शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ढिसाळ नियोजनामुळे होरपळली शेकडो हेक्टर शेती

By admin | Updated: May 5, 2017 12:55 IST

निळवंडे, भंडारदरा, आढळा असे तीन मोठे धरण आणि ११ छोटे धरण असलेल्या अकोले तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे होरपळली आहे़

आॅनलाइन लोकमतकोतूळ (अहमदनगर), दि़ ५ - निळवंडे, भंडारदरा, आढळा असे तीन मोठे धरण आणि ११ छोटे धरण असलेल्या अकोले तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे होरपळली आहे़ गेल्या पाच वर्षांपासून धरणांच्या बारमाही पाण्याच्या सुखद स्वप्नाने अकोले तालुक्यातील शेतकरी हुरळून गेला. मात्र कोतूळ, धामणगावपाट, पाडाळणे, अंभोळ, मोग्रस या पाच गावांतील शेकडो हेक्टर शेती पाण्याअभावी होरपळून गेली आहे़ या शेकडो हेक्टर क्षेत्रातले चारा, ऊस, डाळिंब, भाजीपाला पाण्याअभावी जळून खाक झाला आहे. पाटबंधारे विभागाचे ढिसाळ नियोजन व गाव पुढाऱ्यांच्या हट्टीपणामुळे धरणांच्या बॅकवॉटर पट्ट्यातील शेतीच जळून गेली असून, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.माजी मंत्री मधुकरराव पिचड, दिवंगत नेते यशवंत मेचकर, यमाजी लहामटे यांच्या प्रयत्नातून पश्चिम घाटातले पाणी वळवून पिंपळगाव, अंबित, कोथळा, देवहंडी, बलठण, घोटी या लघुप्रकल्पात पाणी आणले़ त्यातून या छोट्या धरणांमध्ये एकूण दीड टीएमसी पाणी साठले़ तर मुळा नदीवरील खडकी, शिसवद, साकिरवाडी, पैठण, पाडाळणे, धामणगावपाट, पिंपळगाव या कोतूळपर्यंतच्या पट्ट्यात असलेल्या बंधाऱ्यांमध्ये दीड टीएमसी पाणी साठले. मात्र पाडाळणे, धामणगावपाट, अंभोळ, मोग्रस, कोतूळ या गावातील शेतकऱ्यांना बेभरवशाच्या आवर्तनांनी देशोधडीला लावले़ ही गावे पिंपळगाव धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात येतात. पाडाळणे ते कोतूळ या आठ किलोमीटरच्या मुळा नदी काठावरच्या शेतकऱ्यांनी कोट्यावधींचे कर्ज काढून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतीसाठी पाणी पुरवठा योजना केल्या. मात्र जानेवारी महिन्यात कोतूळचा पूल वाहतुकीसाठी खुला व्हावा, म्हणून महाशिवरात्रीच्या निमित्ताने पिंपळगाव प्रकल्पातून एकाच आवर्तनात चाळीस टक्के पाणी सोडण्यात आले. त्यामुळे धामणगावपाट, मोग्रस, कोतूळचा अर्धा भाग गेल्या चार महिन्यांपासून पश्चिमेच्या अंबित, बलठण, घोटी, देवहंडी, कोथळा या प्रकल्पाच्या आवर्तनाची वाट पहात आहेत. मृत साठा वगळता या लघु प्रकल्पांत १७५ दलघनफुट पाणी शिल्लक आहे तर कोतुळ पर्यंत पाणी येण्यासाठी केवळ शंभर दलघनफुट पाणी लागते. मात्र पाणी वाटप निश्चित नसल्याने पाच गावातील शेतकऱ्यांची उभी पिके जळाली आहेत.