शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

आबांना हटवा

By admin | Updated: June 25, 2014 00:30 IST

अहमदनगर : राज्यात दलित, मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. आरोपींना शिक्षा लागण्यासाठी आवश्यक असलेल्या तपास कामात पोलीस निष्क्रियता दाखवित आहेत.

अहमदनगर : राज्यात दलित, मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. आरोपींना शिक्षा लागण्यासाठी आवश्यक असलेल्या तपास कामात पोलीस निष्क्रियता दाखवित आहेत. पोलिसांकडूनच आरोपींना संरक्षण मिळत आहे. पोलीस खात्यावर गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा कोणताही वचक राहिलेला नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तातडीने आर. आर. पाटील यांना हटवून त्यांच्या जागी दुसरा सक्षम गृहमंत्री नियुक्त करावा, अशी मागणीच काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत केली. दलवाई म्हणाले, खर्डा, सोनई, आष्टी, पुणे आदी ठिकाणी दलित, मुस्लिमांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये झालेल्या हत्या अमानुषपणे करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी योग्य तपास करून आरोपींना शिक्षा होईल, अशा पद्धतीने वकिलांना माहिती देणे अपेक्षित आहे. मात्र पोलीस या कामी निष्क्रिय झाले आहेत. ते नेमके कोणाचे काम करतात, असा संशय आहे. पोलिसांचा समाजावर वचक राहिलेला नाही. पोलीस यंत्रणाच सुस्त झाली आहे. पोलीस खात्यावर आर. आर. पाटील यांचा वचक राहिलेला नाही. पोलिसांवर आबांचा प्रभावही पडत नाही. गतिमान पद्धतीने तपास होऊन शिक्षा झाली तरच पोलिसांचा वचक राहतो. मात्र राज्यात शिक्षा लागण्याचे प्रमाण फक्त अडीच टक्के आहे. त्या तुलनेत बिहार, उत्तरप्रदेशसारख्या राज्यात शिक्षा लागण्याचे प्रमाण अनुक्रमे ३५ व ५० टक्के आहे. त्यामुळे पोलीस खाते किती निष्क्रिय आहे, याची प्रचिती येते. याचा विचार करून शरद पवार यांनी तातडीने राज्याचा गृहमंत्री बदलावा. अत्याचाराची घटना झाली की उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जाते. खैरलांजी प्रकरणाचा निकाल काय लागला, यावरून निकम यांची कार्यपद्धतीही संशयास्पद वाटते. त्यामुळे निकम यांची नियुक्ती या प्रकरणात करू नये. सगळ््याच गोष्टींना काही निकम हे एकमेव उत्तर नाही. ...तर आमचाच गृहमंत्रीभाजपाचे सरकार दिल्लीत आल्यानंतर त्यांनी त्यांची चुणूक दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात मोदींचे सरकार काय दिवे लावणार, हे दिसते आहे. राज्यात पुन्हा आघाडीचीच सत्ता येणार आहे. त्यावेळी राज्याचे गृहमंत्रीपद काँग्रेस घेणार आहे. त्याशिवाय राज्यातील गुन्हे कमी होणार नाहीत, असे सांगून दलवाई यांनी पुन्हा एकदा आबांवर हल्लाबोल केला.