शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

‘लोकमत’चा ग्राऊंड रिपोर्ट : विमान उडाले, पण निळवंड्याचे पाणी पोहोचेना

By सुधीर लंके | Updated: April 9, 2019 12:00 IST

संगमनेर, राहाता,श्रीरामपूर या तालुक्यातील १८२ गावे गत ४६ वर्षांपासून निळवंडे धरणाच्या पाण्याकडे डोळे लावून बसले आहे.

सुधीर लंकेअहमदनगर : संगमनेर, राहाता,श्रीरामपूर या तालुक्यातील १८२ गावे गत ४६ वर्षांपासून निळवंडे धरणाच्या पाण्याकडे डोळे लावून बसले आहे. आता उमेदवार या गावांकडे प्रचाराला निघाले आहेत. मात्र, आमच्या पाण्याचे बोला? असा या गावांचा सवाल आहे. काही गावांनी उमेदवार व नेत्यांना गावबंदीच केली आहे.अकोले तालुका सोडून संगमनेर तालुक्यात प्रवेश केला की मंगळापूर फाट्यावर काही म्हातारी मंडळी बसलेली होती. हा काहीसा सधन पट्टा आहे. प्रवरा नदीमुळे हा परिसर बागायती झाला. मात्र, या गावाच्या उत्तरेकडील बाजूचा वडगाव लांडगा, जवळेकडलग, निमगाव भोजापूर हा परिसर पाण्याच्या समस्येचा सामना करत आहे. अकोले तालुक्यात निळवंडे धरणाचे कालवे या भागातून जातात. मंगळापूरची मंडळी त्यांच्यासह या भागाबाबतही चिंता करत होती. खाली पाणी पळविले जाते. नदीला पाणी सुटले की सात-आठ तास वीज घालविली जाते. आम्ही शेती कशी करायची? हा या शेतकऱ्यांचा प्रश्न होता.संगमनेर शहर ओलांडले की निळवंडे, कोठे कमळेश्वर मार्गे शिर्डीकडे जाता येते. निळवंड्याच्या शिवारात बाबासाहेब पवार हे एक टँकरचालक टँकरचे पाणी डाळिंबाच्या बागेत सोडत होते. त्यांनी टँकरचे गणितच मांडले. एका टँकरचा एक हजार रुपये खर्च आहे. या बागेत ते दररोज दहा टँकर सोडतात. म्हणजे दहा हजार हा दररोजचा बाग जगविण्याचा खर्च आहे.अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचा कालवा या भागातूनच पुढे राहाता, श्रीरामपूरकडे जातो. १९७२ पासून या धरणाची चर्चा सुरु आहे. प्रत्यक्षात धरणाचे काम १९९३ साली सुरु झाले. धरणावर दोन कालवे आहेत. त्यातील एक कालवा थेट श्रीरामपूर तालुक्यातील दिघीपर्यंत येतो. धरण पूर्ण झाले. मात्र, कालव्यांची कामे अद्याप पूर्ण नाहीत. त्यामुळे कौठे कमळेश्वर व धरणावर अवलंबून असलेल्या १८२ गावांचा पट्टा तहानलेला आहे.कौठे कमळेश्वरच्याच शिवारात सारंगधर हे मेंढपाळ भर उन्हात मेंढ्या चारत होते. ओसाड माळरानावर मध्येमध्ये खडकाचे टपरे व उरलेल्या मातीवर सुकून गेलेले खुरटे गवत. हे गवत मेंढ्यांच्या तोंडात देखील येत नव्हते. ‘अशाच गवतावर अजून दोन महिने ही जित्राब जगवायची आहेत. कधीकधी दोन-दोन दिवस त्यांना पाणीसुद्धा मिळत नाही’, असे तो मेंढपाळ सांगत होता. निवडणुकीचे उमेदवार कोण हेही त्याला ठाऊक नव्हते. त्यांना मेंढ्या जगविण्याची चिंता दिसत होती.कौठे कमळेश्वरच्या मंदिरात भर दुपारी काही ग्रामस्थांसोबत गप्पा मारल्या. त्यात महिलाही होत्या. या सर्वांचे एक प्रमुख गाºहाणे होते की नेते फक्त निवडणुकीपुरते येतात. गावात निवडणुकीचा काहीच माहोल दिसत नव्हता. सकाळीच खासदार प्रचारासाठी येऊन गेले होते. येथेही पिण्याचे पाणी नाही. गावाजवळ विमानतळ आले (शिर्डी विमानतळ). पण पाणी नाही. विद्यमान खासदारांनी निळवंडेच्या पाण्यासाठी प्रयत्न केले, असे हे लोक सांगतात. पण, खासदार फारसे गावात येत नाही, अशी तक्रारही लगेच करतात. येथे विड्या बनविण्याचा कारखाना आहे. त्यात महिलांना रोजगार मिळतो. त्यातील लिपिक आरती दुस्सम सांगत होत्या की गावातील काही महिलांकडे आधारकार्ड नाही. आजकाल आधार लिंक केल्याशिवाय कामगारांना वेतन, भविष्य निर्वाह निधी हे काहीच देता येत नाही. त्यामुळे आधारकार्ड नसलेल्या महिलांना कामावर ठेवता येत नाही. डिजिटल इंडियाची अशी दुसरीही एक बाजू आहे. शिर्डी हा राखीव मतदारसंघ आहे. निवडणुकीत देशपातळीवर पुलवामा हल्ला, डिजिटल इंडिया, चौकीदार हे सगळे मुद्दे गाजताहेत. स्थानिक पातळीवर मात्र लोकांना वेगळी चिंता आहे.पुढाऱ्यांना का केली गावबंदी?शिर्डीच्या काकडी विमानतळाकडे जाताना कासारे गाव लागते. या गावात रस्त्यावरच फलक दिसला. ‘पुढाऱ्यांना गावबंदी’. दर निवडणुकीत निळवंडे धरणाचे पाणी आणण्याची घोषणा होते. पण, प्रत्यक्षात काही मिळत नाही म्हणून आम्हाला आता भाषणेच ऐकायची नाहीत, असे येथील गावकºयांचे म्हणणे होते. या फलकाजवळ उभे असताना पाच-सहा गावकरी काही क्षणात जमा झाले. प्रत्येकजण पाण्याबाबत संतापून बोलत होता. शिर्डीला विमानतळ व्हावे ही अलीकडची मागणी. विमानतळ झाले व विमानेही झेपावली. पण, विमानळाच्या परिसराला पाणी मात्र मिळू शकलेले नाही.कासारे सोडले की राहाता तालुक्यातील गोगलगाव लागले. तेच चित्र. रस्त्यावर माणसे टँकरचे पाणी भरत होते. कित्त्येक निवडणुका आल्या नी गेल्या, पण आम्हाला पाणी मिळेना, असे या लोकांचेही म्हणणे होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९shirdi-pcशिर्डी