शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

आघाडीत संघर्षाची चिन्हे

By admin | Updated: August 19, 2014 02:15 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मंगळवारपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाला सुरूवात होणार आहे.

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मंगळवारपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाला सुरूवात होणार आहे. मात्र, जिल्ह्यात मतदारसंघातील संभाव्य अदला-बदलाबाबत आघाडीतील दोन्ही पक्षाची चर्चा झालेली नाही. दोघांकडून नगरशहर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघावर दावा सांगण्यात येत असल्याने यावरून संघर्षाची चिन्हे आहेत.विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीबाबत शिक्कामोर्तब झाल्यानंतर ज्या मतदारसंघात दोनपेक्षा जास्त वेळी पराभव झालेल्या जागा आघाडीतील दुसऱ्या मित्र पक्षाला देण्याचा निर्णय झाला होता. याच फॉर्मुल्याच्या आधारे जिल्ह्यातील नगर शहर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात काँग्रेसचा सलग चार वेळा पराभव झालेला आहे. तशीच अवस्था नगर शहर मतदारसंघाची आहे. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद मोठी असल्याने ही जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे.शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पक्षीय बैठकीत याबाबतचा अहवाल देण्यात आलेला आहे. कर्जत-जामखेड आणि नगरशहरात जोर लावल्यास या ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळणे शक्य होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या वाटाघाटीत या दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येतील असा विश्वास पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उमेदवारांबाबत अंतिम निर्णय खासदार पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पालकमंत्री मधुकरराव पिचड घेणार आहेत. दुसरीकडे पारनेर, कोपरगाव आणि राहुरी तालुक्यात राष्ट्रवादीचा पराभव होत असून या जागेवर उमेदवार उभा करायचा की त्या मित्र पक्षाला द्यायच्या यावर राष्ट्रवादीत मौन आहे. यात राहुरी, कोपरगाव वगळता अन्य ठिकाणी पक्षाकडे सध्या तरी प्रबळ उमेदवार नाही आणि ही वस्तुस्थिती पक्षश्रेष्ठींनाही माहिती आहे.नगर शहर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघ काँग्रेसचा आहे. या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आलेले आहे. दोन दिवसांपूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत. असे असले तरी मतदारसंघातील संभाव्य बदलाबाबत वरिष्ठ पातळीवरूनच निर्णय घेण्यात येईल. शहर मतदारसंघाच्या उमेदवारी बाबत पक्षाकडून निर्णय घेण्यात येईल आणि तो अंतिम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)