शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

जामखेडचा आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST

जामखेड : कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून भाजी बाजार व शनिवारचा आठवडे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर ...

जामखेड : कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून भाजी बाजार व शनिवारचा आठवडे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यांना उपजीविका करणे अवघड झाले आहे. सध्या शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आठवडे बाजार त्वरित सुरू करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

यावेळी आजबे म्हणाले, कष्टकरी, सर्वसामान्य शेतकरी व ज्यांचे हातावर पोट आहे, अशा व्यक्तींसाठी शनिवारचा आठवडे बाजार अत्यंत महत्त्वाचा आहे.

आठवडे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचा भाजीचा माल अर्ध्या किमतीत व्यापारी खरेदी करतात. जनावरांचीही विक्री होत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे आठवडे बाजार चालू करून शेतकऱ्यांची लूट थांबविण्याची मागणी आजबे यांनी केली.

तहसीलदार विशाल नाईकवाडे म्हणाले, तालुक्यातील ५५ ग्रामपंचायत कोरोनामुक्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या मागणीची दखल घेऊन संबंधितांची बैठक घेऊन लवकरात लवकर आठवडे बाजार चालू करण्याची ग्वाही दिली.

यावेळी तालुका युवक अध्यक्ष राहुल पवार, माजी सरपंच कृष्णाराजे चव्हाण, जिल्हा परिषद गटप्रमुख ऋषिकेश डुचे, शहराध्यक्ष भाऊसाहेब डोके, उपशहर प्रमुख नितीन जगताप, गावपातळीवरील शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.