शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लपंडावामुळे जेऊरच्या शेतकऱ्यांंचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:25 IST

केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयात बुधवारी सर्व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी अधिकाऱ्यांविरोधात संताप ...

केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयात बुधवारी सर्व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. कांदा लागवड सुरू असताना विजेचा लपंडाव सुरू असल्याने महावितरण कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी आक्रोश केला.

जेऊर परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्यास विलंब होत आहे. परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या मशागतीसाठी वापसा झालेला आहे. परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वीज नसल्याने शेतकऱ्यांचा राग अनावर झाला. परिसरातील शेतकऱ्यांनी जेऊर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. तेथे कोणीही लाईनमन अथवा अधिकारी उपस्थित नव्हते. वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन केला असता फोन घेतले जात नव्हते. कार्यालयातील दूरध्वनी ही अनेक दिवसांपासून बंदच आहे. शेतकऱ्यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा फोन बंद होता.

यावेळी शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. यापुढे कामात हलगर्जीपणा केल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला.

---

कनिष्ठ अभियंत्याची बदली करा

जेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्याचे कोणतेही कर्मचारी ऐकत नाहीत. त्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही. कामकाजात सुसूत्रता नाही. त्यामुळे येथील कनिष्ठ अभियंत्याची तत्काळ बदली करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

----

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड

कांदा लागवडीसाठी मजूर शेतामध्ये आल्यानंतर वीज नसल्याने कांदा लागवड कोरड्यात करावी लागत आहे. अथवा मजूर बसून राहतात. मजूर बसून राहिले तरी शेतकऱ्यांना त्यांची मजुरी द्यावीच लागते. अन्यथा इंजिनच्या साहाय्याने कांदा लागवड करावी लागते. त्यातही डिझेलचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी पडतो. याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

---

कार्यालयाला टाळे ठोकणार

जेऊर येथे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपसरपंच श्रीतेश पवार व माजी उपसरपंच बंडू पवार यांनी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडण्यास सांगितले. तसेच यापुढे महावितरण कंपनीच्या गलथान कारभारात सुधारणा न झाल्यास जेऊर कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.