शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

दुष्काळमुक्तीला सरकारी हरताळ

By admin | Updated: February 24, 2016 23:43 IST

अहमदनगर: इतर जिल्ह्यांच्या तुलनेत क्षेत्रफळाने अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा आहे़ दुष्काळी गावांची संख्याही मोठी आहे़ ही गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारने मागेल त्याला शेततळे योजना आणली़

अहमदनगर: इतर जिल्ह्यांच्या तुलनेत क्षेत्रफळाने अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा आहे़ दुष्काळी गावांची संख्याही मोठी आहे़ ही गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारने मागेल त्याला शेततळे योजना आणली़ मात्र जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या शेततळ्यांचे उद्दिष्ट तोकडे आहे़ त्यामुळे योजना राबविण्याबाबत प्रशासकीय यंत्रणेत संभ्रमाचे वातावरण असून, मंजूर तळ्यांची संख्या कमी असल्याने शेततळ्यांची योजना नगर जिल्ह्यात तळालाच राहते की काय अशी भीती व्यक्त होत आहे़दुष्काळमुक्त गावांसाठी सरकारने दीर्घकालीन उपाययोजनांवर भर दिला आहे़ जलयुक्त शिवार आणि त्यापाठोपाठ आता मागेल त्याला शेततळे, ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे़ जलयुक्त शिवार व रोजगार हमी योजनेतून कामे करण्यासाठी काही जाचक अटी आहेत़ त्यामुळे इच्छा असूनही शेतकऱ्यांना शेततळे करता येत नाहीत़ ज्या शेतकऱ्यांना रोहयोतून शेततळी करता आली नाही, अशा शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळे, या योजनेकडून अपेक्षा होत्या़ मात्र सरकारने क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा असूनही नगर जिल्ह्यासाठी अवघे २ हजार ३९२ शेततळे मंजूर केले आहेत़ मागणीच्या तुलनेत मंजूर शेततळ्यांची संख्या कमी असणार आहे़ परिणामी अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत़ (प्रतिनिधी)सोमवारपासून आॅनलाईन नोंदणी शेततळ्यांसाठी प्रथमच आॅनलाईन नोंद केली जाणार आहे़ शासनाच्या आपले सरकार,या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे़ येत्या २९ फेब्रुवारीपासून आपले सरकार, या संकेतस्थळावर शेततळ्यासाठीचा आॅनलाईन अर्ज उपलब्ध होणार असून, हा अर्ज भरून शेतकऱ्यांनी तळ्यांसाठीची नोंदणी करायची आहे़ नोंदणी केल्यानंतर ४५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे़ रोहयो योजनेत शेततळ्यासाठी किमान एक मीटर तळे मजुरांकडून करणे बंधनकारक आहे़ ती अट मागेल त्याला शेततळे योजनेतून वगळण्यात आली आहे़ सहज उपलब्ध होणारी शेततळ्यांची ही एकमेव योजना आहे़ पण, मंजूर शेततळ्यांची संख्याच तुटपुंजी असल्याने उद्दिष्टापेक्षा अधिक नोंदणी करणाऱ्यांची नावे प्रतीक्षा यादीत टाकली जाणार असल्याचेही प्रशासकीय सुत्रांनी सांगितले़