शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
4
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
5
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
6
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
7
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
8
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
9
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
10
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
11
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
12
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
13
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
14
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
15
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
16
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
17
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
18
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
19
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
20
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!

काकस्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:54 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘प्रसंगा असता लिहिले’ या सदरात अॅड. सुशील अत्रे यांचा विशेष लेख.

पितृपक्ष सुरू झाला आहे हे कसे ओळखावे? अलिकडे हे अगदी सोपं झालंय. फेसबुकवर आणि व्हॉटस्अॅपवर कावळ्यांचे फोटो आणि त्यासोबत टिंगलवजा शुभेच्छा दिसायला लागल्या की समजावं, पितृपक्ष सुरू झाला. कोणत्याही धार्मिक रुढीची (विशेषत: हिंदू) टिंगल करणं ही आपल्या देशात सगळ्यात सोपी गोष्ट आहे. गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकण्याइतकीच सोपी! त्याला अक्कलही लागत नाही किंवा जबाबदारीची जाणीवही लागत नाही. त्यामुळे पितृपक्ष किंवा श्राद्ध म्हणजे नक्की काय? ते कशासाठी? त्यामागची भावना काय असते, आणि हा ‘बावळटपणा’ फक्त हिंदू धर्मातच आहे का? असल्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधत नसतो. जे चाललंय ते चाललंय - बस ! पितृपक्ष अथवा ‘महालयकाल’ किंवा ग्रामीण बोलीत ‘पित्तरपाटा’ म्हणजे भाद्रपद वद्य पक्ष. या काळात आपल्या कुटुंबातील किंवा कुळातील दिवंगत पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहतात. ‘श्राद्ध’ या शब्दाचा अर्थच मुळी, ‘श्रद्धेने केलेले कर्म’ असा आहे. ‘श्रद्धया क्रियते इति श्राद्धम्’ ! ती एक प्रकारची कृतज्ञतेची भावना आहे. ‘जो शहीद हुवे है उनकी, जरा याद करो कुर्बानी.. या ओळींमागे जी भावना आहे तीच भावना श्राद्ध विधींच्या मागे आहे. जे देशासाठी शहीद होतात त्यांची आठवण सगळ्या देशाने ठेवली पाहिजे. पण ज्यांनी आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी कष्ट उपसले, आयुष्य वेचलं, त्यांची आठवण आपल्या कुटुंबाने ठेवणं अपेक्षित नाही का? तेच श्राद्धात केलं जातं. त्यासाठीच पितृपक्ष हा स्वतंत्र कालावधी राखून ठेवलाय. त्यामुळे पितृपक्षाची टिंगल करण्यापूर्वी ही भावना लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि हे माहिती असूनही एखाद्याला काहीही करण्याची इच्छा नसेल, तर नका करू. शेवटी कृतज्ञता ही एक जबाबदारीची भावना आहे. ती अजिबात नसलेले कित्येक महाभाग समाजात असतातच. त्यात आश्चर्य कसलं? पण गौरी लंकेशच्या मृत्यूनंतर हातात मेणबत्त्या घेऊन शपथा घेणारे दीडशहाणे इतरांनी केलेल्या श्राद्धाला फिदीफिदी हसतात, याचं नवलं वाटतं! काय फरक आहे दोघांमध्ये? दोघेही आपापल्या भावना व्यक्त करताहेत, फक्त वेगळ्या पद्धतीने करताहेत इतकंच. शेवटी मेणबत्ती हे ही कशाचं तरी प्रतीक आहे आणि भाताचा पिंड हेही कशाचं तरी प्रतीकच आहे. खरं तर श्राद्धामागची किंवा पितृपक्षा मागची मूळ भावना किती उदात्त आहे आणि आंधळी, एकांगी टीका करणा:यांनी जरा माहिती घेतली तर लक्षात येईल की ही भावना अगदी सार्वत्रिक, सर्वधर्मीय अशी आहे. जवळपास प्रत्येक धर्माच्या किंवा उपासना पद्धतीच्या परंपरेत या भावनेला स्थान आहेच. मूळात आपल्याकडे श्राद्ध ही कल्पना लवचिक आहे. ते अमूकच प्रकारे केलं पाहिजे, याला मूळात बंधन नव्हतं. ती बंधनं, ते कर्मकांड आलं ते परंपरेने. ऋग्वेदात ‘पितरां’चा उल्लेख आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता आहे. पण श्राद्धविधीचा कोणताही उल्लेख नाही. ते विधी आले स्मृती आणि पुराणांमधून. त्यातही पिढय़ा, दर पिढय़ा भर पडत गेली. विधी वाढत गेले. त्यांची चिकित्सा फारच थोडय़ा जणांनी केली. परिणामी मूळ कृतज्ञतेची भावना बाजूला पडली आणि अवडंबरामुळे टीकाच वाटय़ाला आली. पारशी लोकांच्या कॅलेंडरमध्ये ‘शेनशाई’ कॅलेंडरमध्ये वर्षाचा शेवटचा महिना असतो ‘अस्पंदाद’चा महिना. या महिन्याच्या शेवटचे पाच दिवस आणि वर्षाअखेरी असलेले जादा पाच दिवस. ज्यांना ‘गाथा’ म्हणतात. असे 10 दिवस मयत पूर्वजांचे स्मरण करुन त्यांना फळे, फुले वाहतात. मुसलमानांच्या हिजरी कॅलेंडरमधला आठवा महिना आहे ‘शाबान’ चा महिना. या महिन्यातील पंधरावी रात्र ही हिशोबांची रात्र (लयलात् अल् बारात) मानली जाते. त्यासाठी चौदाव्या दिवशी मृत पूर्वजांचे स्मरण करून दानधर्म करतात. ािश्चनांमध्ये प्रोटेस्टंट तर नाही, पण कॅथोलिक ख्रिश्चनसुद्धा ठराविक तारखेला चर्चामध्ये जाऊन मयत पूर्वजांसाठी प्रार्थना करतात. एक लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे सगळीकडेच हे पूर्वज स्मरण बहुदा वर्षाच्या शेवटी केलं जातं. म्हणजे बघा- प्राचीन काळी हिंदू वर्ष अश्विन महिन्यापासून सुरू होत असे. पारशांचे नववर्ष ‘फरवर्दिन’ महिन्यापासून सुरू होतं. मुसलमानांचा पहिला महत्त्वाचा महिना ‘रमझान’ आहे. या तिन्ही महिन्यांच्या आधीचा महिना हा पूर्वजांच्या पूजेसाठी आहे केवढं साम्य. असं मानतात, की कावळा एकाक्ष असल्याने तो कोणतीही गोष्ट आधी तिरकी मान करून दोन्ही बाजूने नीट निरखून घेतो. कोणत्याही धार्मिक परंपरेला, रुढीला अलिकडच्या बुद्धिवंत कावळ्यांनी असं आधी निरखून बघितलं, तर जास्त बरं होईल. निदान येता-जाता चोचीने टोचा मारणं तरी कमी होईल.