथे शनिवारी जाणता राजा मैदानावर संघर्ष यात्रा सभेत आ. मुंडे बोलत होत्या. व्यासपीठावर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, गोविंद केंद्रे, सुरजीत ठाकूर, माजीमंत्री बबनराव पाचपुते, खासदार दिलीप गांधी, अमित पालवे उपस्थित होते. त्या म्हणाल्या, पंचायत राजपासून राजकीय पदार्पण करणारे गोपीनाथ मुंडे केंद्रीय ग्रामविकासमंत्री झाले. त्यांच्या सत्कार समारंभात भाषण करण्याची माझी इच्छा होती. पण, ३ जूनला बाबा गेले अन् मी अंध:कारात बुडाले. तुमच्यासारखी सर्वसामान्य माणसं पुढं आली म्हणून उभी राहिले. बाबांना ‘साहेब’ होण्यासाठी २० वर्षे लागली. मी १४ दिवसांत ‘ताई’ची ताईसाहेब झाले. त्यांचं स्वप्न होतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याचं. ते पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे म्हणून सगळं दु:खं बाजूला ठेवून मी तुमच्यासमोर आले आहे. गृहमंत्री म्हणून बाबांच्या काळात एकही दंगल व दहशतवादी हल्ले झाले नाहीत. आता महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्य सरकार भ्रष्टाचारावर चाललं आहे. २०१२ ला महाराष्ट्र ‘लोडशेडींग’मुक्त करण्याची आघाडीची घोषणा होती. पण ते झालेच नाही. भाजपशासीत गोवा, गुजरातसारख्या सुरक्षित राज्यांमध्ये उद्योग जात आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवून रोजगार देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी सत्ता परिवर्तनाची गरज असून हे जुलमी सरकार उलथून टाकायचे असेल तर माझ्याबरोबर मैदानात उतरण्याची तयारी ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. जानकर यांनी आमचं नातं भावनिक असून ते आयुष्यभर तोडणार नाही. स्वार्थ घेवून आलो नाही. ‘ताई’मागे भाऊ म्हणून उभा राहील. महाराष्ट्रात फक्त १५० लोकांची सत्ता आहे. इकडे थोरात व तिकडे विखेंचा पाळणा हलला तरच पालकमंत्री होतो. पाचपुते यांनी रावणाचा वध करण्यासाठी विभिषणाची भूमिका घेतली आहे, असे सांगून ‘ताई’च्या संघर्ष यात्रेद्वारे परिवर्तनातून आघाडी सरकार गाडले जाईल, अशी टीका जाणकर यांनी केली. दिलीप गांधी यांनी राज्यात महायुतीच्या २०० पेक्षा जास्त जागा येतील, असे भाकीत वर्तविले. याप्रसंगी विठ्ठल शिंदे, राधावल्लभ कासट, ज्ञानेश्वर कर्पे, राजेश चौधरी, प्रा. सुभाष गीते, अशोक रागीर, संजय नाकिल, साहेबराव नवले, बाबासाहेब कुटे, कैलास वाक्चौरे, अमर कतारी, संजय फड आदींसह भाजप, सेना व आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)