शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
4
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
5
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
6
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
7
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
8
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
9
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
10
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
11
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
12
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
13
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
14
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
15
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
16
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
17
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
18
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
19
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
20
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

कोपरगाव तालुक्यातील शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:16 IST

कोपरगाव : गेली पाच वर्षे मुंबई येथे होणारी गोदावरी लाभ क्षेत्राच्या कालवा सल्लागार समितीची बैठक यंदा कोपरगावात झाली. यात ...

कोपरगाव : गेली पाच वर्षे मुंबई येथे होणारी गोदावरी लाभ क्षेत्राच्या कालवा सल्लागार समितीची बैठक यंदा कोपरगावात झाली. यात एक रबी व दोन उन्हाळ अशा तीन आवर्तनांच्या तारखा जाहीर झाल्या नाही. तसेच बैठकीनंतर दीड महिना उलटूनही आवर्तनांच्या तारखाच जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे कोपरगावात ही बैठक घेऊन नेमका काय फायदा झाला ? असाच प्रश्न कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक ही कोपरगावात ७ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात आली. या बैठकीत तारखा जाहीर न करता तीन आवर्तनांची घोषणाही करण्यात आली. या बैठकीपूर्वी पाटबंधारे विभागाच्या वतीने समितीच्या बैठकीसाठी नियोजित तीन आवर्तनांच्या संभाव्य तारखा गृहीत धरून टिपण्णी तयार करण्यात आली होती. त्यामध्ये रबीचे १५ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२१ असे ३२ दिवस, तसेच उन्हाळचे १ ते मार्च २५ मार्च - २५ दिवस व तिसरे १ ते २५ मे - २५ दिवस असे संभाव्य नियोजन केले होते; परंतु बैठकीत तसेच अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. यासंदर्भात पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता शेतकऱ्यांची पाण्याची मागणीच नसल्याने आवर्तनाचे नियोजन करता येत नाही, असे सांगण्यात आले. त्यांचे म्हणणे सत्य असेल तर १० डिसेंबर २०२० अखेर डाव्या कालव्यावर ७ नंबर अर्जावर ९३० हेक्टर व पाणी वापर संस्थांचे ८५० हेक्टर असे मिळून १ हजार ७८० हेक्टर व उजव्या कालव्यावर फक्त मागणी अर्जावर १ हजार ८०० हेक्टर दोन्ही मिळून ३ हजार ५८० हेक्टर इतक्या हेक्टरसाठी पाण्याची मागणी झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या म्हणण्यानुसार ही शेतकऱ्यांची मागणी नाही का ? हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

...................

कोपरगावात झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीला साधारणतः दीड महिना उलटून देखील आवर्तनाच्या तारखांचा प्रोग्राम जाहीर झालेला नाही. धरण पूर्ण भरलेले असताना जानेवारीत रबीचे १ आवर्तन देण्याचा नक्की अर्थ काय ? त्यामुळे येथून पुढे उन्हाळ आवर्तनाप्रमाणे रब्बीचे आर्वतनाचा देखील कालावधी पुढे ढकलण्याचा डाव दिसतो आहे. असे एक सामान्य शेतकरी म्हणून माझे मत आहे.

- तुषार विध्वंस, शेतकरी, कोपरगाव