कोपरगाव: धारणगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम एक महिन्यात पूर्ण होईल, असे सांगून आ़ अशोक काळे जनतेची दिशाभूल करीत आहेत़ त्यांनी पिण्याचे पाणी दिले तर या गावातील नागरिकांच्या वतीने एक लाखाचे बक्षिस देऊन सत्कार करू, अशी टीका संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली़तालुक्यातील धारणगाव, जेऊर पाटोदा, चांदगव्हाण, मुर्शतपूर व हिंगणी या पाच गावांसाठी असलेल्या धारणगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या सोळा वर्षांपासून रखडले आहे़ हे काम तात्काळ व्हावे या मागणीसाठी पाच गावांतील नागरिकांनी बिपीन कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले़धारणगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या तलावात चालू पाण्याच्या आवर्तनात पाणी आले तर त्याचे जलपूजन करू, अन्यथा जीवन प्राधिकरणचे उपअभियंता खाजेकर यांचेच पूजन करण्याचा इशारा कोल्हे यांनी दिला़ तालुक्याचे लोकप्रतिनिधी काय कामे करतात आणि संकटे आल्यावर कुठे असतात हे जनतेला आता चांगलेच माहीत झाले आहे़ ते धादांत खोटे बोलून पत्रकबाजी करतात़ पाच तास उपोषण करत पाच गावच्या नागरिकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार इंदिरा चौधरी यांना दिले़ यावेळी आप्पासाहेब दवंगे, दगुराव चौधरी, मारुतराव चौधरी, राजेंद्र चांडे, प्रभाकर शिंदे, बाजीराव रणशुर, ज्ञानदेव शिंदे, दादासाहेब पवार, दिपक चौधरी, रामदास शिंदे आदींनी आ़ अशोक काळे यांच्या निष्क्रीय व दिशाभुलीच्या कारभारावर कडाडुन टिका केली़
पाण्यासाठी तहसीलसमोर उपोषण!
By admin | Updated: July 6, 2014 00:18 IST