शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जिरायत पट्ट्यात सुकाऴ, मात्र कुकडी लाभक्षेत्रात दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST

श्रीगोंदा : गेल्या वर्षी श्रीगोंदा तालुक्यात सरासरी पेक्षा जादा पर्जन्यमान झाले. यामुळे यंदा उन्हाळ्यात जिरायत पट्ट्यात पाण्याची परिस्थिती चांगली ...

श्रीगोंदा : गेल्या वर्षी श्रीगोंदा तालुक्यात सरासरी पेक्षा जादा पर्जन्यमान झाले. यामुळे यंदा उन्हाळ्यात जिरायत पट्ट्यात पाण्याची परिस्थिती चांगली आहे. मात्र कुकडी लाभक्षेत्रातील विहिरी, बोअर कोरडे पडू लागले आहेत. पिके पाण्याअभावी करपून चालली आहेत. आवर्तन सुटण्यास विलंब होत आहे. त्यामुळे कुकडीचे पाणी पेटणार आहे.

गेल्या वर्षी मेघराज मनमुरादपणे बरसला. जिरायत भागातील कोळगाव, चिखली, कोरेगाव, भानगाव, खांडगाव, उक्कडगाव, सुरेगाव, घुटेवाडी, मांडवगण, कोरेगाव, बांगर्डे, कामठी, ढोरजा, कोथूळ परिसरातील कधी न भरणारे पाझर तलाव तुडुंब भरले. जलशिवार योजनेमुळे पाणी जमिनीत मोठ्या प्रमाणावर जिरवले गेले. त्यामुळे भूगर्भातील पातळी पातळीवर उंचावली.

जानेवारी महिन्यात चिखली गावातील बोअर ओसांडून वाहत आहे. भानगावच्या जांभूळ नाला वाहत आहे. तलाव भरलेले आहेत. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात जिरायत पट्ट्यात पाण्याची परिस्थिती अतिशय चांगली राहणार यांचे संकेत आहेत. घोड, विसापूर, सीना धरणे भरले आहेत. दोन, तीन आवर्तने शेतीसाठी मिळणार आहेत. ही आवर्तन वेळेवर सोडली गेली पाहिजेत.

मात्र कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना एकच आवर्तन मिळणार आहे. त्यामुळे एप्रिल, मे, जून ते महिन्यात कुकडी लाभक्षेत्रातील पिकांची राख होणार आहे. त्याची सुरुवात आताच येळपणे, बेलवंडी, पिसोरे, शिरसगाव, चिंभळे, उक्कडगाव शिवारात झाली आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पिके वाचविण्यासाठी टँकरने विहिरीत पाणी सोडून हे पाणी पिक व पिण्यासाठी वापरले जात आहे. यंदा कुकडीचा डिंबे, माणिकडोह जोड बोगद्याचे काम झाले असते तर तीन आवर्तने कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मिळाली असती ही वस्तुस्थिती आहे.

....

कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मिळावे यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. एकाही नेत्याने डिंबे, माणिकडोह, जोड, बोगद्याच्या कामाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या कुकडी लाभक्षेत्रातील दुष्काळ हा शासन निर्मित राहणार आहे. यापुढे मंत्री खासदार आमदार यांना कुकडी लाभक्षेत्रातील फिरु दिले नाही पाहिजे.

-भगवान वैद्य, बेलवंडी.

.....

विसापूर लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. विसापूर तलावात तीन आवर्तना पुरेल ऐवढे पाणी शिल्लक असून देखील विसापुरचे पाणी सोडले जात नाही ही दुर्दैवाची बाब आहे. विसापुरचे २५ जानेवारीपासून आवर्तन न सोडल्यास बेलवंडी येथील भैरवनाथ मंदिरात उपोषण करणार आहे.

-संजय डाके, तालुकाध्यक्ष, समता परिषद, श्रीगोंदा.