शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
3
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
4
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
6
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
7
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
8
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
9
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
11
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
12
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
13
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
14
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
15
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
16
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
17
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
18
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
19
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
20
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 

‘मेक इन कोपरगाव’ हे देशापुढील उदाहरण

By admin | Updated: May 8, 2016 00:55 IST

कोपरगाव : विदेशीचा त्याग करून स्वदेशीचा स्वीकार करण्याचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला़ त्यानंतर घरोघरी चरखे आले़ त्यापासून बनलेले कापड वापरण्यात येत होते़

कोपरगाव : विदेशीचा त्याग करून स्वदेशीचा स्वीकार करण्याचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला़ त्यानंतर घरोघरी चरखे आले़ त्यापासून बनलेले कापड वापरण्यात येत होते़ ‘मेक इन इंडिया’ची सुरूवात गांधीजींनी केली़ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तीच संकल्पना राबवित आहेत़ त्यांची योजना ‘मेक इन कोपरगाव’ हा ग्रामीण भागातील उपक्रम महाराष्ट्रापुढेच नाही तर, देशासमोर चांगले उदाहरण असल्याचे मत केंद्रीय उद्योगमंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केले़ कोपरगाव व्यापारी महासंघाच्या वतीने आयोजित ‘मेक इन कोपरगाव’ या लघुउद्योग मशिनरी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ प्रारंभी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ़ स्नेहलता कोल्हे होत्या़ पालकमंत्री राम शिंदे, बिपीन कोल्हे, आशुतोष काळे, राजेश परजणे, प्रकाश कवडे, तुलसीदास खुबानी, सुनील चव्हाण, सुधीर डागा यांची व्यासपीठावर उपस्थिती होती़प्रारंभी कोपटाऊन अ‍ॅग्रो प्रोसेसिंग कंपनीचे उद्घाटन करण्यात आले़ त्यानंतर माजी मंत्री शंकरराव कोल्हे, कांतीलाल अग्रवाल, दौलतराव चव्हाण यांना तर स्व़ शंकरराव काळे व स्व़ धनराज भनसाळी यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़ गिरीराजसिंह म्हणाले, भारताच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे़ मोठ्या उद्योगांबरोबरच लघुउद्योगही मोठ्या प्रमाणात सुरू झाले पाहिजे़ ते ही शेतीशी निगडीत असावेत, जेणेकरून शेती पिकेल व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल़पालकमंत्री राम शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगावच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली़ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे यांनी उपक्रम राबविण्यामागचा हेतू स्पष्ट केला़ स्वागताध्यक्ष आशुतोष काळे यांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी हे प्रदर्शन फलदायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला़ (प्रतिनिधी)तीस लाख बेरोजगारांना नोकऱ्या देणार - सुभाष देसाईतरुणांच्या हाताला काम देण्याचे युती शासनाचे स्वप्न नाही, तर प्रतिज्ञा आहे़ ‘मेक इन महाराष्ट्र’च्या रुपाने ८ लाख कोटी रुपयांचे करार वेगवेगळ्या कंपन्यांनी केले आहेत़ नुसते करार करून आम्ही थांबलो नाही, उद्योग आलेच पाहिजे, यासाठी प्रयत्न केले़ १९८ उद्योगांना भूखंडाचे वाटप केले़ उद्योग सुरू झाल्यानंतर तीस लाख बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार आहेत़ कोपरगावमध्ये अ‍ॅग्रो प्रोसेसिंग क्लस्टर तयार करा, त्याला उद्योग खाते मदत करेल़ लघुउद्योगांसाठी औद्योगिक वसाहतीत भूखंड आरक्षित केले जाणार आहेत़ लघुउद्योगांना भांडवलासाठी दोन कोटीचे व्हेंचर कॅपिटल बँकेत उपलब्ध असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले़