शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

राष्ट्रपदी पदक विजेत्याची उपेक्षा

By admin | Updated: July 11, 2016 00:59 IST

साहेबराव नरसाळे - अहमदनगर कळसुबाई शिखराच्या पायथ्याला असणाऱ्या जंगलात ठकाबाबा गांगड यांनी आयुष्य खर्ची घालून निसर्गाची भाषा अवगत केली़

साहेबराव नरसाळे - अहमदनगरकळसुबाई शिखराच्या पायथ्याला असणाऱ्या जंगलात ठकाबाबा गांगड यांनी आयुष्य खर्ची घालून निसर्गाची भाषा अवगत केली़ अनेक पशु-पक्ष्यांचे हुबेहूब आवाजही ते काढतात़ आदिवासी कलेच्या उद्धारासाठी झटणारे ठकाबाबा गांगड यांना केंद्र सरकारने राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविले. महाराष्ट्र सरकारनेही सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरविले. मात्र, आता वृद्धापकाळात या कलाकारावर भाकरीच्या शोधात कर्जबाजारी होण्याची वेळ ओढावली आहे.अकोले तालुक्यातील उडदावणे हे २३०० लोकसंख्येचे गाव. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कळसुबाई शिखराच्या पायथ्याला हे गाव वसले आहे. पावसाळ्यात फेसाळणारे धबधबे, उंचच उंच पर्वतराजी आणि हिरवाईने नटलेला परिसर अशी निसर्ग संपन्नता या गावाला लाभली आहे. या गावातील आदिवासी कुटुंबात ठकाबाबांचा जन्म झाला. गावातच खडकाळ माळरानावर ३ एकर शेती आहे. पण पाणी नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर केवळ भाताचे एक पीक वगळता काहीही पिकत नाही. घरात सात माणसं आहेत. उपजीविकेचे दुसरे साधनही नाही. त्यामुळे ठकाबाबांनी आपल्यातील कला जगासमोर ठेवली. या कलेतून चार पैसे मिळत गेले. राष्ट्रपती, पंतप्रधान यांनीही ठकाबाबांच्या कलेचा गौरव केला. अनेक संस्थांनी ठकाबाबांना पुरस्कार देऊन गौरविले. राष्ट्रपतींनी सुवर्ण पदक देऊन ठकाबाबांच्या कलेला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवले. सह्याद्रीच्या डोंगररांगात रोरावणारा वारा, धुवाँधार कोसळणारा पाऊस, फेसाळलेले धबधबे, ओढेनाल्यांचा खळखळाट, बिबट्यांच्या डरकाळ्या, मोरांचे केकाटणे, कुत्र्यांचे भुंकणे आणि भांडणे, कावळ्यांची कावकाव रोजच त्यांच्या कानी पडायची. जंगलात गुरे चारताना ठकाबाबांना पशु-पक्ष्यांच्या आवाजाला प्रतिसाद देण्याची सवय लागली आणि तेही पशू-पक्षांचा आवाज हुबेहूब काढू लागले. आदिवासी गाण्यांवर ठकाबाबा झक्कास ठेका धरायचे. दिल्ली येथे १९६५ सालच्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या कार्यक्रमात ठकाबाबांच्या पथकाने महाराष्ट्रातून आदिवासी कलेचे प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या कार्यक्रमाने देशात प्रथम क्रमांक पटकावला. तत्कालीन राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या हस्ते ठकाबाबा राष्ट्रपती सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. २००५ साली महाराष्ट्र सरकारनेही त्यांना सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरविले. अनेक संस्थांनी ठकाबाबांच्या कलेचा गौरव केला. ठकाबाबा सेलिब्रिटी झाले. त्यामुळे त्यांना आदिवासी वेशभूषा सोडून निटनेटके राहणीमान अंगिकारावे लागले. त्यासाठीचा खर्च करण्यासाठी ठकाबाबांना कर्ज काढावे लागले. राज्यभरात आणि इतर राज्यातही ठकाबाबांना मागणी वाढू लागली. मात्र, कलेचा प्रसार आणि प्रचार होतोय, या उद्देशाने ठकाबाबांनी जाण्या-येण्यासह किरकोळ मानधन स्विकारले. त्यांनी काढलेल्या वाघाच्या डरकाळीने अनेकांची चाळण उडाली. मात्र, आदिवासी कलेचा हा वाघ आता थकलाय. १९३२ साली जन्मलेले ठकाबाबा आता ८४ वर्षांचे आहेत. आता त्यांचे हातपाय थरथरतात.तरीही पशु-पक्ष्यांचे आवाज पूर्वीसारखेच काढतात़ कोणीही पर्यटक आला की सांगेल त्या पशु-पक्ष्याचा आवाज काढायचा, कोणाकडेही एक रुपयाही मागायचा नाही, घरी आलेल्या पाहुण्यांना विनाचहाचे जाऊ द्यायचे नाही, असा त्यांचा दंडक़ त्यामुळे बँकेचे कर्ज दिवसेंदिवस वाढत आहे. शेतात काही पिकत नाही अन् खायला सात तोंडं. त्यामुळे किरकोळ स्वरुपात आलेला भात अवघ्या काही दिवसात संपून जातो.उर्वरित महिने जगण्यासाठी धान्यासह इतर सर्वकाही विकत घ्यावे लागते. बँकेच्या कर्जाचे हप्तेही वर्षानुवर्षे थकीत राहतात. बँक कर्जफेडीसाठी तगादा लावीत आहे. त्यांच्या घरात अनेक पुरस्काराचे कागदपत्र मांडले आहेत. मात्र, हे कागद खायला देत असते तर किती बरे झाले असते, अशी खंत ठकाबाबा व्यक्त करतात. मंत्र्यांची आश्वासनेही विरलीअनेक मंत्री, मोठे अधिकारी अशा अनेकांनी ठकाबाबांची पाठ थोपटली, माहितीही नेली. कलाकाराचे मानधन देऊ असे आश्वासन दिले. पण अद्याप त्यांना मानधन मिळाले नाही. ठकाबाबांना मानधन मिळावे, यासाठी त्यांचा मुलगा सखाराम हा सरकारच्या पायऱ्या झिजवतोय. अद्याप सरकारने या कलाकाराला मानधन सुरु केले नाही. ज्यांचा वशिला असतो त्यांनी साठी ओलांडली की मानधन सुरु, इतर योजनांचा लाभही त्यांनाच दिला जातो. मात्र, ठकाबाबांचे वय ८४ वर्षे झाले आहे, तरीही सरकारच्या आश्वासनाशिवाय त्यांना काहीही मिळालेले नाही.