शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

फेज-२ च्या लाइनवर घरे, विद्युत खांब, ड्रेनेजलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:14 IST

अहमदनगर : महापालिकेच्या शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत नागापूर बोल्हेगाव परिसरात टाकलेल्या जलवाहिनीवर पक्की घरे, विद्युत खांब, तर काही ...

अहमदनगर : महापालिकेच्या शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत नागापूर बोल्हेगाव परिसरात टाकलेल्या जलवाहिनीवर पक्की घरे, विद्युत खांब, तर काही ठिकाणी ड्रेनेजलाइन टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे फेज-२ योजना वापरात येते की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

महापालिकेने शहर सुधारित पाणीपुरवठा योजना राबविली. योजनेचे काम सुरू होऊन सात वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला. मुळा धरण ते वसंत टेकडीसह जलकुंभाचे काम पूर्ण झाल्याने ठेकेदाराकडून आता शहरातील वितरण व्यवस्थेच्या चाचणीचे काम हाती घेतले गेले आहे. बोल्हेगाव परिसरातील जलकुंभाचे पाणी जलवाहिनीत सोडून ही चाचणी घेतली जात असताना अनेक धक्कादायक प्रकार समाेर येऊ लागले आहेत. ही जलवाहिनी रस्त्यांच्या बाजूने टाकण्यात आलेली होती; परंतु त्यावर आता पक्की घरे उभी राहिली आहेत. तसेच रस्त्यांच्या बाजूने विद्युत खांब उभे केले गेले. हे खांब जलवाहिनी फोडून त्यात उभे गेल्याने वास्तव समोर आले आहे. त्यामुळे जलवाहिनीला ठिकठिकाणी छिद्रे पडली आहेत. यातून अक्षरश: पाणी उकळ्या मारत असल्याचे चित्र आहे. सात वर्षांनंतर ठेकेदाराने प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात केली; परंतु जलवाहिनीच ठिकठिकाणी तुटल्याने जलकुंभाचे पाणी नळापर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत.

फेज-२ योजनेंतर्गत टाकलेल्या जलवाहिन्यांची चाचणी मुकुंदनगर, शांतीनगर आदी भागांत चाचणी सुरू करण्यात आली आहे. जलवाहिनी टाकून सात वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला. गेल्या सात वर्षांत अनेक बदल झाले. रस्ते, भुयारी गटार, विद्युत खांब, यासह रस्त्यांच्या बाजूने नवीन इमारती उभ्या राहिल्या. जलवाहिन्या या कामांमुळे खाली दबल्या. अनेक ठिकाणी तर आता जलवाहिन्याही सापडत नाहीत. एका बाजने पाणी सोडल्यानंतर ते दुसऱ्या बाजूने बाहेर येत नाही. ते मध्येच पडलेल्या छिद्राद्वारे बाहेर येत असून, काहींच्या घरातूनही पाणी बाहेर येत असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे पाणी योजनेला अनेक ठिकाणी मुगारे पडले असून, योजना कार्यान्वित होण्याआधीच तिला गळती लागली असल्याचे एका ठेकेदाराने खासगीत बोलताना सांगितले.

....

योजना हस्तांतरण लांबणीवर

फेज-२ योजना ठेकेदाराकडून ताब्यात घेताना चाचणी यशस्वी झाल्याची खात्री करणे गरजेचे झाले आहे. शहरात ५६५ कि.मी. इतक्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या असून, ही योजना कार्यान्वित होण्याआधीच तिला गळती लागली असून, भविष्यात आणखी गंभीर प्रश्न यामुळे निर्माण होणार आहेत.