शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

जिरायत पट्ट्यात सुकाऴ, मात्र कुकडी लाभक्षेत्रात दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST

श्रीगोंदा : गेल्या वर्षी श्रीगोंदा तालुक्यात सरासरी पेक्षा जादा पर्जन्यमान झाले. यामुळे यंदा उन्हाळ्यात जिरायत पट्ट्यात पाण्याची परिस्थिती चांगली ...

श्रीगोंदा : गेल्या वर्षी श्रीगोंदा तालुक्यात सरासरी पेक्षा जादा पर्जन्यमान झाले. यामुळे यंदा उन्हाळ्यात जिरायत पट्ट्यात पाण्याची परिस्थिती चांगली आहे. मात्र कुकडी लाभक्षेत्रातील विहिरी, बोअर कोरडे पडू लागले आहेत. पिके पाण्याअभावी करपून चालली आहेत. आवर्तन सुटण्यास विलंब होत आहे. त्यामुळे कुकडीचे पाणी पेटणार आहे.

गेल्या वर्षी मेघराज मनमुरादपणे बरसला. जिरायत भागातील कोळगाव, चिखली, कोरेगाव, भानगाव, खांडगाव, उक्कडगाव, सुरेगाव, घुटेवाडी, मांडवगण, कोरेगाव, बांगर्डे, कामठी, ढोरजा, कोथूळ परिसरातील कधी न भरणारे पाझर तलाव तुडुंब भरले. जलशिवार योजनेमुळे पाणी जमिनीत मोठ्या प्रमाणावर जिरवले गेले. त्यामुळे भूगर्भातील पातळी पातळीवर उंचावली.

जानेवारी महिन्यात चिखली गावातील बोअर ओसांडून वाहत आहे. भानगावच्या जांभूळ नाला वाहत आहे. तलाव भरलेले आहेत. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात जिरायत पट्ट्यात पाण्याची परिस्थिती अतिशय चांगली राहणार यांचे संकेत आहेत. घोड, विसापूर, सीना धरणे भरले आहेत. दोन, तीन आवर्तने शेतीसाठी मिळणार आहेत. ही आवर्तन वेळेवर सोडली गेली पाहिजेत.

मात्र कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना एकच आवर्तन मिळणार आहे. त्यामुळे एप्रिल, मे, जून ते महिन्यात कुकडी लाभक्षेत्रातील पिकांची राख होणार आहे. त्याची सुरुवात आताच येळपणे, बेलवंडी, पिसोरे, शिरसगाव, चिंभळे, उक्कडगाव शिवारात झाली आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पिके वाचविण्यासाठी टँकरने विहिरीत पाणी सोडून हे पाणी पिक व पिण्यासाठी वापरले जात आहे. यंदा कुकडीचा डिंबे, माणिकडोह जोड बोगद्याचे काम झाले असते तर तीन आवर्तने कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मिळाली असती ही वस्तुस्थिती आहे.

....

कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मिळावे यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. एकाही नेत्याने डिंबे, माणिकडोह, जोड, बोगद्याच्या कामाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या कुकडी लाभक्षेत्रातील दुष्काळ हा शासन निर्मित राहणार आहे. यापुढे मंत्री खासदार आमदार यांना कुकडी लाभक्षेत्रातील फिरु दिले नाही पाहिजे.

-भगवान वैद्य, बेलवंडी.

.....

विसापूर लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. विसापूर तलावात तीन आवर्तना पुरेल ऐवढे पाणी शिल्लक असून देखील विसापुरचे पाणी सोडले जात नाही ही दुर्दैवाची बाब आहे. विसापुरचे २५ जानेवारीपासून आवर्तन न सोडल्यास बेलवंडी येथील भैरवनाथ मंदिरात उपोषण करणार आहे.

-संजय डाके, तालुकाध्यक्ष, समता परिषद, श्रीगोंदा.