शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

कंत्राटी पद्धतीचा निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी खेददायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:33 IST

खेळाच्या, चित्रकलेच्या शिक्षकांना तासांवर भत्ता द्यायचा. त्यानंतर आता शिपाई पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला ...

खेळाच्या, चित्रकलेच्या शिक्षकांना तासांवर भत्ता द्यायचा. त्यानंतर आता शिपाई पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारने शिक्षण क्षेत्रातील घेतलेले निर्णय हे शिक्षणाचे बाजारीकरण करणारे आहेत. राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न अजूनही कायम आहेत. सरकार ते सोडविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेत नसून, केवळ त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा दिखावा करते आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा नाही. त्यांना तुरळक भत्ता द्यायचा. ही शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत खेदजनक बाब आहे. शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिपाई पदे भरण्याच्या निर्णयाचा शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, आमदार विक्रम काळे यांनी निषेध केला आहे.

शिपाई पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला. उद्या असाच निर्णय हे सरकार शिक्षकांबाबतही घेईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखेच खासगीकरणाचे निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकार शिक्षण क्षेत्राबाबत घेत आहे. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू असल्याचे दिसते. शिक्षण देणे हे सरकारची जबाबदारी आहे. शिक्षण हा मूलभूत अधिकार असून, तो सर्वांनाच मिळाला पाहिजे. शिक्षण हे मोफतच मिळाले पाहिजे; परंतु सरकार शिक्षण क्षेत्रात घेत असलेल्या खासगीकरणाच्या निर्णयामुळे गोरगरीब, शेतकऱ्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे शिक्षणाबाबत राज्य सरकारने सकारात्मक धोरण ठेवावे.