शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST

केडगाव : यंदाच्या मोसमात गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस होऊनही शेतकऱ्यांसमोरील अडचणीचे ढग निवळण्याचे नाव घेत नाही. अतिवृष्टीने ...

केडगाव : यंदाच्या मोसमात गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस होऊनही शेतकऱ्यांसमोरील अडचणीचे ढग निवळण्याचे नाव घेत नाही. अतिवृष्टीने शेतीमाल सडला. नंतर रोगराईने उत्पन्नाच्या आशाही धुळीस मिळाल्या. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अवकाळी पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

दुष्काळी नगर तालुक्यात रब्बी हंगामात एक लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीचे उत्पादन घेतले जाते. कायमस्वरूपी दुष्काळाशी सामना करणाऱ्या नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने मोठा आनंद झाला. पाणी टंचाई हटणार, उत्पादन वाढणार अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्या. मात्र अतिपाऊस, रोगराई, विजेच्या खेळखंडोब्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले. अतिपावसाने खरीप पिकांना मोठा फटका बसला. पावसामुळे शेत उपाळल्याने कांदा रोपे, भाजीपाला, सोयाबीन, बाजरी, कापूस, भुईमूग, मूग आदी पिके शेतातच सडली. त्यामुळे खरीप पिकांसाठी केलेला खर्च पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसली

...

विजेचा खेळखंडोबा सुरूच

नगर तालुक्यातील पिके महावितरणच्या गलथान कारभारामुळे पाण्याअभावी वाया जाण्याची शक्यता वाढली आहे. तालुक्यात यावर्षी मुबलक पाणी आहे. मात्र गावोगावी वीज रोहित्र नादुरुस्त होत आहेत. नादुरुस्त रोहित्र बदलण्यास महावितरणचे कर्मचारी टाळाटाळ करत आहेत. अनेक ठिकाणी थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. सतत नादुरुस्त होणाऱ्या वीज रोहित्रामुळे पाणी असूनही पाण्याअभावी शेत पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. जळणारी पिके पाहवत नसल्याने शेतकऱ्यांकडून डिझेल इंजिनचा पिकांना पाणी देण्यासाठी वापर केला जात आहे. वाढलेले डिझेलचे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत.

....

फळांचीही गळ वाढली

संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा फळांना सततच्या ढगाळ हवामानाचा फटका बसत आहे. फळे गळून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत.

....

पाऊस चांगला होऊनही शेतकऱ्यांसमोरील संकट दूर होत नाही. अति पावसाने पीक मातीमोल झाली. रब्बीतील पिकांना रोगाने ग्रासले. त्यात भर म्हणून विजेचे संकट निर्माण झाले आहे. वारंवार रोहित्र जळत आहे. जळालेले रोहित्र महावितरण वेळेवर दुरुस्त करून देत नाही. पाणी मुबलक आहे, पण वीज नाही. शेतकरी नादुरूस्त रोहित्र बदलण्याची मागणी महावितरणकडे करत आहेत.

-तुकाराम लांडगे, शेतकरी, सारोळा बद्धी, नगर तालुका.