शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

आयसीयू बेडच्या कमतरतेमुळे पाचशे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:22 IST

अहमदनगर : संचारबंदी, कडक लॉकडाऊन केल्यानंतरही कोरोनाची साखळी तुटत नसल्याचे दिसत आहे. एप्रिल महिन्यातच ६९१ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

अहमदनगर : संचारबंदी, कडक लॉकडाऊन केल्यानंतरही कोरोनाची साखळी तुटत नसल्याचे दिसत आहे. एप्रिल महिन्यातच ६९१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १८ टक्के रुग्ण हे आयसीयूमध्ये उपचार घेत होते, तर ज्यांना आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळाले नाही, त्यामुळे त्यांना साध्या बेडवर उपचार घ्यावे लागले. उपचार होऊ न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, अशा कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या ही पाचशेच्या वर असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यामध्ये कोविड केअर सेंटर वाढले, कोविड हॉस्पिटलची संख्याही वाढली. जिल्ह्यात तब्बल १६ हजारांपेक्षा जास्त बेड सज्ज आहेत. मात्र, त्याहीपेक्षा सक्रिय रुग्णांची संख्या २२ हजार आहे. त्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक रुग्णांना बेड मिळत नसल्याची जिल्ह्यात स्थिती आहे. त्यातील लक्षणे नसलेले कोरोनाबाधित घरातच राहून उपचार घेत आहेत, तर गंभीर रुग्णांवर आयसीयू, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात आयसीयूपेक्षा आयसीयू न मिळालेल्या रुग्णांचे मृत्यू जास्त आहेत. त्यांना वेळेत उपचार सुविधा न मिळाल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे. या बाबीला मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणताही दुजोरा दिला नाही.

---------------

चार महिन्यांतील मृत्यू

बेड मृत्यू प्रमाण (टक्के)

आयसीयू १७० १८ टक्के

कॅज्युअल्टी २०० १८ टक्के

साधे बेड ५७१ ६४ टक्के

----------------

साध्या बेडवरील मृत्यूला जबाबदार कोण ?

जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात कोविड केअर सेंटरमध्ये १३ हजार ८२ बेड उपलब्ध आहेत, तर जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात ६८०, तर कोविड हॉस्पिटलमध्ये ५ हजार ४८२ बेड उपलब्ध आहेत. जिल्ह्यात फक्त ३३६ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. सध्या ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र, ते मिळत नसल्याने उपचारात अडथळे येत आहेत, तसेच जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने शंभर रुग्णांना पाहण्यासाठी एक ते दोन नर्स, आरोग्य कर्मचारी आहेत. त्यामुळे एखाद्या रुग्णाला कोणत्या उपचाराची गरज आहे, ते लक्षात येईपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रकारही घडले आहेत.

-------------

ग्रामीण भागात अंगावर दुखणे काढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर आहेत. स्थानिक ठिकाणी उपचार घेतल्यानंतर व रुग्ण गंभीर झाल्यानंतर नगरमधील रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णाची प्रकृती अत्यंत गुंतागुंतीची झालेली असते, त्यामुळे उपचार करेपर्यंत रुग्णाचा मृत्यू होतो. उपचार करण्यात कोणतीही कसूर ठेवली जात नाही.

-आरोग्य यंत्रणेतील अधिकारी

---

नेट डमी

आयसीयू

डीईए

०३ डेथ ईन आयसीयू डमी