शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST

केडगाव : यंदाच्या मोसमात गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस होऊनही शेतकऱ्यांसमोरील अडचणीचे ढग निवळण्याचे नाव घेत नाही. अतिवृष्टीने ...

केडगाव : यंदाच्या मोसमात गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस होऊनही शेतकऱ्यांसमोरील अडचणीचे ढग निवळण्याचे नाव घेत नाही. अतिवृष्टीने शेतीमाल सडला. नंतर रोगराईने उत्पन्नाच्या आशाही धुळीस मिळाल्या. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अवकाळी पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

दुष्काळी नगर तालुक्यात रब्बी हंगामात एक लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीचे उत्पादन घेतले जाते. कायमस्वरूपी दुष्काळाशी सामना करणाऱ्या नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने मोठा आनंद झाला. पाणी टंचाई हटणार, उत्पादन वाढणार अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्या. मात्र अतिपाऊस, रोगराई, विजेच्या खेळखंडोब्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले. अतिपावसाने खरीप पिकांना मोठा फटका बसला. पावसामुळे शेत उपाळल्याने कांदा रोपे, भाजीपाला, सोयाबीन, बाजरी, कापूस, भुईमूग, मूग आदी पिके शेतातच सडली. त्यामुळे खरीप पिकांसाठी केलेला खर्च पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसली

...

विजेचा खेळखंडोबा सुरूच

नगर तालुक्यातील पिके महावितरणच्या गलथान कारभारामुळे पाण्याअभावी वाया जाण्याची शक्यता वाढली आहे. तालुक्यात यावर्षी मुबलक पाणी आहे. मात्र गावोगावी वीज रोहित्र नादुरुस्त होत आहेत. नादुरुस्त रोहित्र बदलण्यास महावितरणचे कर्मचारी टाळाटाळ करत आहेत. अनेक ठिकाणी थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. सतत नादुरुस्त होणाऱ्या वीज रोहित्रामुळे पाणी असूनही पाण्याअभावी शेत पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. जळणारी पिके पाहवत नसल्याने शेतकऱ्यांकडून डिझेल इंजिनचा पिकांना पाणी देण्यासाठी वापर केला जात आहे. वाढलेले डिझेलचे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत.

....

फळांचीही गळ वाढली

संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा फळांना सततच्या ढगाळ हवामानाचा फटका बसत आहे. फळे गळून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत.

....

पाऊस चांगला होऊनही शेतकऱ्यांसमोरील संकट दूर होत नाही. अति पावसाने पीक मातीमोल झाली. रब्बीतील पिकांना रोगाने ग्रासले. त्यात भर म्हणून विजेचे संकट निर्माण झाले आहे. वारंवार रोहित्र जळत आहे. जळालेले रोहित्र महावितरण वेळेवर दुरुस्त करून देत नाही. पाणी मुबलक आहे, पण वीज नाही. शेतकरी नादुरूस्त रोहित्र बदलण्याची मागणी महावितरणकडे करत आहेत.

-तुकाराम लांडगे, शेतकरी, सारोळा बद्धी, नगर तालुका.