शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST

केडगाव : यंदाच्या मोसमात गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस होऊनही शेतकऱ्यांसमोरील अडचणीचे ढग निवळण्याचे नाव घेत नाही. अतिवृष्टीने ...

केडगाव : यंदाच्या मोसमात गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस होऊनही शेतकऱ्यांसमोरील अडचणीचे ढग निवळण्याचे नाव घेत नाही. अतिवृष्टीने शेतीमाल सडला. नंतर रोगराईने उत्पन्नाच्या आशाही धुळीस मिळाल्या. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अवकाळी पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

दुष्काळी नगर तालुक्यात रब्बी हंगामात एक लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीचे उत्पादन घेतले जाते. कायमस्वरूपी दुष्काळाशी सामना करणाऱ्या नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने मोठा आनंद झाला. पाणी टंचाई हटणार, उत्पादन वाढणार अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्या. मात्र अतिपाऊस, रोगराई, विजेच्या खेळखंडोब्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले. अतिपावसाने खरीप पिकांना मोठा फटका बसला. पावसामुळे शेत उपाळल्याने कांदा रोपे, भाजीपाला, सोयाबीन, बाजरी, कापूस, भुईमूग, मूग आदी पिके शेतातच सडली. त्यामुळे खरीप पिकांसाठी केलेला खर्च पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसली

...

विजेचा खेळखंडोबा सुरूच

नगर तालुक्यातील पिके महावितरणच्या गलथान कारभारामुळे पाण्याअभावी वाया जाण्याची शक्यता वाढली आहे. तालुक्यात यावर्षी मुबलक पाणी आहे. मात्र गावोगावी वीज रोहित्र नादुरुस्त होत आहेत. नादुरुस्त रोहित्र बदलण्यास महावितरणचे कर्मचारी टाळाटाळ करत आहेत. अनेक ठिकाणी थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. सतत नादुरुस्त होणाऱ्या वीज रोहित्रामुळे पाणी असूनही पाण्याअभावी शेत पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. जळणारी पिके पाहवत नसल्याने शेतकऱ्यांकडून डिझेल इंजिनचा पिकांना पाणी देण्यासाठी वापर केला जात आहे. वाढलेले डिझेलचे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत.

....

फळांचीही गळ वाढली

संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा फळांना सततच्या ढगाळ हवामानाचा फटका बसत आहे. फळे गळून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत.

....

पाऊस चांगला होऊनही शेतकऱ्यांसमोरील संकट दूर होत नाही. अति पावसाने पीक मातीमोल झाली. रब्बीतील पिकांना रोगाने ग्रासले. त्यात भर म्हणून विजेचे संकट निर्माण झाले आहे. वारंवार रोहित्र जळत आहे. जळालेले रोहित्र महावितरण वेळेवर दुरुस्त करून देत नाही. पाणी मुबलक आहे, पण वीज नाही. शेतकरी नादुरूस्त रोहित्र बदलण्याची मागणी महावितरणकडे करत आहेत.

-तुकाराम लांडगे, शेतकरी, सारोळा बद्धी, नगर तालुका.