शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी पद्धतीचा निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी खेददायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:33 IST

खेळाच्या, चित्रकलेच्या शिक्षकांना तासांवर भत्ता द्यायचा. त्यानंतर आता शिपाई पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला ...

खेळाच्या, चित्रकलेच्या शिक्षकांना तासांवर भत्ता द्यायचा. त्यानंतर आता शिपाई पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारने शिक्षण क्षेत्रातील घेतलेले निर्णय हे शिक्षणाचे बाजारीकरण करणारे आहेत. राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न अजूनही कायम आहेत. सरकार ते सोडविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेत नसून, केवळ त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा दिखावा करते आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा नाही. त्यांना तुरळक भत्ता द्यायचा. ही शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत खेदजनक बाब आहे. शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिपाई पदे भरण्याच्या निर्णयाचा शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, आमदार विक्रम काळे यांनी निषेध केला आहे.

शिपाई पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला. उद्या असाच निर्णय हे सरकार शिक्षकांबाबतही घेईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखेच खासगीकरणाचे निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकार शिक्षण क्षेत्राबाबत घेत आहे. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू असल्याचे दिसते. शिक्षण देणे हे सरकारची जबाबदारी आहे. शिक्षण हा मूलभूत अधिकार असून, तो सर्वांनाच मिळाला पाहिजे. शिक्षण हे मोफतच मिळाले पाहिजे; परंतु सरकार शिक्षण क्षेत्रात घेत असलेल्या खासगीकरणाच्या निर्णयामुळे गोरगरीब, शेतकऱ्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे शिक्षणाबाबत राज्य सरकारने सकारात्मक धोरण ठेवावे.