शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

विजेच्या लपंडावामुळे जेऊरच्या शेतकऱ्यांंचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:25 IST

केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयात बुधवारी सर्व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी अधिकाऱ्यांविरोधात संताप ...

केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयात बुधवारी सर्व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. कांदा लागवड सुरू असताना विजेचा लपंडाव सुरू असल्याने महावितरण कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी आक्रोश केला.

जेऊर परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्यास विलंब होत आहे. परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या मशागतीसाठी वापसा झालेला आहे. परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वीज नसल्याने शेतकऱ्यांचा राग अनावर झाला. परिसरातील शेतकऱ्यांनी जेऊर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. तेथे कोणीही लाईनमन अथवा अधिकारी उपस्थित नव्हते. वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन केला असता फोन घेतले जात नव्हते. कार्यालयातील दूरध्वनी ही अनेक दिवसांपासून बंदच आहे. शेतकऱ्यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा फोन बंद होता.

यावेळी शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. यापुढे कामात हलगर्जीपणा केल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला.

---

कनिष्ठ अभियंत्याची बदली करा

जेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्याचे कोणतेही कर्मचारी ऐकत नाहीत. त्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही. कामकाजात सुसूत्रता नाही. त्यामुळे येथील कनिष्ठ अभियंत्याची तत्काळ बदली करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

----

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड

कांदा लागवडीसाठी मजूर शेतामध्ये आल्यानंतर वीज नसल्याने कांदा लागवड कोरड्यात करावी लागत आहे. अथवा मजूर बसून राहतात. मजूर बसून राहिले तरी शेतकऱ्यांना त्यांची मजुरी द्यावीच लागते. अन्यथा इंजिनच्या साहाय्याने कांदा लागवड करावी लागते. त्यातही डिझेलचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी पडतो. याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

---

कार्यालयाला टाळे ठोकणार

जेऊर येथे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपसरपंच श्रीतेश पवार व माजी उपसरपंच बंडू पवार यांनी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडण्यास सांगितले. तसेच यापुढे महावितरण कंपनीच्या गलथान कारभारात सुधारणा न झाल्यास जेऊर कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.