शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

परप्रांतीय कामगार गेले, स्थानिकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:21 IST

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे परप्रांतीय कामगार गावी निघून गेले असून, स्थानिकांनी पाठ फिरविली आहे. ...

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे परप्रांतीय कामगार गावी निघून गेले असून, स्थानिकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने उद्योजकांना हातावर हात धरून बसण्याची वेळ आली आहे. मोठ्या कंपन्या वगळता इतर छोटे कारखाने बंद झाले आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत परप्रांतीय कामगार गावी निघून गेले होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने कामगार पुन्हा कामावर हजर झाले. परंतु, हे प्रमाण कमी होते. कारखाने पूर्ववत होत असतानाच दुसरी लाट येऊन धडकली. शासनाने कडक निर्बंध लागू केले. लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय कामगार गावाकडे निघून गेले आहेत. उत्पादनात कपात करून कारखाने सुरू होते. परंतु, ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे अनेक कारखान्यांनी उत्पादन थांबविले आहे. निर्यात करणाऱ्या बोटावर मोजण्याइतक्या कंपन्या सुरू असल्याने त्यांना सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या सुरू आहेत. परंतु, कामगार मिळत नाहीत. परप्रांतीय कामगार निघून गेल्याने स्थनिक कामगारांवरच उद्योजकांची भिस्त आहे. परंतु, कोरोनाच्या भीतीने हे कामगारही गावाकडे निघून गेले असून, ते परत येण्यास तयार नाहीत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. उपचारासाठी बेड शिल्लक नाहीत. ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे आपली शेती केलेलीच बरी, अशी अनेकांची भावना झाली आहे. त्यात कच्च्या मालाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जास्तीचे पैसे मोजूनही कच्चा माल मिळत नाही आणि मिळालाच तर आणण्याची सोय नाही. त्यामुळे उद्योजकांनी उत्पादन कमी केले असून, बोटांवर मोजण्या इतक्याच कामगारांवर काम सुरू केले आहे.

....

कोरोनामुळे दुसऱ्यांदा कंपन्या बंद ठेवण्याची वेळ आली असून, २५ कंपन्या बंद आहेत. परप्रांतीय कामगार गावी निघून गेलेले आहेत. स्थानिक कामगार भीतीमुळे येत नाहीत. इतरही अनेक अडचणी आहेत.

- राजेंद्र कटारिया, अध्यक्ष आमी

....

- काेरोनामुळे भीतीचे वातावरण आहे. कामगार येत नाहीत. जे आहेत त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन उत्पादन कसेबसे सुरू आहे. कच्चा माल मिळत नाही. ऑक्सिजनचा पुरवठा बंद आहे. उद्योजकांकडे असलेला ऑक्सिजन रुग्णालयांना दिला जात आहे. उद्योजकांनी उत्पादन कमी केले.

- मिलिंद कुलकर्णी, उद्योजक