शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, महाबीज यांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:16 IST

संयुक्त कामगिरीमुळे शेतकऱ्यांचा फायदा राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण देशातील शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत. विद्यापीठाने विकसित ...

संयुक्त कामगिरीमुळे शेतकऱ्यांचा फायदा

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण देशातील शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत. विद्यापीठाने विकसित केलेल्या आठ पिकांच्या वाणांमुळे शेतकऱ्यांना आत्तापर्यंत १ लाख कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. दरवर्षी विद्यापीठ विकसित वाणांपासून सहा हजार कोटींचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. यापुढे कृषी विभाग, कृषी विद्यापीठे आणि महाबीज यांनी एकत्र येऊन कृषी माल विपणनावर काम करणे गरजेचे आहे, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी सांगितले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगामासाठीच्या विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठकीचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी पाटील बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते. याप्रसंगी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावाल, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक शरद गडाख, अधिष्ठाता (कृषी) अशोक फरांदे, कृषी परिषदेचे विस्तार शिक्षण संचालक विठ्ठल शिर्के उपस्थित होते.

कृषी आयुक्त धीरज कुमार म्हणाले, यावर्षी पावसाचा चांगला अनुमान आहे. या पावसाचा फायदा घेण्यासाठी कृषी विज्ञान व तंत्रज्ञान याची जोड देणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांची जमीनधारणा कमी होत आहे. शेती फायदेशीर करायची असेल तर पीक निविष्ठांवरील खर्च कमी करणे, छोट्या शेतकऱ्यांना परवडेल, अशा यंत्र सामुग्रीची निर्मिती करणे गरजेचे आहे.

महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावाल म्हणाले, आंतर संस्थात्मक सहभागावर भर दिल्यामुळे खरीप हंगामातील विविध पिकांच्या बिजोत्पादनात वाढ होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. याप्रसंगी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक शरद गडाख यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले वाण व शिफारशी आणि विस्तार उपक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी मिलिंद देशमुख, पंकज पाटील, अजय कुचे यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केले. विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, कोल्हापूरचे विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ यांनी विभागीय खरीप अहवालाचे सादरीकरण केले. स्वागत पंडित खर्डे यांनी केले. भगवान देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. आभार गोकुळ वामन यांनी मानले.