राहुरी : दक्षिण जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणाचा पाणीसाठा झपाट्याने खालावत असून, उजवा कालवा बंद होण्याच्या मार्गावर आहे़ शिल्लक पाण्याचा अहवाल पाटबंधारे खात्याने दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाण्याचा ताबा जाणार आहे़२६००० दलघफू पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या ५४०५ दलघफू साठा शिल्लक आहे़ यातील जीवंत साठा केवळ ९०६ दलघफू राहिला आहे. उजव्या कालव्यातून सध्या ८३३ क्युसेकने आवर्तन सुरू असून, आतापर्यंत शेतीसाठी ६२७८ दलघफू पाण्याचा वापर करण्यात आला आहे़ शिवाय डाव्या कालव्यातून ७०६ दलघफू पाणी वापरण्यात आले. मुळा धरणाचा डावा क ालवा पंधरा दिवसांपूर्वी बंद करण्यात आला आहे़ उजवा कालवा कधी बंद होईल व किती क्षेत्र भरेल याबाबत अद्याप पाटबंधारे खाते अनभिज्ञ आहे़ उजव्या कालव्यातून पाणी निम्म्याने कमी करण्यात आले आहे़ या कालव्याखालील भरणे पूर्ण झाले आहे, तरी पाणी सुरूच आहे. हे पाणी आताओढ्या-नाल्यातून वाया जात आहे. उजव्या कालव्याखाली अंदाजे एक लाख, तर डाव्या कालव्याखाली सोळा हजार हेक्टर क्षेत्र आहे़ उजव्या कालव्याखाली पाण्याची उधळपट्टी होत असल्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी)मुसळवाडी तलाव कोरडाचमुळा उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होत असताना डावा कालवा पंधरा दिवसांपूर्वीच बंद झालेला आहे़ उजव्या कालव्याखालील सर्व बंधारे पाण्याने भरून घेण्यात आले. मात्र डाव्या कालव्याखालील मुसळवाडी तलावावर नऊ गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अवलंबून असतानाही पाणी सोडण्यात आले नाही़ जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करूनही या तलावात पाणी सोडण्यास मुहूर्त मिळालेला नाही़
मुळा धरण खपाटीला
By admin | Updated: June 11, 2014 00:17 IST