शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

विरोधी पक्षनेत्यांचे अपयश

By admin | Updated: July 7, 2014 00:36 IST

अहमदनगर : काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच सिंचन घोटाळा उघडकीस आणला. मात्र हा घोटाळा विरोधी पक्षनेत्यांनी उघडकीस आणायला हवा होता.

अहमदनगर : काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच सिंचन घोटाळा उघडकीस आणला. मात्र हा घोटाळा विरोधी पक्षनेत्यांनी उघडकीस आणायला हवा होता. त्यामध्ये ते कमी पडले, असे सांगून नाव न घेता विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी अप्रत्यक्ष हल्ला केला.जिल्ह्यामध्ये सारोळा बद्दी आणि नगर येथे भगवा सप्ताह आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले असता शासकीय विश्रामगृहावर कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संपर्कप्रमुख सुहास सामंत, आमदार अनिल राठोड, शहरप्रमुख संभाजी कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीराम येंडे उपस्थित होते.राज्यातील सिंचन योजनांवर ७५ हजार कोटी रुपये खर्च केले तरी राज्यामध्ये सिंचनाचा पत्ता नाही. आघाडी सरकारने अनेक घोटाळ््यांची चौकशी केली, भ्रष्टाचार मान्य केला, मात्र कोणावरही कारवाई झाली नाही. राज्यातील शेतकऱ्यांना संपविण्याचे खरे पाप काँग्रेस-राष्ट्रवादीनेच केले आहे, अशी टीकाही कदम यांनी केली. ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार घर तिथे शिवसेना अभियान राबविण्यात येत आहे. गरीब-शेतकरी यांना न्याय देण्यासाठी राज्यात बदल हवा आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही मनसे हात दाखवून अवलक्षण करून घेतील. दोन्ही काँग्रेसकडून सुपारी घेऊन त्यांनी (राज ठाकरे ) मराठी माणूस लोकसभेत जाऊ द्यायचा नाही, यासाठी शिवसेनेच्या विरोधात उमेद्वार उभे केले. (प्रतिनिधी)युती अभेद्य शिवसेना-भाजपा युती अभेद्य आहे. कार्यकर्त्यांना भावना असतात, त्या ते व्यक्त करतात. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन अशा नेत्यांनी ही युती तयार केली आहे, ती तुटणे अशक्य आहे. लोकसभेला भाजपाला जास्त जागा आणि विधानसभेला शिवसेनेला जास्त जागा हे युतीचे सूत्र आहे. महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ, तर भाजपा लहान भाऊ आहे. लोकसभेत उलटे आहे. शिवसेनेने कधी पंतप्रधानपदावर दावा केला का? असे सांगून रामदास कदम यांनी महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच राहील, हे स्पष्ट केले.सत्ता आल्यास मी गृहमंत्री....गेल्या ६७ वर्षांत काँग्रेस पाण्याचे समान वाटप करू शकली नाही. आघाडी सरकारने अनेक घोटाळे, भ्रष्टाचार केला. तो त्यांनी मान्य केला. चौकशी झाली. तरी कारवाई होत नाही. त्यामुळे युतीची सत्ता आल्यानंतर गृहमंत्रीपद माझ्याकडे घेणार आहे. भ्रष्ट मंत्र्यांच्या कुंडल्या तयार करण्याचे काम सुरू आहे. काँग्रेसच्या नेत्यांना दुष्काळ हवा असतो, तो पैसे खाण्यासाठीच. पाणी टंचाई हे त्यांच्याच सरकारचे पाप आहे, असे रामदास कदम म्हणाले.