शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीच्या आवर्तनाऐवजी भरणार पुणे जिल्ह्यातील बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:21 IST

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पाच्या येडगाव धरणातून फेब्रुवारी महिन्यात एक आवर्तन सोडण्यात आले. दुसरे आवर्तन सोडण्यासाठी डिंबे धरणातून येडगाव धरणात ...

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पाच्या येडगाव धरणातून फेब्रुवारी महिन्यात एक आवर्तन सोडण्यात आले. दुसरे आवर्तन सोडण्यासाठी डिंबे धरणातून येडगाव धरणात पाणी सुरू ठेवण्याऐवजी पुणे जिल्ह्यातील बंधारे भरण्यासाठी डिंभेतून घोड नदीत पाणी सोडण्याच्या हालचाली अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ पातळीवर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नगर, सोलापूर जिल्ह्याला दुसरे आवर्तन मिळणे कठीण जाणार आहे.

१ एप्रिल रोजी येडगाव धरणात ६५७ एमसीएफटी, माणिकडोह धरणात ९५३ एमसीएफटी, वडज ६४० एमसीएफटी, डिंभे ६ हजार ५४२ एमसीएफटी, कुकडीच्या धरणात ९ हजार १३८ एमसीएफटी (३१ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी यावेळी ४५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १४ टक्के पाणीसाठा कमी आहे. घोडमध्ये २ हजार ३४१ एमसीएफटी (५२ टक्के), विसापूरमध्ये ३८७ एमसीएफटी (४३ टक्के), तर सीनामध्ये १ हजार ३७१ एमसीएफटी (७१ टक्के) इतका पाणीसाठा आहे.

कुकडीचे पहिले आवर्तन १३ मार्च रोजी बंद झाले. डिंभे धरणातील उपलब्ध पाणीसाठा व येडगाव धरणाची परिस्थिती विचारात घेता डिंभेतून १३ मार्चपासून येडगावमध्ये पाणी सोडणे आवश्यक होते. १३ एप्रिलअखेर येडगावमध्ये १ टीएमसी पाणी आले असते. हे पाणी कुकडीचे दुसरे आवर्तन सोडण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरले असते. मात्र, याकडे कोणीच लक्ष दिले नाही. आता बैल गेला आणि झोपा केला, अशी अवस्था झाली आहे.

९ एप्रिल रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील पुण्यात कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला जाईल आणि धरणात पुरेसा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नसल्याने शेतीसाठी आवर्तन सोडता येणार नाही, असा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अहवाल घेऊन तयारी करावी व २५ मे नंतर पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे, असा निर्णय होण्याची शक्यता आहे. कुकडीचे दुसरे आवर्तन एप्रिलमध्ये सोडण्यासाठी डिंभेचे पाणी येडगाव धरणात सुरू का ठेवले नाही याबाबत लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची गरज आहे.

---

पिंपळगाव जोगेचे पाणी ठरणार कळीचा मुद्दा..

यावर्षी पिंपळगाव जोगे धरण १ हजार ८८७ एमसीएफटी (४८ टक्के) भरले. पिंपळगाव जोगेच्या डेड स्टाॅकमधून येडगाव धरणात पाणी सोडता येते. मात्र, याला स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकरी विरोध करतील. आता पिंपळगाव जोगेच्या पाण्याशिवाय कुकडीचे पाण्याचे आवर्तन सोडणे शक्य नाही. त्यामुळे पिंपळगाव जोगेतील पाणी कळीचा मुद्दा ठरणार आहे.