शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
3
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
4
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
5
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
6
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
7
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
8
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
9
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
10
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
11
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
12
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
13
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
16
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
17
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
18
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
19
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
20
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

चार खांदेकरी...चार शेजारचे अन् चार नातेवाईक,अमरधाममध्ये ‘स्मशान शांतता’ : विद्युत दाहिनीतच होतात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 10:45 IST

अहमदनगर : कोणी गरीब असो की कोणी श्रीमंत...कोणी साधा असो की नावाजलेला..एका अंत्यविधीला किमान शंभर लोक ांची तरी अमरधाममध्ये उपस्थिती असते. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मात्र किमान १५ ते २० लोकांच्या उपस्थितीमध्येच अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यात चार खांदेकरी, चार शेजारचे आणि चार जवळच्या नातेवाईकांचा समावेश असतो. अंत्यदर्शन घेण्याची तीव्र इच्छा मनातल्या मनातच दाबून ठेवत नागरिक कोरोनाच्याविरुद्ध लढत आहेत. त्यामुळे अमरधाममध्ये स्मशान शांतता पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : कोणी गरीब असो की कोणी श्रीमंत...कोणी साधा असो की नावाजलेला..एका अंत्यविधीला किमान शंभर लोक ांची तरी अमरधाममध्ये उपस्थिती असते. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मात्र किमान १५ ते २० लोकांच्या उपस्थितीमध्येच अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यात चार खांदेकरी, चार शेजारचे आणि चार जवळच्या नातेवाईकांचा समावेश असतो. अंत्यदर्शन घेण्याची तीव्र इच्छा मनातल्या मनातच दाबून ठेवत नागरिक कोरोनाच्याविरुद्ध लढत आहेत. त्यामुळे अमरधाममध्ये स्मशान शांतता पसरली आहे.कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. बाहेर पडले की पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागतात. शिवाय गर्दी झाली तर संसर्ग होऊ शकतो. म्हणून कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करावेत. तसेच अमरधाममध्ये सोशल डिस्टन्सिंगही पाळावे, असेच शासनाचे निर्देश आहेत. सध्या अमरधाममध्ये रोज सात ते आठ जणांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. सरण रचण्यात वेळ जातो. तसेच लोकांना बराच वेळ थांबावे लागते. हा वेळ वाचवण्यासाठी बहुतांश अंत्यविधी विद्युत दाहिनीत केले जात आहेत. सात-आठपैकी एखाद्याच अंत्यसंस्कार जाळीत लाकडे ठेऊन केला जातो. अत्यंत कमी वेळेत अंत्यसंस्कार उरकले जातात. विधी करण्यातही फारसा वेळ घालविला जात नाही. लोक फोनवरून चौकशी करतात, मात्र नातेवाईकही अमरधाममध्ये येऊ नका, असेच सांगत आहेत. काही मित्र, स्नेही निधनाची वार्ता कळाल्यानंतर शक्य झाले तरच घरी अंत्यदर्शन घेऊन येतात. गर्दी टाळण्यासाठी तेही अमरधाममध्ये जात नाहीत. अमरधाममध्ये दहा-पंधरा लोकही मास्क लावूनच येतात. तिथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात असल्याने कोणही चर्चा करण्यात वेळ घालवित नाही.-----बाहेरगावचे अंत्यविधी वाढलेनगर तालुका व ग्रामीण भागातील काही अंत्यविधीही नगरच्या अमरधाममध्ये होत आहेत. नगरच्या रुग्णालयात कोणी गेला तर त्याला गावात येऊ दिले जात नाही. कोरोनाच्या भितीमुळे रुग्णालयात निधन झालेल्या व्यक्तीवर अमरमधाममध्येच अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्या गावातील मोजके नातेवाईक नगरमध्ये बोलवले जातात आणि इथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार होतात, असे अमरधाममधील व्यवस्थापक स्वप्नील कुरे यांनी सांगितले.-------अपघातात मृत्यू पावणारे झाले कमीदिवसभरात दोन- तीन जण अपघातात मरण पावलेले असतात. अचानक मृत्यू झाल्याने अशा अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येने नातेवाईक व मित्र परिवार जमतो. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे वाहनेच रस्त्यावर येत नाहीत. अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे अपघातात मृत्यू पावलेल्यांची संख्या कमी झाल्याने अंत्यसंस्कारांची संख्या कमी झाली आहे,असेही स्वप्नील कुरे म्हणाले.-------------------दहाव्यालाही फक्त घरचेच येतातदहाव्याच्या कार्यक्रमाला एरव्ही मोठ्या संख्येने गर्दी असते. सध्या लॉकडाऊनमुळे फक्त घरातीलच व्यक्ती दहाव्याच्या कार्यक्रमाला येतात. दहाव्याचे कार्यक्रम होतात, मात्र पण मित्र परिवार, नातेवाईकही येत नाहीत. फक्त घरातील लोक आणि गुरुजी असतात. असे विधीही सकाळी नऊच्या आत होऊन जातात.