शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:57 IST

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर (माळवाडी) येथे शुक्रवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा ...

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर (माळवाडी) येथे शुक्रवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्या रोहिणी निघुते या वेळी उपस्थित होत्या.

आमदार विखे पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ३९१ वर्षांनंतरही तेवढ्याच उत्साहाने साजरी होणे याचे महत्त्व मोठे आहे. परंतु छत्रपतींच्या नावाने राजकारण करून सत्तेचे पद मिळवलेल्या शिवसेनेने महाराजांच्या जयंती दिनाचे महत्त्व कमी करण्याचा निर्णय करावा, याचे आश्चर्य वाटते. एकीकडे कोरोनाचे कारण सांगून जयंती दिनाच्या कार्यक्रमावर बंधने आणली जातात. मात्र, दुसरीकडे सतेत भागीदार असलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभात कोरोनाचे नियम तोडून गर्दी होते. राज्यात मंत्र्यांचे दौरे गर्दीतच सुरू आहेत हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाहीत का, असेही विखे म्हणाले.

-------------

हेच सरकार शेतकऱ्यांची वीज तोडत आहे

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ग्रामीण भागातील समस्या वाढल्या आहेत. कोरोनाच्या संकटात या सरकारने जनतेला कोणताही दिलासा दिला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून या देशातील प्रत्येक समाज घटकांना दिलासा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना केंद्र सरकार मदत करत आहे. पण केंद्राच्या नावाने टाहो फोडणारे महाविकास आघाडी सरकार आज शेतकऱ्यांची वीज तोडायला निघाले आहे. दिल्लीत आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या दिसत नाहीत, हे दुर्दैवच, असेही विखे म्हणाले.