शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

गोदावरी नदीपात्रात पेटविलेले डंपर बेवारस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST

आता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला वाहनांच्या मालकांचे नाव शोधण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. नायगाव येथे घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली ...

आता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला वाहनांच्या मालकांचे नाव शोधण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. नायगाव येथे घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. शनिवारी (दि.२२) मध्यरात्री ग्रामस्थांनी येथे वाळूचे तीन डंपर पकडले होते. त्यानंतर पोलीस व महसूल प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली होती. तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांनी नियुक्त केलेले विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

यानंतर ही वाहने नदीपात्राबाहेर काढली जात असताना अचानकपणे अज्ञात लोकांनी दोन वाहनांचे टायर पेटविले होते. मात्र अंधारात हे कृत्य कोणी केले हे मात्र समजू शकले नाही. तालुका पोलीस ठाण्यात वाळू चोरीप्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामस्थांनी या कृत्याचा इन्कार केला होता. मात्र वाळू चोरीमुळे त्रस्त झाल्याने त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती.

दरम्यान, घटनेला आता आठ दिवस उलटून गेले आहेत. जळालेली दोन्ही वाहने पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या मालकांचा शोध लागलेला नाही. याबाबत तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला. ते म्हणाले, वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यासाठी आरटीओ कार्यालयाला पत्र देण्यात आले आहे. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे तेथील कामकाज बंद आहे. त्यामुळे अद्यापही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याबाबत माहिती मिळताच पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

-----------