शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

प्रपंच उद्‌ध्वस्त करू नका, शेतात पाय ठेवू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी नव्याने हंगा व सुपा गावच्या शिवारातील शेतजमीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी नव्याने हंगा व सुपा गावच्या शिवारातील शेतजमीन भूसंपादन करण्यासाठी हरकती व सुनावणीसाठी संबंधित शेतकऱ्यांना मंगळवारी (दि.२३) बोलावण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. शेतकरी कुटुंबातील महिलांनी यावेळी आमचा प्रपंच उद्ध्व‌स्त करू नका. आमच्या शेतात पाऊल ठेऊ देणार नाही, अशी प्रखर भूमिका मांडत अधिकाऱ्यांना इशारा दिला.

प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी हंगा व सुपा येथील शेतकऱ्यांना हरकती घेण्यासाठी ही संधी आहे. कोणत्याही विकासासाठी उद्योगधंदे वाढले, तर रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध होतात. तरुणांना रोजगार, उद्योग व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होते. तर नवीन भूसंपादन करताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, सारिक उंडे, मंडलाधिकारी शिवाजी शिंदे, बाळासाहेब कुसमुडे, अशोक डोळस उपस्थित होते.

याावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शेती करणाऱ्या कुटुंबातील सदस्य जितीन साठे यांनी सांगितले की, ज्यांच्या फूल शेतीची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली. त्या शेतीवर तीन कुटुंबातील १५ माणसे अवलंबून आहेत. तेथे दोन एकर फुलशेती व तीन एकरवर भाजीपाला होतोय. असे क्षेत्र हिरावून घेऊ नका, अशी विनंती केली. हीच शेती आमचा उद्योग असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकाश दळवी या तरुणाने १९९१ मध्ये पहिल्यांदा एमआयडीसीसाठी अधिग्रहण केली. आता पुन्हा आमची शेती घेणार आहेत. आमच्या कुटुंबाने किती वेळा त्याग करायचा? आम्हाला आमचा गाव हवाय. त्यामुळे आम्हाला भूमिहीन करून शेतकऱ्यांची हेळसांड करू नका, असे आवाहन केले.

सुप्यातील येणारे कुटुंबीय दूध व्यवसायिक आहे. त्यांचे बागायत क्षेत्र गेले, तर व्यवसाय संपला असल्याची भीती अनिल येणारे, नाना येणारे, संतोष येणारे यांनी सांगितले.

.....

सरकार कुणाची आई होऊ शकत नाही

मंगल शिंदे यांनी शेती ही आमची माय आहे. सरकार कुणाची आई होऊ शकत नाही. मुलावर मी अन्याय होऊ देणार नाही. जिद्दीने प्रपंच उभा केलाय, असे सांगून ज्याला शेती द्यायची नाही त्याला आडकाठी करू नये, असे आवाहन केले. सरकार, पोलीस यंत्रणा यांना आम्ही घाबरत नाही, असेही ठणकावले.

छाया साठे यांनी आमची २० एकर शेती गेल्यावर पाच मुलांना घेऊन कुठे जाणार? तीन मुलींची लग्ने कशाच्या आधाराने करणार? मुलांच्या नोकरीची हमी कोण घेणार? असे प्रश्न विचारून आमचे पालन पोषण करणाऱ्या शेतीत कुणालाच पाऊल ठेवू देणार नाही, असे सुनावले.

.....

शेतकऱ्यांच्या लेखी, तोंडी हरकतीच्या नोंदी घेतल्या आहेत. ज्यांना नोटीस मिळाल्या नाहीत. त्यांनाही संधी दिली जाईल. हरकती, सुनावणी याचा अहवाल करून तो शासनाकडे पाठवला जाईल.

-सुधाकर भोसले, उपविभागीय अधिकारी

...

शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्या आहेत. जवळपास ३०० हरकती प्राप्त झाल्या आहेत. या सर्व हरकतींचा विचार करणार आहोत. आजच्या सुनावणी दरम्यान घेतलेल्या हरकती शेतकऱ्यांचे म्हणणे याचा अहवाल शासनाकडे पाठवला जाईल.

-नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, नाशिक विभाग