शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

खातगावातील शेतकरी अतिवृष्टी विम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:17 IST

कर्जत : कर्जत तालुक्यातील खातगाव शिवारात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले. मात्र, हे पंचनामे बनावट व खोटे झाले ...

कर्जत : कर्जत तालुक्यातील खातगाव शिवारात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले. मात्र, हे पंचनामे बनावट व खोटे झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाली. या प्रकाराची चौकशी करावी व नुकसान झालेल्या प्रमाणात नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी खातगाव येथील शेतकऱ्यांनी कर्जत तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या पावसाळ्यात कर्जत तालुक्यातील विविध भागांत समाधानकारक पाऊस झाला. कर्जत मंडळात ८३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कर्जत तालुक्यातील सर्व पिकांचे पंचनामे झाले. खातगाव येथे पंचनामे झाले. परंतु, ते केवळ कागदावरच राहिले. पंचनाम्यासाठी आलेल्या पथकाने शेतकऱ्यांना बोलावून आवश्यक कागद घेतले. परंतु, ते शेतकऱ्यांच्या शेतात गेले नाहीत. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज आला नाही. परिणामी शेतकऱ्यांना तुटपुंजी नुकसान भरपाई मिळाली. काही शेतकरी तर नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. खातगाव शिवारातील पिकांचे पंचनामे नव्याने करावेत व सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी खातगाव येथील शेतकऱ्यांनी कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळेे यांच्याकडे केली आहे.

निवेदनावर सरपंच अर्जुन आटोळे, उपसरपंच उषा शिंदे, महेश ठाणगे, मच्छिंद्र गाढवे, महादेव गावडे राजाराम वाघ, मच्छिंद्र गायकवाड, देवराव शिंदे, नामदेव पाटोळे, अर्जुन तोरडमल, सुनिता फणसे, नानासाहेब रोटे, हनुमंत खाटमोडे, अंकुश पिटेकर, सत्तार शेख, बाळासाहेब येडे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.