करंजी : पाथर्डी तालुक्यातील घाटशिरसला बुधवारी सायंकाळी वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला. अनेक घरांवरील पत्रे उडून झाडे कोसळली. या घटनेत वित्तहानीचे प्रमाण मोठे असून सुदैवाने जीवित हानी टळली.बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुरु झालेल्या या वादळी पावसामुळे घाटशिरस भागात एकच घबराट पसरली. वादळाचा वेग मोठा होता. अनेक घरांवरील पत्रे उडाली. तर मोठी झाडे उन्मळून पडली. माजी सरपंच पोपटराव चोथे यांच्या घरावरील सर्व साठ पत्रे उडाली. त्यामुळे घरामधील दूध डेअरीचे साहित्य तसेच तीनशे पोती जनावरांच्या पेंडीचे नुकसान झाले. प्लास्टिकच्या वस्तू खराब झाल्या. या घटनेत अनेक बेघर झाले आहेत. (वार्ताहर)
घाटशिरसला वादळाचा तडाखा
By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST