शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

पित्यानेच दिली मुलाची सुपारी

By admin | Updated: July 15, 2014 00:46 IST

अकोले : साम्रद रतनवाडी भागात डोक्यात दगड घालून झालेल्या युवकाच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात राजूर पोलसांना यश आले आहे.

अकोले : साम्रद रतनवाडी भागात डोक्यात दगड घालून झालेल्या युवकाच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात राजूर पोलसांना यश आले आहे. मुलाच्या त्रासाला कंटाळल्याने पित्यानेच सुपारी देऊन त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. या खून प्रकरणातील अटक आरोपींनी तशी कबुली दिली. रेडे येथील युवक जालिंदर निवृत्ती बंदावणे (वय ३२) हा २९ जूनपासून घरातून बेपत्ता होता. अकोले पोलिसांत हरवल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी दाखल केली होती. त्यानंतर ३० जून ला साम्रद दुर्गम आदिवासी गावात एका अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले. त्याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मयताचे रेखाचित्र ही प्रसिध्द करण्यात आले होते. ९ जुलै रोजी मयताची ओळख पटली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जालिंदरचे वडील निवृत्ती पांडूरंग बंदावणे यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. दरम्यान, याप्रकणी पोलिसांनी भगवान संतू चव्हाण (रा. रेडे) व रमेश लक्ष्मण नवले (रा. गुहिरे) यांना ताब्यात घेतले. मयत युवकाच्या वडिलांनीच ७० हजार रुपये देऊन खून करण्याची सुपारी दिल्याची कबुली आरोपींनी दिली. खून झाल्यानंतर ३५ हजार रुपये दिले, मात्र खून उडकीस येताच त्यांनी भितीपोटी आत्महत्या केली. दरम्यान या गुन्ह्यात आणखी कुणाचा हात आहे का? याचा तपास पोलीस करत आहे. आरोपींना १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. (तालुका प्रतिनिधी)