शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

अभियंता पालवेंना सभागृहाबाहेर काढले

By admin | Updated: June 24, 2014 00:06 IST

अहमदनगर : जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे आणि कार्यकारी अभियंता दिलीप पालवे प्रकरणावरून गरमागरमीत सुरू झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अखेरपर्यंत गाजली.

अहमदनगर : जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे आणि कार्यकारी अभियंता दिलीप पालवे प्रकरणावरून गरमागरमीत सुरू झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अखेरपर्यंत गाजली. आरोग्य विभागाच्या कामकाजातील त्रुटी, बनावट अपंग प्रमाणपत्र प्रकरण, एक्सपे्रस फिडर या विषयांवर सभागृहात खडाजंगी होऊन सदस्यांनी कारभाराचे वाभाडे काढले.सभेच्या सुरूवातीला सदस्य राजेंद्र फाळके यांनी तुकाराम शेंडे यांचा कार्यकारी अभियंता पालवे यांनी अपमान केला असून अशा मुजोर अधिकाऱ्याला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही. पालवे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्या सोबतच त्यांना शासनाने परत बोलवावे असा ठराव करण्याची मागणी त्यांनी केली. सदस्य बाळासाहेब हराळ यांनी ही मागणी उचलून धरली. जिल्हा परिषदेतील अधिकारीशाही कोणत्या दिशेने चालली आहे, असा सवाल त्यांनी केला. त्यावर अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी पालवे यांनी सदस्य शेंडे यांची माफी मागितली आहे. त्यावर हराळ यांनी माफी मागून प्रश्न सुटणार नाही, पालवे सभागृहात थांबणार असतील तर सभागृह चालू न देण्याचा इशारा दिला. अखेर लंघे यांनी पालवे यांना सभागृहा बाहेर जाण्याचे आदेश दिले. फाळके यांनी पालवे यांच्या विरोधात ठराव करून शासनाला पाठविण्याची मागणी केली. हराळ यांनी याबाबत ठराव मांडला. सदस्य सुभाष पाटील यांनी पालवे प्रकरणाची चौकशी करूनच कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यावरून फाळके, हराळ विरूध्द पाटील असा शाब्दिक वाद रंगला. अखेर पाटील यांनी पालवे यांचेसोबत शेंडे यांनी दहा हजार रुपयांची लाच दिलेली असल्याने त्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली. अखेर अध्यक्ष लंघे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून आठ दिवसांत चौकशी करून पालवे दोषी आढळल्यास कारवाई करण्याचा निर्णय घेतला. अण्णासाहेब शेलार यांनी पालवे यांची चौकशी होईपर्यंत त्यांना रजेवर पाठविण्याची मागणी केली.प्रश्नोत्तराच्या तासात शरद नवले यांनी एक्सपे्रस फिडरबाबत विचारणा केली. दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या विद्युत विभागाने दिलेले उत्तर आजही कायम आहे. या लाईनसाठी जिल्हा परिषदेने ३४ लाख रुपये खर्च केलेले आहेत. तरीही वीज नसल्याबद्दल आणि अधिकारी वारंवार तेचतेच उत्तर देत असल्याचे नवल यांचे म्हणणे होते. संरक्षण विभागातील त्रुटी मार्गी लावण्याचे आश्वासन सदस्य सचिन जगताप यांनी दिले. दूषित पाणी प्रश्न हराळ यांनी आरोग्य अधिकारी डॉ. गंडाळ यांना धारेवर धरले. दूषित पाण्यामुळे भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत खराब होत आहेत. वाळकी गटात गेल्या वर्षी साथजन्य आजारात तिघांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ३० जागा रिक्त आहेत. १४ ठिकाणी शस्त्रक्रियागृह बंद आहेत. शिक्षकांच्या बनावट अपंग प्रकरणी हराळ यांनी प्रशासनाला धारेवर धरले. जिल्हा परिषदेने दोषी ठरवलेल्या पैकी ४८ शिक्षकांना साहय्यक आयुक्त चौकशी यांनी कसे निर्दोष ठरविले. जर ते निर्दाेष असतील जिल्हा प्रशासन दोषी का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांनी या प्रकरणी विभागीय आयुक्तांना सविस्तर अहवाल सादर करून मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करणार का? असा प्रश्न हराळ यांनी उपस्थित केला. या विषयावर जगताप, आझाद ठुबे यांनी चर्चा केली.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या गाडीचा दिवा बदला1सदस्य मिनाक्षी थोरात यांनी राज्यातील मुख्य कार्यकारी यांनी त्यांच्या गाडीवर पिवळ्या दिव्या ऐवजी निळा दिवा वापरण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत. मात्र, नगरमध्ये त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.2हरियाली योजनेत मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामुळे या योजनेत झालेल्या कामांची येत्या महिन्याभरात चौकशी करून अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे कॅफो अरूण कोल्हे यांनी सांगितले. 3मिरजगावात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेची रस्त्यावर प्रसृती झाली. यामुळे येथील प्राथमिक केंद्रातील डॉक्टरांवर कारवाई व्हावी अशी मागणी सदस्य परमवीर पांडूळे यांनी केली. अध्यक्ष लंघे यांनी डॉ. गंडाळ यांना आरोग्य बाबत गंभीर तक्रारी असल्याचे सुनावले. चापडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील त्रुटी दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. 4देशात लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएचे सरकार अस्तित्वात आले आहे. बहुमताने त्यांनी सत्ता मिळविली असल्याने जिल्हा परिषदेकडून अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. हा ठराव सदस्य अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी मांडला.