शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दारणा-गंगापूरचे पाणी जायकवाडीला सोडू नये

By admin | Updated: February 3, 2024 11:04 IST

कोपरगाव : नाशिक-नगर विरूद्ध मराठवाड्याच्या पाटपाण्याच्या भांडणात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संजीवनी साखर कारखान्याने दारणा, गंगापूर धरणातील पाणी मराठवाड्यास न सोडता

 कोपरगाव : नाशिक-नगर विरूद्ध मराठवाड्याच्या पाटपाण्याच्या भांडणात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संजीवनी साखर कारखान्याने दारणा, गंगापूर धरणातील पाणी मराठवाड्यास न सोडता येथील शेतीसाठी मिळालेच पाहिजे, असे म्हणणे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर दाखल केल्याची माहिती अ‍ॅड़ प्रमोद पाटील व अ‍ॅड़ व्ही़ एम़ थोरात यांनी दिली़ मुंबई उच्च न्यायालयात पाटपाण्याचा तंटा सुरू असून न्यायमूर्ती मोहित शहा व संकलेचा यांनी दि़ ५ मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान जलसंपत्ती प्राधिकरणाने न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकांचा विचार न करता आ़ प्रशांत बंब व वाय़ आऱ जाधव यांनी दाखल केलेल्या मागण्यांसदर्भात दि़ ३१ आॅगस्ट २०१४ पूर्वी निर्णय घ्यावा व या संदर्भात दाखल झालेल्या एक ते नऊ याचिकाकर्ते यांनी त्यांचे म्हणणे दोन पानांत प्राधिकरणासमोर सादर करावे, त्या प्रमाणे संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वतीने म्हणणे मांडण्यात आले़ महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणासमोर आता ४ जून रोजी सुनावणी होणार आहे़ तत्पूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या सर्व याचिकांची थेट ११ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे़ संजीवनी कारखान्याच्या वतीने पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने एकीकडे समन्यायी पाणी वाटपाबाबत नियम १२ (६) (क) प्रत्यक्षात वर्केबल नाही, असे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे लिहून दिले आहे़ तर नियम १ च्या १६ (अ) प्रमाणे विभागवार पाणी वाटपाचे सूत्र ठरलेले नाही़ असेही म्हटले आहे़ गोदावरी कालव्यावरील बारमाही ब्लॉकधारक शेतकर्‍यांना हक्काचे पाणी न मिळाल्यामुळे फळबागांचे ११३४, तर ऊस पिकांचे ३०० कोटी असे एकूण १४३४ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे़ जायकवाडीत सध्या ११ टिएमसी जीवंत पाण्याचा साठा उपलब्ध आहे़ दारणा, गंगापूर धरणांमधून नदीपात्रातून मराठवाड्यासाठी सोडले जाणारे पाणी उन्हाळयाची तीव्रता, पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही़ मग पाणी सोडण्याचा खटाटोप कशासाठी, असेही संजीवनीने म्हटले आहे़ नगर-नाशिक विरूद्ध मराठवाडा पाटपाण्यासंदर्भात सध्या मुंबई उच्च न्यायालयात नऊ जनहित याचिका, तर १७ हस्तक्षेप अर्ज दाखल झालेले आहेत़ (प्रतिनिधी)