शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीचे पाणीदेखील मानवी आरोग्याला अपायकारक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : मानवी शरीरात सरासरी सहा लीटर रक्त असते. त्यात शरीराच्या वजनाच्या ६० टक्के म्हणजेच ४.४ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : मानवी शरीरात सरासरी सहा लीटर रक्त असते. त्यात शरीराच्या वजनाच्या ६० टक्के म्हणजेच ४.४ लीटर पाण्याचे प्रमाण असते. याचा समतोल राखला गेला तर प्रकृती स्थिर राहते. मात्र, पाण्याचे कमी-अधिक प्रमाण झाल्यास शारीरिक व्याधींचा सामना करावा लागू शकतो. तसेच पाणी जास्त प्रमाणात पिल्यास किडनी विकार नसणाऱ्या रुग्णांमध्ये फारसा त्रास जाणवत नाही. मात्र, ज्यांना विकार आहे, त्यांनी जास्त पाणी पिल्यास तज्ज्ञांच्या मते शरीरासाठी ते अपायकारक ठरू शकते.

मानवी शरीरासाठी रक्ताबरोबरच पाण्याची गरज महत्त्वाची असते. आपल्या देशात उष्णता जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे २४ तासांत सरासरी ५ ते ५.५ लीटर पाण्याची मानवी शरीराला गरज असते. त्यातून प्रकृती स्थिर राहते. मात्र, कामाच्या स्वरूपानुसार पाण्याची मात्रा बदलू शकते. एसीमध्ये बसून कार्यालयीन कामकाज करणाऱ्या व्यक्तींनी ४.५ लीटर पाणी पिल्यास शरीराची गरज भागते. कारण, त्यांचे घामाचे प्रमाण कमी असते. याउलट जडकाम किंवा शेतीकाम करणाऱ्या व्यक्तींची पाण्याची मात्रा ही ५.५ ते ६ लीटर असते. कारण, दिवसभरातील कामाच्या माध्यमातून अशा व्यक्तींचा १.५ ते २ लीटर घाम निघतो, त्यातूनच शरीरातील पाण्याची मात्रा कमी होते. अशा व्यक्तींनी २४ तासांत ५ ते ५.५ लीटर पाणी प्यायले पाहिजे.

............

शरीरात पाणी कमी पडले तर...

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास लघवीचे इन्फेक्शन, मूतखडा होणे तसेच अतिसारातून अपचन, आम्लपित्त यासारखे विकार वर डोके काढू शकतात.

................

शरीरात पाणी जास्त झाले तर...

सहा ते सात लीटर पाणी पिल्यास वारंवार लघवीसाठी जावे लागू शकते. तसेच यातून शरीरातील सोडियम यासारखे घटक जास्त प्रमाणात जातात. ज्यांना किडनीचा विकार आहे, अशा व्यक्तींसाठी हे त्रासदायक ठरू शकते. मात्र, ज्यांना विकार नाही, त्यांना फारसा त्रास जाणवत नाही.

.........

कोणी किती प्यावे पाणी?

वयोगट २४ तासांत किती पाणी ( लीटरमध्ये)

नवजात ते १५ वर्षांपर्यंत - ३. ५ ते ४

१६ ते ६१ पेक्षा जास्त वर्षापर्यंत - ५ ते ५.५

............

तज्ज्ञ काय म्हणतात?

आपल्या देशात उष्णता जास्त असल्याने मानवी शरीराची पाण्याची मागणी जास्त असते. परंतु, कामाच्या स्वरूपानुसार पाण्याची मागणीदेखील बदलते. कमी किंवा जास्त कष्टाचे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये २४ तासांत सरासरी ४.५ ते ५.५ इतके पाणी पिणे अपेक्षित असते. तसेच सहा ते सात लीटर पाणी पिल्यास वारंवार लघवीसाठी जावे लागू शकते. तसेच यातून शरीरातील सोडियम यासारखे घटक जास्त प्रमाणात जातात. ज्यांना किडनीचा विकार आहे, अशा व्यक्तींसाठी हे त्रासदायक ठरू शकते. मात्र, ज्यांना विकार नाही, त्यांना फारसा त्रास जाणवत नाही.

- डॉ. निलेश सदावर्ते, युरोलॉजिस्ट, श्रीरामपूर

........

स्टार १२१०