शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

चार खांदेकरी...चार शेजारचे अन् चार नातेवाईक,अमरधाममध्ये ‘स्मशान शांतता’ : विद्युत दाहिनीतच होतात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 10:45 IST

अहमदनगर : कोणी गरीब असो की कोणी श्रीमंत...कोणी साधा असो की नावाजलेला..एका अंत्यविधीला किमान शंभर लोक ांची तरी अमरधाममध्ये उपस्थिती असते. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मात्र किमान १५ ते २० लोकांच्या उपस्थितीमध्येच अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यात चार खांदेकरी, चार शेजारचे आणि चार जवळच्या नातेवाईकांचा समावेश असतो. अंत्यदर्शन घेण्याची तीव्र इच्छा मनातल्या मनातच दाबून ठेवत नागरिक कोरोनाच्याविरुद्ध लढत आहेत. त्यामुळे अमरधाममध्ये स्मशान शांतता पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : कोणी गरीब असो की कोणी श्रीमंत...कोणी साधा असो की नावाजलेला..एका अंत्यविधीला किमान शंभर लोक ांची तरी अमरधाममध्ये उपस्थिती असते. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मात्र किमान १५ ते २० लोकांच्या उपस्थितीमध्येच अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यात चार खांदेकरी, चार शेजारचे आणि चार जवळच्या नातेवाईकांचा समावेश असतो. अंत्यदर्शन घेण्याची तीव्र इच्छा मनातल्या मनातच दाबून ठेवत नागरिक कोरोनाच्याविरुद्ध लढत आहेत. त्यामुळे अमरधाममध्ये स्मशान शांतता पसरली आहे.कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. बाहेर पडले की पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागतात. शिवाय गर्दी झाली तर संसर्ग होऊ शकतो. म्हणून कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करावेत. तसेच अमरधाममध्ये सोशल डिस्टन्सिंगही पाळावे, असेच शासनाचे निर्देश आहेत. सध्या अमरधाममध्ये रोज सात ते आठ जणांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. सरण रचण्यात वेळ जातो. तसेच लोकांना बराच वेळ थांबावे लागते. हा वेळ वाचवण्यासाठी बहुतांश अंत्यविधी विद्युत दाहिनीत केले जात आहेत. सात-आठपैकी एखाद्याच अंत्यसंस्कार जाळीत लाकडे ठेऊन केला जातो. अत्यंत कमी वेळेत अंत्यसंस्कार उरकले जातात. विधी करण्यातही फारसा वेळ घालविला जात नाही. लोक फोनवरून चौकशी करतात, मात्र नातेवाईकही अमरधाममध्ये येऊ नका, असेच सांगत आहेत. काही मित्र, स्नेही निधनाची वार्ता कळाल्यानंतर शक्य झाले तरच घरी अंत्यदर्शन घेऊन येतात. गर्दी टाळण्यासाठी तेही अमरधाममध्ये जात नाहीत. अमरधाममध्ये दहा-पंधरा लोकही मास्क लावूनच येतात. तिथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात असल्याने कोणही चर्चा करण्यात वेळ घालवित नाही.-----बाहेरगावचे अंत्यविधी वाढलेनगर तालुका व ग्रामीण भागातील काही अंत्यविधीही नगरच्या अमरधाममध्ये होत आहेत. नगरच्या रुग्णालयात कोणी गेला तर त्याला गावात येऊ दिले जात नाही. कोरोनाच्या भितीमुळे रुग्णालयात निधन झालेल्या व्यक्तीवर अमरमधाममध्येच अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्या गावातील मोजके नातेवाईक नगरमध्ये बोलवले जातात आणि इथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार होतात, असे अमरधाममधील व्यवस्थापक स्वप्नील कुरे यांनी सांगितले.-------अपघातात मृत्यू पावणारे झाले कमीदिवसभरात दोन- तीन जण अपघातात मरण पावलेले असतात. अचानक मृत्यू झाल्याने अशा अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येने नातेवाईक व मित्र परिवार जमतो. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे वाहनेच रस्त्यावर येत नाहीत. अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे अपघातात मृत्यू पावलेल्यांची संख्या कमी झाल्याने अंत्यसंस्कारांची संख्या कमी झाली आहे,असेही स्वप्नील कुरे म्हणाले.-------------------दहाव्यालाही फक्त घरचेच येतातदहाव्याच्या कार्यक्रमाला एरव्ही मोठ्या संख्येने गर्दी असते. सध्या लॉकडाऊनमुळे फक्त घरातीलच व्यक्ती दहाव्याच्या कार्यक्रमाला येतात. दहाव्याचे कार्यक्रम होतात, मात्र पण मित्र परिवार, नातेवाईकही येत नाहीत. फक्त घरातील लोक आणि गुरुजी असतात. असे विधीही सकाळी नऊच्या आत होऊन जातात.