शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

तनपुरेंना बदनाम करण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:20 IST

राहुरी : राज्यमंत्री तनपुरे हे अतिशय संयमी, सभ्य, सुसंस्कृत असून त्यांची व त्यांच्या कुटुंबाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यांचा ...

राहुरी : राज्यमंत्री तनपुरे हे अतिशय संयमी, सभ्य, सुसंस्कृत असून त्यांची व त्यांच्या कुटुंबाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यांचा पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणात काडीचाही संबंध नाही. परंतु, या हत्येचे राजकीय भांडवल करुन तनपुरे यांना बदनाम करण्याचा डाव भाजपच्या नेत्यांनी मांडला आहे. तनपुरे यांच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे व नैराश्येतून केले असल्याचे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी सांगितले.

ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्याने भाजप नेते सैरभैर झाले आहेत. त्याची अवस्था ना घाट का, ना घर का अशी झाली आहे. त्यातच राहुरीचे विधानसभा सदस्य प्राजक्त तनपुरे हे विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून गेले व मंत्रिमंडळात लगेच राज्यमंत्री पद मिळाल्याने स्थानिक भाजप नेत्यांना त्यांची पोटदुखी झाली. तनपुरेंचा राज्याच्या राजकारणातील वाढता उत्कर्ष या भाजपच्या नेत्यांना पाहावत नाही. त्यामुळेच त्यांनी असे बिनबुडाचे आरोप करुन तनपुरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सर्वसामान्य नागरिक आज कोरोनामुळे अडचणीत असून याच्याशी या भाजपला व त्यांच्या पुढाऱ्यांना कोणतेही देणे घेणे नाही. फक्त राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच भाजपचे कटकारस्थान सुरु आहे. परंतु भाजप व त्याच्या पुढाऱ्यांना जनता ओळखून आहे. त्याच्या भूलथापांना सामान्य जनता कधीच बळी पडणार नाही, असे मत मापारी यांनी व्यक्त केले.