शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

आग लागू बेघर झालेल्या कुटुंबांना मिळाला हक्काचा निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:19 IST

मागील बारा दिवसापूर्वी कोंभाळणे येथील चार आदिवासी ठाकर कुटुंबीयांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि ही चारही कुटुंब बेघर ...

मागील बारा दिवसापूर्वी कोंभाळणे येथील चार आदिवासी ठाकर कुटुंबीयांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि ही चारही कुटुंब बेघर झाली होती. या चारही कुटुंबांना अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली. कुणी अन्नधान्य तर कोणी इतर साहित्य दिले. शासनाने ही पंचनामा करत मदत देण्याचे जाहीर केले. मात्र सरकारी काम आणि चार दिवस थांब या म्हणीप्रमाणे कागदपत्रे फिरत आहे. अन्नधान्याची सोय झाली होती. मात्र या बेघर कुटुंबांना निवारा आवश्यक होता. ही बाब पिचड आणि वीरगाव येथील स्वर्गीय आनंद दिघे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व अमृत सागर दूध संस्थेचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांनी हेरली. पिचड यांच्या सूचनेनुसार वाकचौरे यांनी या अपघातग्रस्त कुटुंबांना एकूण ८०० चौरस फुटाची लोखंडी शेड पाडव्यापर्यंत उभी करू, असा मानस व्यक्त केला.

त्यादृष्टीने रावसाहेब वाकचौरे यांनी नियोजन करत या चारही कुटुंबांना हक्काचा निवारा उभारून दिला. गुढीपाडव्याच्या दिवशी संसार उपयोगी साहित्य, कपडे देऊन पिचड यांच्या हस्ते गुढी उभारून या कुटुंबाला गोड जेवण देण्यात येणार आहे.

पिचड यांनी या अगोदर २१ हजार रूपये रोख, ताडपत्री, किराणा व धान्य दिलेले आहे. नंतर वाकचौरे व त्यांच्या मित्रमंडळाने हक्काचा निवारा उभा केला. यात वीरगावचे उपसरपंच संजय थोरात, दत्ता भागडे, शांताराम तोरमल यांनी सहकार्य केले.