शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

मदतीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST

राज्यात जवळपास दीड लाख मृत्यू झाले आहेत. त्यातील २० टक्के मृत्यू हे वयाच्या ५० वर्षांपेक्षा कमी व्यक्तींचे असल्याचा अंदाज ...

राज्यात जवळपास दीड लाख मृत्यू झाले आहेत. त्यातील २० टक्के मृत्यू हे वयाच्या ५० वर्षांपेक्षा कमी व्यक्तींचे असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे कुटुंब उघड्यावर पडले आहेत. अशा कुटुंबात वृद्ध व्यक्ती व लहान मुले विधवा पत्नी यांच्यासाठी सरकारने उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील अशा कुटुंबांची संख्या नक्की करून सर्वेक्षण व्हावे व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवी संस्था उद्योजक यांची समिती गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करावी व त्यांनी सध्या असलेल्या योजनांचा लाभ मिळवून देणे त्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणे व महिला तरुणांच्या रोजगारासाठी मदत करणे अशा स्वरूपाचे काम केले तर या कुटुंबांचे पुनर्वसन होऊ शकते.

या कुटुंबातील लहान मुले जर वसतिगृहात राहायला तयार असतील तर त्या जिल्ह्यातील बालकल्याण समितीच्या मदतीने या मुलांना बालगृहात दाखल करता येईल. वसतिगृहात न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देता येईल. लग्नाच्या वयाच्या मुली असतील तर अशा सर्व कुटुंबातील मुलींच्या एकत्र सामुदायिक विवाह करता येईल. कमी वयाच्या विधवांच्या पुनर्विवाहाला ही प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्या तालुक्यातील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रोजगार निर्मिती ही करता येईल. उद्योजकांना त्याबाबत आवाहन करता येईल व बँकांचे कर्ज मिळवून देता येतील. अशा सर्वच आघाड्यांवर या कुटुंबासाठी या समितीमार्फत काम करून ही कुटुंबे उभी राहू शकतील अन्यथा ही कुटुंबे कोरोनातील हॉस्पिटलच्या बिलाने कर्जबाजारी झाली आहेत. त्यातून पुन्हा गरिबीत ढकलली जातील. या कुटुंबाच्या दवाखान्याच्या बिलाचे ही स्वतंत्र चौकशी करून त्यांना परतावा देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, असे आवाहन हेरंब कुलकर्णी यांनी केले आहे.

अकोले तालुक्यातील ५० वर्षांच्या आतील मृत्यू झालेल्या कुटुंबाचे माहितीचे संकलन सध्या सुरू असून अशा पुनर्वसनाची सुरुवात अकोले तालुक्यापासून राजकीय,सामाजिक कार्यकर्त्यांच्या उद्योजकांच्या मदतीने करत आहोत असेही त्यांनी सांगितले..