शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

७० हजार कोटींचे सिंचन आघाडीच्या घशात

By admin | Updated: March 20, 2024 13:05 IST

संगमनेर : गेल्या १५ वर्षांत एकाही पैशाची गुंतवणूक न झाल्याने महाराष्ट्रातील ४३ टक्के उद्योगधंदे घटले.

संगमनेर : गेल्या १५ वर्षांत एकाही पैशाची गुंतवणूक न झाल्याने महाराष्ट्रातील ४३ टक्के उद्योगधंदे घटले. काँग्रेस आघाडीवाल्यांनी ७० हजार कोटींचे सिंचन घशात घातले, अशी टीका करीत लाल दिवा हे माझं ध्येय नाही, तर माझ्या बाबांचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी उभी आहे, असे प्रतिपादन आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी केले. संगमनेर येथे शनिवारी जाणता राजा मैदानावर संघर्ष यात्रा सभेत आ. मुंडे बोलत होत्या. व्यासपीठावर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, गोविंद केंद्रे, सुरजीत ठाकूर, माजीमंत्री बबनराव पाचपुते, खासदार दिलीप गांधी, अमित पालवे उपस्थित होते. त्या म्हणाल्या, पंचायत राजपासून राजकीय पदार्पण करणारे गोपीनाथ मुंडे केंद्रीय ग्रामविकासमंत्री झाले. त्यांच्या सत्कार समारंभात भाषण करण्याची माझी इच्छा होती. पण, ३ जूनला बाबा गेले अन् मी अंध:कारात बुडाले. तुमच्यासारखी सर्वसामान्य माणसं पुढं आली म्हणून उभी राहिले. बाबांना ‘साहेब’ होण्यासाठी २० वर्षे लागली. मी १४ दिवसांत ‘ताई’ची ताईसाहेब झाले. त्यांचं स्वप्न होतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याचं. ते पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे म्हणून सगळं दु:खं बाजूला ठेवून मी तुमच्यासमोर आले आहे. गृहमंत्री म्हणून बाबांच्या काळात एकही दंगल व दहशतवादी हल्ले झाले नाहीत. आता महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्य सरकार भ्रष्टाचारावर चाललं आहे. २०१२ ला महाराष्ट्र ‘लोडशेडींग’मुक्त करण्याची आघाडीची घोषणा होती. पण ते झालेच नाही. भाजपशासीत गोवा, गुजरातसारख्या सुरक्षित राज्यांमध्ये उद्योग जात आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवून रोजगार देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी सत्ता परिवर्तनाची गरज असून हे जुलमी सरकार उलथून टाकायचे असेल तर माझ्याबरोबर मैदानात उतरण्याची तयारी ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. जानकर यांनी आमचं नातं भावनिक असून ते आयुष्यभर तोडणार नाही. स्वार्थ घेवून आलो नाही. ‘ताई’मागे भाऊ म्हणून उभा राहील. महाराष्ट्रात फक्त १५० लोकांची सत्ता आहे. इकडे थोरात व तिकडे विखेंचा पाळणा हलला तरच पालकमंत्री होतो. पाचपुते यांनी रावणाचा वध करण्यासाठी विभिषणाची भूमिका घेतली आहे, असे सांगून ‘ताई’च्या संघर्ष यात्रेद्वारे परिवर्तनातून आघाडी सरकार गाडले जाईल, अशी टीका जाणकर यांनी केली. दिलीप गांधी यांनी राज्यात महायुतीच्या २०० पेक्षा जास्त जागा येतील, असे भाकीत वर्तविले. याप्रसंगी विठ्ठल शिंदे, राधावल्लभ कासट, ज्ञानेश्वर कर्पे, राजेश चौधरी, प्रा. सुभाष गीते, अशोक रागीर, संजय नाकिल, साहेबराव नवले, बाबासाहेब कुटे, कैलास वाक्चौरे, अमर कतारी, संजय फड आदींसह भाजप, सेना व आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)