शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
3
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
4
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
5
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
6
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
7
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
8
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
9
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
10
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
11
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
12
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
13
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
14
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
15
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
16
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
17
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
18
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
19
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
20
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

पहिली गुणवत्तायादी नव्वदीपार!

By admin | Updated: July 3, 2014 00:58 IST

अहमदनगर : अकरावी प्रवेशासाठी आज कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये फलकांवर लावलेली खुल्या वर्गाची पहिली गुणवत्तायादी नव्वदीपार गेली.

अहमदनगर : अकरावी प्रवेशासाठी आज कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये फलकांवर लावलेली खुल्या वर्गाची पहिली गुणवत्तायादी नव्वदीपार गेली. विज्ञान आणि वाणिज्य शाखांमध्येच प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ लागली आहे. कला शाखेसाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही महाविद्यालयात आपल्या कलाने प्रवेश घेता येईल.अकरावीत प्रवेशासाठी जिल्हा परिषदेने कनिष्ठ महाविद्यालयांना वेळापत्रक आखून दिले आहे. त्याप्रमाणे प्रवेशअर्ज व गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेली गुणवत्तायादी पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांची महाविद्यालयात झुंबड उडाली होती.शहरातील मोजक्याच कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले आहेत. न्यू आर्टस् महाविद्यालयात विज्ञान शाखेची खुल्या वर्गातील गुणवत्तायादी ९२.८० टक्के व सारडा महाविद्यालयाची ९३.४० टक्क्यांवर बंद झाली. वाणिज्य शाखेसाठी अनुक्रमे ७५ व ८१.६० टक्क््यांपर्यंत खाली उतरली.शहरातील नामवंत महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. त्यानंतर वाणिज्य शाखेला पसंती आहे.सर्वच महाविद्यालयात कला शाखेसाठी प्रवेश खुला आहे. तरीही जागा शिल्लक राहण्याची शक्यता आहे.अहमदनगर महाविद्यालयात ३ हजार ६९२, पेमराज सारडामध्ये २ हजार ८०७, न्यू आर्टस्मध्ये ४ हजार ४९५, तर रेसिडेन्शिअलमध्ये ३ हजार ६९२ प्रवेशअर्ज आले असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. नगर महाविद्यालयात उपप्राचार्य प्रा. गायकवाड, न्यू आर्टस्मध्ये उपप्राचार्य रिंगे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. सारडा महाविद्यालयाची माहिती रजिस्ट्रार अशोक असेरी यांनी दिली.नगर महाविद्यालयात विज्ञानची खुल्या वर्गाची यादी ८५, वाणिज्यची ७५ टक्क्यांवर आली. (प्रतिनिधी)विज्ञान आणि वाणिज्य शाखेतून प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. या शाखेतून पदवी घेतल्यानंतर नोकरी व व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळेच तिकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. कला शाखेचे प्रवेश खुले ठेवूनही महाविद्यालयांत प्रवेश पूर्ण होत नाहीत. गेल्या काही वर्षांपासून ही स्थिती आहे.-एन. एस. गायकवाड,उपप्राचार्य, नगर महाविद्यालय,पहिल्या गुणवत्तायादीप्रमाणे विद्यार्थ्यांना दि. ३ ते ५ जुलैपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश घेता येईल. मुदतीनंतर आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशावर हक्क सांगता येणार नाही. दोन दिवसांनंतर प्रतीक्षा यादी लागणार आहे. बहुतांशी विद्यार्थ्यांनी दोन महाविद्यालयांत अर्ज भरले आहेत. एकीकडे नंबर लागल्यास ते विद्यार्थी दुसरीकडे जाणार नाहीत. त्या ठिकाणी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते.