शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

कोरोनाबाबत जिल्ह्यात कुचकामी उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:22 IST

अहमदनगर : तालुकानिहाय दौऱ्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव का वाढत आहे, याबाबत अवलोकन केले. औषधे, उपचार आणि उपाययोजना यामध्ये कोणतीही सुसूत्रता ...

अहमदनगर : तालुकानिहाय दौऱ्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव का वाढत आहे, याबाबत अवलोकन केले. औषधे, उपचार आणि उपाययोजना यामध्ये कोणतीही सुसूत्रता नसल्यानेच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपाययोजना कुचकामी ठरत असून साधी औषधी देखील उपलब्ध नसल्याचे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात मांडले आहे.

मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गेल्या दोन आठवड्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय दौरे करून कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. तेथील स्थानिक अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशीही चर्चा केल्याने स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात आली. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव, त्यासाठी केले जाणारे उपचार, उपाय याबाबत थोरात यांनी अवलोकन केले असून परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे गरजेचे असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सदरचे पत्र थोरात यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांना पाठविल्यानंतर ते ट्वीटही केले आहे.

संशयितांचे स्वॅब घेतल्यानंतर त्याचा चाचणी अहवाल येण्यासाठी किमान २४ ते ४८ तासांचा अवधी लागतो. या काळात स्वॅब दिलेल्या रुग्णांचे विलगीकरण केले जात नाही. अनेक तालुक्यांमध्ये रॅपिड अँटिजेन टेस्ट किटही उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये रुग्णांच्या चाचण्या न झाल्याने, रुग्णांच्या संख्येत घट दिसून येते. खरे तर वस्तुस्थिती तशी नाही. कोरोना पॉझिटिव्ह आलेले ८५ टक्के रुग्ण निव्वळ विलगीकरणातून बरे होऊ शकतात. परंतु त्यासाठी आवश्यक औषधे सहजपणे शासकीय रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये सद्य स्थितीत उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांची परिस्थिती खालावून त्यांना पुढील उपचार देणे गरजेचे ठरते. तरी सदर औषधे उपलब्ध होण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. नागरिकांमध्ये लक्षणे दिसल्यानंतर एचआरसीटी चाचणी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. पर्यायाने स्कॅनिंग सेंटरवर गर्दी वाढू लागली आहे. ही ठिकाणे कोरोना वाढीस कारणीभूत ठरत आहेत.

---

एचआरसीटी-रेमडेसिविरबाबत धोरण हवे

रुग्णालयात दाखल करताना डॉक्टर एचआरसीटीच्या अहवालाचा आग्रह धरतात. याबाबत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एचआरसीटी न करणे व आवश्यकता नसताना एचआरसीटी करायला न लावणे याबाबत धोरण ठरविणे आवश्यक आहे. अनेक डॉक्टर रुग्णांना आवश्यकता नसतानाही, रेमडेसिविर इंजेक्शनचा आग्रह धरताना दिसतात. याबाबतही राज्यस्तरावर रेमडेसिविर वापराबाबत स्पष्ट निर्देश वैद्यकीय व्यावसायिकांना देणे आवश्यक आहे, असे थोरात यांनी या पत्रात म्हटले आहे.