शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

तनपुरेंना बदनाम करण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:20 IST

राहुरी : राज्यमंत्री तनपुरे हे अतिशय संयमी, सभ्य, सुसंस्कृत असून त्यांची व त्यांच्या कुटुंबाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यांचा ...

राहुरी : राज्यमंत्री तनपुरे हे अतिशय संयमी, सभ्य, सुसंस्कृत असून त्यांची व त्यांच्या कुटुंबाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यांचा पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणात काडीचाही संबंध नाही. परंतु, या हत्येचे राजकीय भांडवल करुन तनपुरे यांना बदनाम करण्याचा डाव भाजपच्या नेत्यांनी मांडला आहे. तनपुरे यांच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे व नैराश्येतून केले असल्याचे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी सांगितले.

ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्याने भाजप नेते सैरभैर झाले आहेत. त्याची अवस्था ना घाट का, ना घर का अशी झाली आहे. त्यातच राहुरीचे विधानसभा सदस्य प्राजक्त तनपुरे हे विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून गेले व मंत्रिमंडळात लगेच राज्यमंत्री पद मिळाल्याने स्थानिक भाजप नेत्यांना त्यांची पोटदुखी झाली. तनपुरेंचा राज्याच्या राजकारणातील वाढता उत्कर्ष या भाजपच्या नेत्यांना पाहावत नाही. त्यामुळेच त्यांनी असे बिनबुडाचे आरोप करुन तनपुरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सर्वसामान्य नागरिक आज कोरोनामुळे अडचणीत असून याच्याशी या भाजपला व त्यांच्या पुढाऱ्यांना कोणतेही देणे घेणे नाही. फक्त राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच भाजपचे कटकारस्थान सुरु आहे. परंतु भाजप व त्याच्या पुढाऱ्यांना जनता ओळखून आहे. त्याच्या भूलथापांना सामान्य जनता कधीच बळी पडणार नाही, असे मत मापारी यांनी व्यक्त केले.