शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

सरंपच आरक्षणाबाबत उत्सुकता ताणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:19 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील सरपंचपदासाठी २७ आणि २८ तारखेला तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ही आरक्षण सोडत प्रांताधिकाऱ्यांच्या ...

अहमदनगर : जिल्ह्यातील सरपंचपदासाठी २७ आणि २८ तारखेला तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ही आरक्षण सोडत प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आरक्षण काढताना १९९५ पासूनचे रोटेशन तपासले जाणार आहे. त्यामुळे नेमका कोण सरपंच होणार याची उत्सुकता ताणली आहे.

जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर ९ ग्रामपंचायतींमध्ये काही जागा बिनविरोध, तर काही जागा रिक्त आहेत. त्यामुळे ७०५ ग्रामपंचायतींच्या ५,७८८ जागांसाठी मतदान झाले. १५ जानेवारीला मतदान झाले आणि १८ जानेवारीला निकाल लागला. त्यामुळे निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात यावी, असा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र, निवडून आलेल्या सर्वच सदस्यांनी आपापल्या नेत्यांकडे, राजकीय पक्षांकडे आरक्षण सोडतीसाठी आग्रह धरला आहे. नेत्यांनी ही बाब ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कानावर घातली. त्यानंतर मुश्रीफ यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आठ दिवसात सरपंच आरक्षण सोडत काढावी, अशा सूचना दिल्या. मात्र, लेखी आदेश नसल्याने जिल्हा प्रशासनाचे नियोजन अद्याप सुरू आहे. जिल्हा प्रशासनातील ग्रामपंचायत शाखेने २७ आणि २८ तारखेला आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम तयार केला आहे. तो मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. त्यांची मान्यता मिळताच तो कार्यक्रम जाहीर होणार आहे.

----------

तहसील कार्यालयात होणार सोडत

संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदारांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात ही सोडत काढण्यात येणार आहे. संबंधित गावातील १९९५पासूनचे सरपंचपदाचे आरक्षण ग्राह्य धरले जाणार आहे. त्यासाठी सर्व तहसीलदारांनी १९९५ पासूनची माहिती संकलित केली आहे. त्यामुळे त्या पंचवार्षिकपासून रोटेशनपद्धतीनुसार आरक्षण कार्यक्रम तयार करण्यात प्रांताधिकारी आणि तहसीलदार व्यस्त आहेत. आरक्षण सोडतीबाबतची सर्व भीस्त तहसीदारांवरच राहणार आहे.

--------------

...तर ‘तो’ सदस्यही होऊ शकतो सरपंच

एका ग्रामपंचायतीमध्ये ७ जागा आहेत. एका गटाला ४ जागा आणि दुसऱ्या गटाला ३ जागा मिळालेल्या असतील तर ३ सदस्य निवडून आलेल्या गटातील सदस्यही सरपंच होऊ शकतो. सोडत निघालेल्या कॉटेगिरीचा सदस्य नसला तर बहुमत असलेल्या गटाला सत्ता मिळणार नाही. बहुमत कोणाला मिळाले हे पाहून आरक्षण सोडत काढली जात नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

---------

फाईल फोटो- २१ सरपंच