शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लपंडावामुळे जेऊरच्या शेतकऱ्यांंचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:25 IST

केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयात बुधवारी सर्व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी अधिकाऱ्यांविरोधात संताप ...

केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयात बुधवारी सर्व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. कांदा लागवड सुरू असताना विजेचा लपंडाव सुरू असल्याने महावितरण कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी आक्रोश केला.

जेऊर परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्यास विलंब होत आहे. परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या मशागतीसाठी वापसा झालेला आहे. परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वीज नसल्याने शेतकऱ्यांचा राग अनावर झाला. परिसरातील शेतकऱ्यांनी जेऊर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. तेथे कोणीही लाईनमन अथवा अधिकारी उपस्थित नव्हते. वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन केला असता फोन घेतले जात नव्हते. कार्यालयातील दूरध्वनी ही अनेक दिवसांपासून बंदच आहे. शेतकऱ्यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा फोन बंद होता.

यावेळी शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. यापुढे कामात हलगर्जीपणा केल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला.

---

कनिष्ठ अभियंत्याची बदली करा

जेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्याचे कोणतेही कर्मचारी ऐकत नाहीत. त्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही. कामकाजात सुसूत्रता नाही. त्यामुळे येथील कनिष्ठ अभियंत्याची तत्काळ बदली करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

----

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड

कांदा लागवडीसाठी मजूर शेतामध्ये आल्यानंतर वीज नसल्याने कांदा लागवड कोरड्यात करावी लागत आहे. अथवा मजूर बसून राहतात. मजूर बसून राहिले तरी शेतकऱ्यांना त्यांची मजुरी द्यावीच लागते. अन्यथा इंजिनच्या साहाय्याने कांदा लागवड करावी लागते. त्यातही डिझेलचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी पडतो. याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

---

कार्यालयाला टाळे ठोकणार

जेऊर येथे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपसरपंच श्रीतेश पवार व माजी उपसरपंच बंडू पवार यांनी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडण्यास सांगितले. तसेच यापुढे महावितरण कंपनीच्या गलथान कारभारात सुधारणा न झाल्यास जेऊर कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.