शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

By admin | Updated: March 2, 2015 13:18 IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. या अपयशासाठी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. या आजाराने राज्यात झालेले मृत्यू आणि रुग्णांची वाढती संख्या हे आरोग्य विभागाच्या यंत्रणेचे मोठे अपयश असल्याने बेजबाबदार अधिकार्‍यांना तातडीने निलंबित करावे आणि आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 
राज्यात सर्वत्रच स्वाईन फ्लूचा आजार मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांत यातून झालेल्या मृत्यूंची संख्या पाहता लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक औषधांचा आणि लसींचा तुटवडा जाणवत आहे. शासकीय रुग्णालयातून, प्राथमिक आरोग्य केंद्रातून रूग्णांना योग्य तो सल्ला मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तरीही आरोग्य विभागाचे अधिकारी याबाबत गंभीर नाही. त्यांची निष्क्रियता यातून समोर आली असल्याचे विखे यांनी सांगितले. 
स्वाईन फ्ल्यूचे गांभीर्य लक्षात घेऊन या विभागातील संचालक, उपसंचालकांनी अद्याप कुठेही दौरे केलेले नाहीत. या आजारासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या संदर्भातही त्यांनी माहिती जाणून घेतली नाही. 
या त्यांच्या बेजबाबदारपणामुळेच स्वाईन फ्ल्यूच्या आजाराची नेमकी वस्तुस्थिती समोर येऊ शकलेली नाही. 
अधिकार्‍यांचा हा बेजबाबदारपणा लक्षात घेऊन त्यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनीही या आजाराबाबत पाहिजे तेवढे गांभीर्य दाखविले नाही. अधिकार्‍यांना पाठिशी घालण्याचे कामच त्यांच्याकडून झाले असल्याने त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी विखे यांनी केली. (प्रतिनिधी)
 
■ स्वाईन फ्लूच्या आजाराबाबत आवश्यक असणारी औषधे आणि लस यांची उपलब्धता शासनाने ताताडीने करून द्यावी. राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या माध्यमातून जोडण्यात आलेल्या सर्व रुग्णालयांत या औषधाचा पुरवठा करावा आणि स्वतंत्र कक्ष उभारून शासकीय रुग्णालयातून योग्य ती मदत नागरिकांना मिळण्याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही विखे यांनी केली आहे.
नुकसानीचे पंचनामे करा
■ राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने मोठय़ा प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना मदतीबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही विखे यांनी केली आहे. या नुकसानीसंदर्भात आपण लवकरच राज्याचा दौरा करणार असून, यासंदर्भात सविस्तर निवेदन काँग्रेसतर्फे मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल, असेही विखे म्हणाले.