शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

By admin | Updated: March 2, 2015 13:18 IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. या अपयशासाठी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. या आजाराने राज्यात झालेले मृत्यू आणि रुग्णांची वाढती संख्या हे आरोग्य विभागाच्या यंत्रणेचे मोठे अपयश असल्याने बेजबाबदार अधिकार्‍यांना तातडीने निलंबित करावे आणि आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 
राज्यात सर्वत्रच स्वाईन फ्लूचा आजार मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांत यातून झालेल्या मृत्यूंची संख्या पाहता लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक औषधांचा आणि लसींचा तुटवडा जाणवत आहे. शासकीय रुग्णालयातून, प्राथमिक आरोग्य केंद्रातून रूग्णांना योग्य तो सल्ला मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तरीही आरोग्य विभागाचे अधिकारी याबाबत गंभीर नाही. त्यांची निष्क्रियता यातून समोर आली असल्याचे विखे यांनी सांगितले. 
स्वाईन फ्ल्यूचे गांभीर्य लक्षात घेऊन या विभागातील संचालक, उपसंचालकांनी अद्याप कुठेही दौरे केलेले नाहीत. या आजारासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या संदर्भातही त्यांनी माहिती जाणून घेतली नाही. 
या त्यांच्या बेजबाबदारपणामुळेच स्वाईन फ्ल्यूच्या आजाराची नेमकी वस्तुस्थिती समोर येऊ शकलेली नाही. 
अधिकार्‍यांचा हा बेजबाबदारपणा लक्षात घेऊन त्यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनीही या आजाराबाबत पाहिजे तेवढे गांभीर्य दाखविले नाही. अधिकार्‍यांना पाठिशी घालण्याचे कामच त्यांच्याकडून झाले असल्याने त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी विखे यांनी केली. (प्रतिनिधी)
 
■ स्वाईन फ्लूच्या आजाराबाबत आवश्यक असणारी औषधे आणि लस यांची उपलब्धता शासनाने ताताडीने करून द्यावी. राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या माध्यमातून जोडण्यात आलेल्या सर्व रुग्णालयांत या औषधाचा पुरवठा करावा आणि स्वतंत्र कक्ष उभारून शासकीय रुग्णालयातून योग्य ती मदत नागरिकांना मिळण्याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही विखे यांनी केली आहे.
नुकसानीचे पंचनामे करा
■ राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने मोठय़ा प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना मदतीबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही विखे यांनी केली आहे. या नुकसानीसंदर्भात आपण लवकरच राज्याचा दौरा करणार असून, यासंदर्भात सविस्तर निवेदन काँग्रेसतर्फे मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल, असेही विखे म्हणाले.