शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘एकास एक’चे समीकरण हवेत विरले!

By admin | Updated: July 16, 2014 00:44 IST

श्रीगोंदा : एकास एक उमेदवार देऊन यंदा विधानसभा निवडणुकीत विजयाचा मार्ग सुकर करण्याची रणनिती आखणारे मतदारसंघातील काँग्रेसचे विविध गट प्रत्यक्ष घोडामैदान जवळ येण्यापूर्वीच दुभंगले आहेत.

श्रीगोंदा : एकास एक उमेदवार देऊन यंदा विधानसभा निवडणुकीत विजयाचा मार्ग सुकर करण्याची रणनिती आखणारे मतदारसंघातील काँग्रेसचे विविध गट प्रत्यक्ष घोडामैदान जवळ येण्यापूर्वीच दुभंगले आहेत. कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी अपक्ष दंड थोपटताच शिवाजीराव नागवडे गटानेही सरसावत सबुरीचा सल्ला दिला खरा, पण तो अव्हेरत जगताप पुढे निघाले आहेत.६ वेळा विधानसभा जिंकत आमदार बबनराव पाचपुते यांनी मतदारसंघातील काँग्रेस खिळखिळी केली. मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांना सातत्याने पाचपुतेंशी संघर्ष करावा लागला. पाचपुते विरोधक एकत्र आल्याशिवाय टिकाव लागणार नाही, याची पूर्ण कल्पना त्यांच्या विरोधकांना आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवाजीराव नागवडे, कुंडलीकराव जगताप, बाळासाहेब नहाटा, अण्णासाहेब शेलार, प्रा.तुकाराम दरेकर आदींनी पाचपुते विरोधात एकास एक उमेदवार देण्याची शपथ घेतली होती. मात्र दोन-अडीच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अर्धालाख मतांची आघाडी मिळाल्याने अनेकांना पाचपुतेंचा पराभव दिसू लागला. अनेकांच्या महत्वाकांक्षा पुन्हा जाग्या झाल्या. त्यात ‘एकास एक’ ही शपथही विरली. कुकडी कारखान्याचे अध्यक्ष आणि कुंडलीकराव जगताप यांचे चिरंजीव राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा करुन ‘एकास एक’ हा विषय काँग्रेसला थंडबस्त्यात टाकण्यास भाग पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्र्यंत परिस्थितीवर नजर ठेवून असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा हालचाली सुरु केल्या आहे. अद्यापही या गोटात एकास एक विषय जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उमेदवार निवडीचे अधिकार मिळाल्यानंतर नागवडे यांनी हा चेंडू बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्या कोर्टात टाकला आहे. मात्र जगताप परत फिरतील, ही शक्यता त्यांनी प्रत्यक्ष प्रचार सुरु केल्याने मावळली आहे. राष्ट्रवादी सोडून अपक्ष उमेदवारीसाठी सरसावलेले घनश्याम शेलार यांच्यामुळे आजच सामना पाचपुते-जगताप-शेलार असा तिरंगी झाला आहे. महायुतीकडून ही जागा भाजपाच्या वाट्याला आहे. जगताप यांच्यासह राजेंद्र म्हस्के, सुवर्णा पाचपुते, संतोष लगड, सेनेकडून प्रा. शशिकांत गाडे, राष्ट्रीय समाज पक्षाकडून बाळासाहेब नाहाटा अशी इच्छुकांची यादी लांबली आहे. त्यामुळे आगामी काळात श्रीगोंद्याचे रण तीव्र होण्याची शक्यता आहे.