शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तीनंतर करताहेत कुटुंब जोडण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST

वाळकी : सद्यस्थितीत विभक्त कुटुंब पद्धतीमुळे समाजातील एकमेकांनी एकमेकांशी नाते जोडणे अवघड झाले आहे. त्यामुळे विवाहाच्या माध्यमातून कुटुंबे जोडण्यासाठीही ...

वाळकी : सद्यस्थितीत विभक्त कुटुंब पद्धतीमुळे समाजातील एकमेकांनी एकमेकांशी नाते जोडणे अवघड झाले आहे. त्यामुळे विवाहाच्या माध्यमातून कुटुंबे जोडण्यासाठीही सहजासहजी कोणी पुढे येत नाही. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सेवानिवृत्तीनंतर दोन अधिकाऱ्यांनी कुटुंब जोडण्याचा ध्यास घेतला. वयाची साठी पूर्ण झाली असली तरी दोघेही विनामोेबदला वधू -वर सूचक मंडळ व्हाॅट्सअप ग्रुपच्या माध्यमातून काम करीत आहेत. नगर तालुक्यातील वाळकी येथील प्रा. रमाकांत बोठे व यशवंत निघुते या दोघांनी जवळपास ४०० कुटुंबे एकमेकांना जोडली आहेत.

प्रा. रमाकांत बोठे यांनी लोणी येथे ३५ वर्षे नोकरी केली तर यशवंत निघुते यांनी पाटबंधारे खात्यात लिपिक म्हणून ३४ वर्षे नोकरी केली. समाजातील दरी दूर करण्यासाठी या दोघांनी व्हाॅट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कुटुंब जोडण्याचे काम सुरू केले आहे.

अनेक समाजात योग्य विवाहस्थळ मिळत नसल्याने तरुण-तरुणींचे विवाह रखडल्याची उदाहरणे आहेत. या प्रश्नाची जाणीव ठेवून बोठे, निघुते यांनी समाजातील विवाह जोडण्याचे काम सुरू केले. त्यांच्याकडे बायोडाटा आल्यानंतर वधू-वरांच्या पालकांना ते संपर्क करतात. अपेक्षा विचारतात. परिसरातील त्यांच्या पाहण्यातील वर किंवा वधू ते शोधतात. त्यानंतर वधू-वराच्या पालकांशी संपर्क करून पुढील जबाबदारी पार पाडतात. आतापर्यंत मध्यस्थाशिवाय २०० हून अधिक विवाह व्हाॅट्सअप ग्रुपच्या माध्यमातून घडवून आणले आहेत. या ग्रुपमध्ये नियमावली केली आहे. नियम सुरुवातीला सांगितले जातात. त्यानंतरच ग्रुपमध्ये घेतले जाते. दोघांचेही ग्रुपवर बारकाईने लक्ष असते. हे कार्य ते विनामूल्य करत आहेत.

...............

सध्या दिवसेंदिवस मुलींचा जन्मदर घटत आहे. त्याचा परिणाम सर्वच जाती -धर्मातील मुलांच्या लग्नावर झाला आहे. काही समाजात तर मुली मिळत नसल्याने आंतरजातीय लग्नाशिवाय पर्याय उरलेला नाही. काही समाज अजूनही रूढी, परंपरेला चिकटून बसलेला आहे. आपल्याला हवे तसेच स्थळ मिळावे, अशी प्रत्येक मुला-मुलीची इच्छा असते. प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. दोन्ही बाजूच्या अनेक अपेक्षा असतात. त्यामध्ये कुठेतरी जुळवाजुळव करावी लागते. त्यामुळे आम्ही विवाहाच्या माध्यमातून कुटुंब जोडत आहोत.

- प्रा. रमाकांत बोठे, यशवंत निघुते

फोटो आहेत