शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

त्रयस्थ संस्थेकडून कामांची कागदाेपत्री तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:21 IST

अहमदनगर : महापालिकेमार्फत शासकीय योजनेतील केल्या जाणाऱ्या विकासकामांची त्रयस्थ संस्थेकडून कागदोपत्री तपासणी होत असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची ...

अहमदनगर : महापालिकेमार्फत शासकीय योजनेतील केल्या जाणाऱ्या विकासकामांची त्रयस्थ संस्थेकडून कागदोपत्री तपासणी होत असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केली आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे करण्यात येतात. या कामांसाठी शासनाकडून निधी मिळत असला तरी ही कामे महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात येतात. आशा कामांची बिले काढताना त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात तपासणी न करता कागदोपत्री तपासणी सुरू असल्याबाबतची तक्रार सेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केली आहे. त्यामुळे त्रयस्थ संस्थेकडून होणाऱ्या तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, बांधकामासाठी वापरले जाणारे सिमेंट, खडी, डांबर आदी साहित्य तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडून तपासण्यात येते. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर ते अंदाजपत्रकानुसार झाले आहे किंवा नाही, याबाबतची तपासणीही तंत्रनिकेतनमधील प्राध्यापकांकडून केली जाते. बांधकाम साहित्याची तपासणी करणाऱ्या संस्था थर्ड पार्टी कशी होऊ शकते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

विकासकामांच्या तपासणीबदल्यात कामाच्या एक टक्का रक्कम ठेकेदरांना संस्थेकडे जमा करावी लागते. तसेच एक टक्के रकमेवर १८ जीएसटी ठेकेदाराला द्यावी लागते. ही रक्कम तंत्रनिकेतन महाविद्यालयाला मिळते. परंतु, त्या बदल्यात ही संस्था खरंच विकासकामांची जागेवर येऊन तपासणी करते का, जर कामांची संस्था केली असेल तर किती कामांमध्ये अनियमितता आढळली. त्रयस्थ संस्थेने अक्षेप घेतलेल्या किती ठेकेदारांवर महापालिकेने कारवाई केली, यासह अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले झाले आहेत. त्यामुळे त्रयस्थ संस्थेकडून केली जाणारी तपासणी यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

...

बांधकाम साहित्य व थर्ड पार्टी तंत्रनिकेतनकडेच

महापालिकेच्या विकासकामांसाठी वापरले जाणारे बांधकाम साहित्य तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडून तपासले जाते. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर हे काम अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार झाले किंवा नाही, याचीही तपासणी तंत्रनिकेतनकडूनच केली जाते. एकाच संस्थेकडून दोन्ही तपासण्या करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का, असा प्रश्न अनुत्तरित आहे.