शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

रेल्वे गेट बंद केल्याने ग्रामस्थांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:21 IST

राहुरी रेल्वे स्टेशन येथे भुयारी मार्गाचे काम सुरू असून, हे काम पूर्ण होण्यास अजून २० ते २५ दिवसांचा ...

राहुरी रेल्वे स्टेशन येथे भुयारी मार्गाचे काम सुरू असून, हे काम पूर्ण होण्यास अजून २० ते २५ दिवसांचा अवधी बाकी आहे. मात्र या ठिकाणी पर्यायी व्यवस्था नसताना व काम बाकी असताना रेल्वे विभागाने २९ मार्च रोजी सकाळी राहुरी रेल्वे स्टेशन येथील गेट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला असून, तसा राहुरी रेल्वे स्टेशन येथील रेल्वे प्रबंधक यांना संदेश देण्यात आला आहे, तर रेल्वे स्टेशन येथील गेटवर रेल्वेच्या कामासाठी गेट २६ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचा फलक लावण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत राहुरी तालुका रेल्वे प्रवासी संघटना व प्रमुख ग्रामस्थांनी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना निवेदन दिले.

उपसभापती रवींद्र आढाव, उपसरपंच बाळासाहेब पेरणे, माजी संचालक शरदराव पेरणे, सरपंच संदीप म्हसे, अनिल पेरणे, प्रवाशी संघटनेचे सचिव मंगल जैन, सर्जेराव म्हसे, मधुकर धसाळ, विकास कल्हापुरे, भाऊसाहेब देशमुख, केशव पेरणे, लक्ष्मण पेरणे, चंद्रभान पेरणे, गंगाधर पेरणे, विनित धसाळ आदी उपस्थित होते.

..........

पर्याय काढण्याची गरज

तहसीलदार शेख यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत निर्माण झालेली समस्या निदर्शनास आणून देत पर्याय काढावा अशा सूचना केल्या आहेत. राहुरी रेल्वे स्टेशन येथे भुयारी मार्गाचे ठिकाणी दोन्ही बाजूंनी खोदकाम झालेले असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर दूध उत्पादक, शेतकरी, सामान्य नागरिक यांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाल्याने या प्रश्नी लवकर मार्ग न काढल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.