शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

फेज-२ च्या लाइनवर घरे, विद्युत खांब, ड्रेनेजलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:14 IST

अहमदनगर : महापालिकेच्या शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत नागापूर बोल्हेगाव परिसरात टाकलेल्या जलवाहिनीवर पक्की घरे, विद्युत खांब, तर काही ...

अहमदनगर : महापालिकेच्या शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत नागापूर बोल्हेगाव परिसरात टाकलेल्या जलवाहिनीवर पक्की घरे, विद्युत खांब, तर काही ठिकाणी ड्रेनेजलाइन टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे फेज-२ योजना वापरात येते की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

महापालिकेने शहर सुधारित पाणीपुरवठा योजना राबविली. योजनेचे काम सुरू होऊन सात वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला. मुळा धरण ते वसंत टेकडीसह जलकुंभाचे काम पूर्ण झाल्याने ठेकेदाराकडून आता शहरातील वितरण व्यवस्थेच्या चाचणीचे काम हाती घेतले गेले आहे. बोल्हेगाव परिसरातील जलकुंभाचे पाणी जलवाहिनीत सोडून ही चाचणी घेतली जात असताना अनेक धक्कादायक प्रकार समाेर येऊ लागले आहेत. ही जलवाहिनी रस्त्यांच्या बाजूने टाकण्यात आलेली होती; परंतु त्यावर आता पक्की घरे उभी राहिली आहेत. तसेच रस्त्यांच्या बाजूने विद्युत खांब उभे केले गेले. हे खांब जलवाहिनी फोडून त्यात उभे गेल्याने वास्तव समोर आले आहे. त्यामुळे जलवाहिनीला ठिकठिकाणी छिद्रे पडली आहेत. यातून अक्षरश: पाणी उकळ्या मारत असल्याचे चित्र आहे. सात वर्षांनंतर ठेकेदाराने प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात केली; परंतु जलवाहिनीच ठिकठिकाणी तुटल्याने जलकुंभाचे पाणी नळापर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत.

फेज-२ योजनेंतर्गत टाकलेल्या जलवाहिन्यांची चाचणी मुकुंदनगर, शांतीनगर आदी भागांत चाचणी सुरू करण्यात आली आहे. जलवाहिनी टाकून सात वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला. गेल्या सात वर्षांत अनेक बदल झाले. रस्ते, भुयारी गटार, विद्युत खांब, यासह रस्त्यांच्या बाजूने नवीन इमारती उभ्या राहिल्या. जलवाहिन्या या कामांमुळे खाली दबल्या. अनेक ठिकाणी तर आता जलवाहिन्याही सापडत नाहीत. एका बाजने पाणी सोडल्यानंतर ते दुसऱ्या बाजूने बाहेर येत नाही. ते मध्येच पडलेल्या छिद्राद्वारे बाहेर येत असून, काहींच्या घरातूनही पाणी बाहेर येत असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे पाणी योजनेला अनेक ठिकाणी मुगारे पडले असून, योजना कार्यान्वित होण्याआधीच तिला गळती लागली असल्याचे एका ठेकेदाराने खासगीत बोलताना सांगितले.

....

योजना हस्तांतरण लांबणीवर

फेज-२ योजना ठेकेदाराकडून ताब्यात घेताना चाचणी यशस्वी झाल्याची खात्री करणे गरजेचे झाले आहे. शहरात ५६५ कि.मी. इतक्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या असून, ही योजना कार्यान्वित होण्याआधीच तिला गळती लागली असून, भविष्यात आणखी गंभीर प्रश्न यामुळे निर्माण होणार आहेत.