शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

सरंपच आरक्षणाबाबत उत्सुकता ताणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:19 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील सरपंचपदासाठी २७ आणि २८ तारखेला तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ही आरक्षण सोडत प्रांताधिकाऱ्यांच्या ...

अहमदनगर : जिल्ह्यातील सरपंचपदासाठी २७ आणि २८ तारखेला तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ही आरक्षण सोडत प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आरक्षण काढताना १९९५ पासूनचे रोटेशन तपासले जाणार आहे. त्यामुळे नेमका कोण सरपंच होणार याची उत्सुकता ताणली आहे.

जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर ९ ग्रामपंचायतींमध्ये काही जागा बिनविरोध, तर काही जागा रिक्त आहेत. त्यामुळे ७०५ ग्रामपंचायतींच्या ५,७८८ जागांसाठी मतदान झाले. १५ जानेवारीला मतदान झाले आणि १८ जानेवारीला निकाल लागला. त्यामुळे निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात यावी, असा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र, निवडून आलेल्या सर्वच सदस्यांनी आपापल्या नेत्यांकडे, राजकीय पक्षांकडे आरक्षण सोडतीसाठी आग्रह धरला आहे. नेत्यांनी ही बाब ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कानावर घातली. त्यानंतर मुश्रीफ यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आठ दिवसात सरपंच आरक्षण सोडत काढावी, अशा सूचना दिल्या. मात्र, लेखी आदेश नसल्याने जिल्हा प्रशासनाचे नियोजन अद्याप सुरू आहे. जिल्हा प्रशासनातील ग्रामपंचायत शाखेने २७ आणि २८ तारखेला आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम तयार केला आहे. तो मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. त्यांची मान्यता मिळताच तो कार्यक्रम जाहीर होणार आहे.

----------

तहसील कार्यालयात होणार सोडत

संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदारांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात ही सोडत काढण्यात येणार आहे. संबंधित गावातील १९९५पासूनचे सरपंचपदाचे आरक्षण ग्राह्य धरले जाणार आहे. त्यासाठी सर्व तहसीलदारांनी १९९५ पासूनची माहिती संकलित केली आहे. त्यामुळे त्या पंचवार्षिकपासून रोटेशनपद्धतीनुसार आरक्षण कार्यक्रम तयार करण्यात प्रांताधिकारी आणि तहसीलदार व्यस्त आहेत. आरक्षण सोडतीबाबतची सर्व भीस्त तहसीदारांवरच राहणार आहे.

--------------

...तर ‘तो’ सदस्यही होऊ शकतो सरपंच

एका ग्रामपंचायतीमध्ये ७ जागा आहेत. एका गटाला ४ जागा आणि दुसऱ्या गटाला ३ जागा मिळालेल्या असतील तर ३ सदस्य निवडून आलेल्या गटातील सदस्यही सरपंच होऊ शकतो. सोडत निघालेल्या कॉटेगिरीचा सदस्य नसला तर बहुमत असलेल्या गटाला सत्ता मिळणार नाही. बहुमत कोणाला मिळाले हे पाहून आरक्षण सोडत काढली जात नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

---------

फाईल फोटो- २१ सरपंच