शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

मदतीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST

राज्यात जवळपास दीड लाख मृत्यू झाले आहेत. त्यातील २० टक्के मृत्यू हे वयाच्या ५० वर्षांपेक्षा कमी व्यक्तींचे असल्याचा अंदाज ...

राज्यात जवळपास दीड लाख मृत्यू झाले आहेत. त्यातील २० टक्के मृत्यू हे वयाच्या ५० वर्षांपेक्षा कमी व्यक्तींचे असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे कुटुंब उघड्यावर पडले आहेत. अशा कुटुंबात वृद्ध व्यक्ती व लहान मुले विधवा पत्नी यांच्यासाठी सरकारने उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील अशा कुटुंबांची संख्या नक्की करून सर्वेक्षण व्हावे व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवी संस्था उद्योजक यांची समिती गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करावी व त्यांनी सध्या असलेल्या योजनांचा लाभ मिळवून देणे त्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणे व महिला तरुणांच्या रोजगारासाठी मदत करणे अशा स्वरूपाचे काम केले तर या कुटुंबांचे पुनर्वसन होऊ शकते.

या कुटुंबातील लहान मुले जर वसतिगृहात राहायला तयार असतील तर त्या जिल्ह्यातील बालकल्याण समितीच्या मदतीने या मुलांना बालगृहात दाखल करता येईल. वसतिगृहात न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देता येईल. लग्नाच्या वयाच्या मुली असतील तर अशा सर्व कुटुंबातील मुलींच्या एकत्र सामुदायिक विवाह करता येईल. कमी वयाच्या विधवांच्या पुनर्विवाहाला ही प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्या तालुक्यातील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रोजगार निर्मिती ही करता येईल. उद्योजकांना त्याबाबत आवाहन करता येईल व बँकांचे कर्ज मिळवून देता येतील. अशा सर्वच आघाड्यांवर या कुटुंबासाठी या समितीमार्फत काम करून ही कुटुंबे उभी राहू शकतील अन्यथा ही कुटुंबे कोरोनातील हॉस्पिटलच्या बिलाने कर्जबाजारी झाली आहेत. त्यातून पुन्हा गरिबीत ढकलली जातील. या कुटुंबाच्या दवाखान्याच्या बिलाचे ही स्वतंत्र चौकशी करून त्यांना परतावा देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, असे आवाहन हेरंब कुलकर्णी यांनी केले आहे.

अकोले तालुक्यातील ५० वर्षांच्या आतील मृत्यू झालेल्या कुटुंबाचे माहितीचे संकलन सध्या सुरू असून अशा पुनर्वसनाची सुरुवात अकोले तालुक्यापासून राजकीय,सामाजिक कार्यकर्त्यांच्या उद्योजकांच्या मदतीने करत आहोत असेही त्यांनी सांगितले..