शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपदी पदक विजेत्याची उपेक्षा

By admin | Updated: July 11, 2016 00:59 IST

साहेबराव नरसाळे - अहमदनगर कळसुबाई शिखराच्या पायथ्याला असणाऱ्या जंगलात ठकाबाबा गांगड यांनी आयुष्य खर्ची घालून निसर्गाची भाषा अवगत केली़

साहेबराव नरसाळे - अहमदनगरकळसुबाई शिखराच्या पायथ्याला असणाऱ्या जंगलात ठकाबाबा गांगड यांनी आयुष्य खर्ची घालून निसर्गाची भाषा अवगत केली़ अनेक पशु-पक्ष्यांचे हुबेहूब आवाजही ते काढतात़ आदिवासी कलेच्या उद्धारासाठी झटणारे ठकाबाबा गांगड यांना केंद्र सरकारने राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविले. महाराष्ट्र सरकारनेही सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरविले. मात्र, आता वृद्धापकाळात या कलाकारावर भाकरीच्या शोधात कर्जबाजारी होण्याची वेळ ओढावली आहे.अकोले तालुक्यातील उडदावणे हे २३०० लोकसंख्येचे गाव. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कळसुबाई शिखराच्या पायथ्याला हे गाव वसले आहे. पावसाळ्यात फेसाळणारे धबधबे, उंचच उंच पर्वतराजी आणि हिरवाईने नटलेला परिसर अशी निसर्ग संपन्नता या गावाला लाभली आहे. या गावातील आदिवासी कुटुंबात ठकाबाबांचा जन्म झाला. गावातच खडकाळ माळरानावर ३ एकर शेती आहे. पण पाणी नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर केवळ भाताचे एक पीक वगळता काहीही पिकत नाही. घरात सात माणसं आहेत. उपजीविकेचे दुसरे साधनही नाही. त्यामुळे ठकाबाबांनी आपल्यातील कला जगासमोर ठेवली. या कलेतून चार पैसे मिळत गेले. राष्ट्रपती, पंतप्रधान यांनीही ठकाबाबांच्या कलेचा गौरव केला. अनेक संस्थांनी ठकाबाबांना पुरस्कार देऊन गौरविले. राष्ट्रपतींनी सुवर्ण पदक देऊन ठकाबाबांच्या कलेला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवले. सह्याद्रीच्या डोंगररांगात रोरावणारा वारा, धुवाँधार कोसळणारा पाऊस, फेसाळलेले धबधबे, ओढेनाल्यांचा खळखळाट, बिबट्यांच्या डरकाळ्या, मोरांचे केकाटणे, कुत्र्यांचे भुंकणे आणि भांडणे, कावळ्यांची कावकाव रोजच त्यांच्या कानी पडायची. जंगलात गुरे चारताना ठकाबाबांना पशु-पक्ष्यांच्या आवाजाला प्रतिसाद देण्याची सवय लागली आणि तेही पशू-पक्षांचा आवाज हुबेहूब काढू लागले. आदिवासी गाण्यांवर ठकाबाबा झक्कास ठेका धरायचे. दिल्ली येथे १९६५ सालच्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या कार्यक्रमात ठकाबाबांच्या पथकाने महाराष्ट्रातून आदिवासी कलेचे प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या कार्यक्रमाने देशात प्रथम क्रमांक पटकावला. तत्कालीन राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या हस्ते ठकाबाबा राष्ट्रपती सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. २००५ साली महाराष्ट्र सरकारनेही त्यांना सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरविले. अनेक संस्थांनी ठकाबाबांच्या कलेचा गौरव केला. ठकाबाबा सेलिब्रिटी झाले. त्यामुळे त्यांना आदिवासी वेशभूषा सोडून निटनेटके राहणीमान अंगिकारावे लागले. त्यासाठीचा खर्च करण्यासाठी ठकाबाबांना कर्ज काढावे लागले. राज्यभरात आणि इतर राज्यातही ठकाबाबांना मागणी वाढू लागली. मात्र, कलेचा प्रसार आणि प्रचार होतोय, या उद्देशाने ठकाबाबांनी जाण्या-येण्यासह किरकोळ मानधन स्विकारले. त्यांनी काढलेल्या वाघाच्या डरकाळीने अनेकांची चाळण उडाली. मात्र, आदिवासी कलेचा हा वाघ आता थकलाय. १९३२ साली जन्मलेले ठकाबाबा आता ८४ वर्षांचे आहेत. आता त्यांचे हातपाय थरथरतात.तरीही पशु-पक्ष्यांचे आवाज पूर्वीसारखेच काढतात़ कोणीही पर्यटक आला की सांगेल त्या पशु-पक्ष्याचा आवाज काढायचा, कोणाकडेही एक रुपयाही मागायचा नाही, घरी आलेल्या पाहुण्यांना विनाचहाचे जाऊ द्यायचे नाही, असा त्यांचा दंडक़ त्यामुळे बँकेचे कर्ज दिवसेंदिवस वाढत आहे. शेतात काही पिकत नाही अन् खायला सात तोंडं. त्यामुळे किरकोळ स्वरुपात आलेला भात अवघ्या काही दिवसात संपून जातो.उर्वरित महिने जगण्यासाठी धान्यासह इतर सर्वकाही विकत घ्यावे लागते. बँकेच्या कर्जाचे हप्तेही वर्षानुवर्षे थकीत राहतात. बँक कर्जफेडीसाठी तगादा लावीत आहे. त्यांच्या घरात अनेक पुरस्काराचे कागदपत्र मांडले आहेत. मात्र, हे कागद खायला देत असते तर किती बरे झाले असते, अशी खंत ठकाबाबा व्यक्त करतात. मंत्र्यांची आश्वासनेही विरलीअनेक मंत्री, मोठे अधिकारी अशा अनेकांनी ठकाबाबांची पाठ थोपटली, माहितीही नेली. कलाकाराचे मानधन देऊ असे आश्वासन दिले. पण अद्याप त्यांना मानधन मिळाले नाही. ठकाबाबांना मानधन मिळावे, यासाठी त्यांचा मुलगा सखाराम हा सरकारच्या पायऱ्या झिजवतोय. अद्याप सरकारने या कलाकाराला मानधन सुरु केले नाही. ज्यांचा वशिला असतो त्यांनी साठी ओलांडली की मानधन सुरु, इतर योजनांचा लाभही त्यांनाच दिला जातो. मात्र, ठकाबाबांचे वय ८४ वर्षे झाले आहे, तरीही सरकारच्या आश्वासनाशिवाय त्यांना काहीही मिळालेले नाही.