शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आयसीयू बेडच्या कमतरतेमुळे पाचशे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:22 IST

अहमदनगर : संचारबंदी, कडक लॉकडाऊन केल्यानंतरही कोरोनाची साखळी तुटत नसल्याचे दिसत आहे. एप्रिल महिन्यातच ६९१ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

अहमदनगर : संचारबंदी, कडक लॉकडाऊन केल्यानंतरही कोरोनाची साखळी तुटत नसल्याचे दिसत आहे. एप्रिल महिन्यातच ६९१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १८ टक्के रुग्ण हे आयसीयूमध्ये उपचार घेत होते, तर ज्यांना आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळाले नाही, त्यामुळे त्यांना साध्या बेडवर उपचार घ्यावे लागले. उपचार होऊ न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, अशा कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या ही पाचशेच्या वर असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यामध्ये कोविड केअर सेंटर वाढले, कोविड हॉस्पिटलची संख्याही वाढली. जिल्ह्यात तब्बल १६ हजारांपेक्षा जास्त बेड सज्ज आहेत. मात्र, त्याहीपेक्षा सक्रिय रुग्णांची संख्या २२ हजार आहे. त्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक रुग्णांना बेड मिळत नसल्याची जिल्ह्यात स्थिती आहे. त्यातील लक्षणे नसलेले कोरोनाबाधित घरातच राहून उपचार घेत आहेत, तर गंभीर रुग्णांवर आयसीयू, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात आयसीयूपेक्षा आयसीयू न मिळालेल्या रुग्णांचे मृत्यू जास्त आहेत. त्यांना वेळेत उपचार सुविधा न मिळाल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे. या बाबीला मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणताही दुजोरा दिला नाही.

---------------

चार महिन्यांतील मृत्यू

बेड मृत्यू प्रमाण (टक्के)

आयसीयू १७० १८ टक्के

कॅज्युअल्टी २०० १८ टक्के

साधे बेड ५७१ ६४ टक्के

----------------

साध्या बेडवरील मृत्यूला जबाबदार कोण ?

जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात कोविड केअर सेंटरमध्ये १३ हजार ८२ बेड उपलब्ध आहेत, तर जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात ६८०, तर कोविड हॉस्पिटलमध्ये ५ हजार ४८२ बेड उपलब्ध आहेत. जिल्ह्यात फक्त ३३६ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. सध्या ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र, ते मिळत नसल्याने उपचारात अडथळे येत आहेत, तसेच जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने शंभर रुग्णांना पाहण्यासाठी एक ते दोन नर्स, आरोग्य कर्मचारी आहेत. त्यामुळे एखाद्या रुग्णाला कोणत्या उपचाराची गरज आहे, ते लक्षात येईपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रकारही घडले आहेत.

-------------

ग्रामीण भागात अंगावर दुखणे काढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर आहेत. स्थानिक ठिकाणी उपचार घेतल्यानंतर व रुग्ण गंभीर झाल्यानंतर नगरमधील रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णाची प्रकृती अत्यंत गुंतागुंतीची झालेली असते, त्यामुळे उपचार करेपर्यंत रुग्णाचा मृत्यू होतो. उपचार करण्यात कोणतीही कसूर ठेवली जात नाही.

-आरोग्य यंत्रणेतील अधिकारी

---

नेट डमी

आयसीयू

डीईए

०३ डेथ ईन आयसीयू डमी