शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

मदतीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST

राज्यात जवळपास दीड लाख मृत्यू झाले आहेत. त्यातील २० टक्के मृत्यू हे वयाच्या ५० वर्षांपेक्षा कमी व्यक्तींचे असल्याचा अंदाज ...

राज्यात जवळपास दीड लाख मृत्यू झाले आहेत. त्यातील २० टक्के मृत्यू हे वयाच्या ५० वर्षांपेक्षा कमी व्यक्तींचे असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे कुटुंब उघड्यावर पडले आहेत. अशा कुटुंबात वृद्ध व्यक्ती व लहान मुले विधवा पत्नी यांच्यासाठी सरकारने उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील अशा कुटुंबांची संख्या नक्की करून सर्वेक्षण व्हावे व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवी संस्था उद्योजक यांची समिती गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करावी व त्यांनी सध्या असलेल्या योजनांचा लाभ मिळवून देणे त्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणे व महिला तरुणांच्या रोजगारासाठी मदत करणे अशा स्वरूपाचे काम केले तर या कुटुंबांचे पुनर्वसन होऊ शकते.

या कुटुंबातील लहान मुले जर वसतिगृहात राहायला तयार असतील तर त्या जिल्ह्यातील बालकल्याण समितीच्या मदतीने या मुलांना बालगृहात दाखल करता येईल. वसतिगृहात न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देता येईल. लग्नाच्या वयाच्या मुली असतील तर अशा सर्व कुटुंबातील मुलींच्या एकत्र सामुदायिक विवाह करता येईल. कमी वयाच्या विधवांच्या पुनर्विवाहाला ही प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्या तालुक्यातील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रोजगार निर्मिती ही करता येईल. उद्योजकांना त्याबाबत आवाहन करता येईल व बँकांचे कर्ज मिळवून देता येतील. अशा सर्वच आघाड्यांवर या कुटुंबासाठी या समितीमार्फत काम करून ही कुटुंबे उभी राहू शकतील अन्यथा ही कुटुंबे कोरोनातील हॉस्पिटलच्या बिलाने कर्जबाजारी झाली आहेत. त्यातून पुन्हा गरिबीत ढकलली जातील. या कुटुंबाच्या दवाखान्याच्या बिलाचे ही स्वतंत्र चौकशी करून त्यांना परतावा देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, असे आवाहन हेरंब कुलकर्णी यांनी केले आहे.

अकोले तालुक्यातील ५० वर्षांच्या आतील मृत्यू झालेल्या कुटुंबाचे माहितीचे संकलन सध्या सुरू असून अशा पुनर्वसनाची सुरुवात अकोले तालुक्यापासून राजकीय,सामाजिक कार्यकर्त्यांच्या उद्योजकांच्या मदतीने करत आहोत असेही त्यांनी सांगितले..