शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

श्रीरामपूर पालिकेला आरोग्य विम्याचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:20 IST

शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजनचे बेड मिळणे कठीण झाले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयासाठी दारोदार ...

शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजनचे बेड मिळणे कठीण झाले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयासाठी दारोदार फिरावे लागते आहे. या भीषण परिस्थितीत नगरपालिका प्रशासन कोरोना रुग्णालय सुरू करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. त्यातच भर म्हणून पालिकेने मोठा गवगवा केलेल्या जन आरोग्य विम्यासाठी आर्थिक तरतूद करूनही तो अंमलात आणला नाही, असे ससाणे यांनी पत्रकात म्हटले आहे.

पालिकेने मार्च महिन्यात घेतलेल्या विशेष सभेत नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी शहरातील सर्व नागरिकांचा व पालिका कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा करणार असल्याचे जाहीर केले होते. शहरातील आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांना वगळून इतरांचा विमा करण्याचे सभागृहात ठरले होते. यासाठी करण्यात आलेली ५० लाख रुपयांची तरतूद वाढवून अडीच कोटींची करावी असा प्रस्ताव अनेक नगरसेवकांनी ठेवला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र चर्चा होऊन दीड महिना झाला तरी एकही नागरिकाला या योजनेचा फायदा मिळालेला नाही.

नागरिकांना खासगी रुग्णालयात कोरोना उपचारासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहे. हा विमा योग्य वेळी काढला गेला असता तर त्याचा नागरिकांना लाभ होऊन त्यांचे लाखो रुपये वाचले असते. त्यामुळे पालिकेने केवळ प्रसिद्धी करता हा फार्स केला का, असा सवाल ससाणे यांनी उपस्थित केला आहे.

लाखो रुपये खर्च करून उपचार घेणाऱ्या नागरिकांना योजनेच्या माध्यमातून पैसे परत मिळतील का असा प्रश्न पडल्याची टीका करण्यात आली आहे.

------