शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रपंच उद्‌ध्वस्त करू नका, शेतात पाय ठेवू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी नव्याने हंगा व सुपा गावच्या शिवारातील शेतजमीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी नव्याने हंगा व सुपा गावच्या शिवारातील शेतजमीन भूसंपादन करण्यासाठी हरकती व सुनावणीसाठी संबंधित शेतकऱ्यांना मंगळवारी (दि.२३) बोलावण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. शेतकरी कुटुंबातील महिलांनी यावेळी आमचा प्रपंच उद्ध्व‌स्त करू नका. आमच्या शेतात पाऊल ठेऊ देणार नाही, अशी प्रखर भूमिका मांडत अधिकाऱ्यांना इशारा दिला.

प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी हंगा व सुपा येथील शेतकऱ्यांना हरकती घेण्यासाठी ही संधी आहे. कोणत्याही विकासासाठी उद्योगधंदे वाढले, तर रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध होतात. तरुणांना रोजगार, उद्योग व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होते. तर नवीन भूसंपादन करताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, सारिक उंडे, मंडलाधिकारी शिवाजी शिंदे, बाळासाहेब कुसमुडे, अशोक डोळस उपस्थित होते.

याावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शेती करणाऱ्या कुटुंबातील सदस्य जितीन साठे यांनी सांगितले की, ज्यांच्या फूल शेतीची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली. त्या शेतीवर तीन कुटुंबातील १५ माणसे अवलंबून आहेत. तेथे दोन एकर फुलशेती व तीन एकरवर भाजीपाला होतोय. असे क्षेत्र हिरावून घेऊ नका, अशी विनंती केली. हीच शेती आमचा उद्योग असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकाश दळवी या तरुणाने १९९१ मध्ये पहिल्यांदा एमआयडीसीसाठी अधिग्रहण केली. आता पुन्हा आमची शेती घेणार आहेत. आमच्या कुटुंबाने किती वेळा त्याग करायचा? आम्हाला आमचा गाव हवाय. त्यामुळे आम्हाला भूमिहीन करून शेतकऱ्यांची हेळसांड करू नका, असे आवाहन केले.

सुप्यातील येणारे कुटुंबीय दूध व्यवसायिक आहे. त्यांचे बागायत क्षेत्र गेले, तर व्यवसाय संपला असल्याची भीती अनिल येणारे, नाना येणारे, संतोष येणारे यांनी सांगितले.

.....

सरकार कुणाची आई होऊ शकत नाही

मंगल शिंदे यांनी शेती ही आमची माय आहे. सरकार कुणाची आई होऊ शकत नाही. मुलावर मी अन्याय होऊ देणार नाही. जिद्दीने प्रपंच उभा केलाय, असे सांगून ज्याला शेती द्यायची नाही त्याला आडकाठी करू नये, असे आवाहन केले. सरकार, पोलीस यंत्रणा यांना आम्ही घाबरत नाही, असेही ठणकावले.

छाया साठे यांनी आमची २० एकर शेती गेल्यावर पाच मुलांना घेऊन कुठे जाणार? तीन मुलींची लग्ने कशाच्या आधाराने करणार? मुलांच्या नोकरीची हमी कोण घेणार? असे प्रश्न विचारून आमचे पालन पोषण करणाऱ्या शेतीत कुणालाच पाऊल ठेवू देणार नाही, असे सुनावले.

.....

शेतकऱ्यांच्या लेखी, तोंडी हरकतीच्या नोंदी घेतल्या आहेत. ज्यांना नोटीस मिळाल्या नाहीत. त्यांनाही संधी दिली जाईल. हरकती, सुनावणी याचा अहवाल करून तो शासनाकडे पाठवला जाईल.

-सुधाकर भोसले, उपविभागीय अधिकारी

...

शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्या आहेत. जवळपास ३०० हरकती प्राप्त झाल्या आहेत. या सर्व हरकतींचा विचार करणार आहोत. आजच्या सुनावणी दरम्यान घेतलेल्या हरकती शेतकऱ्यांचे म्हणणे याचा अहवाल शासनाकडे पाठवला जाईल.

-नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, नाशिक विभाग