शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

दारणा-गंगापूरचे पाणी जायकवाडीला सोडू नये

By admin | Updated: February 3, 2024 11:04 IST

कोपरगाव : नाशिक-नगर विरूद्ध मराठवाड्याच्या पाटपाण्याच्या भांडणात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संजीवनी साखर कारखान्याने दारणा, गंगापूर धरणातील पाणी मराठवाड्यास न सोडता

 कोपरगाव : नाशिक-नगर विरूद्ध मराठवाड्याच्या पाटपाण्याच्या भांडणात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संजीवनी साखर कारखान्याने दारणा, गंगापूर धरणातील पाणी मराठवाड्यास न सोडता येथील शेतीसाठी मिळालेच पाहिजे, असे म्हणणे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर दाखल केल्याची माहिती अ‍ॅड़ प्रमोद पाटील व अ‍ॅड़ व्ही़ एम़ थोरात यांनी दिली़ मुंबई उच्च न्यायालयात पाटपाण्याचा तंटा सुरू असून न्यायमूर्ती मोहित शहा व संकलेचा यांनी दि़ ५ मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान जलसंपत्ती प्राधिकरणाने न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकांचा विचार न करता आ़ प्रशांत बंब व वाय़ आऱ जाधव यांनी दाखल केलेल्या मागण्यांसदर्भात दि़ ३१ आॅगस्ट २०१४ पूर्वी निर्णय घ्यावा व या संदर्भात दाखल झालेल्या एक ते नऊ याचिकाकर्ते यांनी त्यांचे म्हणणे दोन पानांत प्राधिकरणासमोर सादर करावे, त्या प्रमाणे संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वतीने म्हणणे मांडण्यात आले़ महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणासमोर आता ४ जून रोजी सुनावणी होणार आहे़ तत्पूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या सर्व याचिकांची थेट ११ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे़ संजीवनी कारखान्याच्या वतीने पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने एकीकडे समन्यायी पाणी वाटपाबाबत नियम १२ (६) (क) प्रत्यक्षात वर्केबल नाही, असे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे लिहून दिले आहे़ तर नियम १ च्या १६ (अ) प्रमाणे विभागवार पाणी वाटपाचे सूत्र ठरलेले नाही़ असेही म्हटले आहे़ गोदावरी कालव्यावरील बारमाही ब्लॉकधारक शेतकर्‍यांना हक्काचे पाणी न मिळाल्यामुळे फळबागांचे ११३४, तर ऊस पिकांचे ३०० कोटी असे एकूण १४३४ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे़ जायकवाडीत सध्या ११ टिएमसी जीवंत पाण्याचा साठा उपलब्ध आहे़ दारणा, गंगापूर धरणांमधून नदीपात्रातून मराठवाड्यासाठी सोडले जाणारे पाणी उन्हाळयाची तीव्रता, पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही़ मग पाणी सोडण्याचा खटाटोप कशासाठी, असेही संजीवनीने म्हटले आहे़ नगर-नाशिक विरूद्ध मराठवाडा पाटपाण्यासंदर्भात सध्या मुंबई उच्च न्यायालयात नऊ जनहित याचिका, तर १७ हस्तक्षेप अर्ज दाखल झालेले आहेत़ (प्रतिनिधी)