शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

आवर्तनात पिकांबरोबरच बंधारे ही भरून द्यावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:34 IST

कोपरगाव : गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याला पाणी सुटून आज वीस दिवस उलटून गेले आहे. तरी देखील पाटबंधारे विभागाकडून ...

कोपरगाव : गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याला पाणी सुटून आज वीस दिवस उलटून गेले आहे. तरी देखील पाटबंधारे विभागाकडून कोपरगाव तालुक्यातील चाऱ्या अजूनपर्यंत सुटलेल्या नाहीत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तातडीने तालुक्यातील सर्व चाऱ्या सोडून पिकांबरोबरच बंधारे व गावतळे ही भरून द्यावीत, अशी मागणी शिवसेना नेते नितीन औताडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

औताडे म्हणाले, चालू वर्षी पर्जन्यमान चांगले झाले. धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस चांगला होऊन सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरले आहे. उन्हाळी आवर्तन वेळेत मिळायला हवे होते. मात्र, ते उशिरा मिळाले आहे. वीस दिवसांपासून गोदावरी कालव्यांना पाणी चालू आहे. इंग्रज काळापासून आवर्तन सुटल्यानंतर टेलपर्यंत चितळीला पाणी गेल्यानंतर तालुक्यातील हरिसन ब्रँच व इतर चाऱ्या पाच दिवसानंतर सुटल्या जात. त्यामुळे पूर्वी शेतीला चांगले दिवस होते. आता मात्र, धरणात पाणी असून देखील केवळ नियोजन बिघडल्यामुळे शेतीला पाणी कधी मिळेल याची शाश्वती राहिली नाही, त्यामुळे शेती बेभरवशाची झाली आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने उभी केलेली चालू वर्षाची उन्हाळी पिके ऊस, चारापिके ,फळबाग आदी पिके तीव्र उन्हामुळे आज कोमेजून गेलेली आहेत. आठ दिवसांपूर्वीच या पिकांना पाणी मिळणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नाही. आता पाटबंधारे विभागाने कोणताही विलंब न करता ताबडतोब तालुक्यातील चाऱ्या सोडून पिकांना पाणी द्यावे. पाणी साठा भरपूर असतानाही पाणी मिळण्यास दिरंगाई होत आहे. याला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार आहे.