शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

शिर्डी विमानतळावरून काकडी ग्रामस्थ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 15:50 IST

शिर्डी विमानतळास जागा दिलेल्या काकडी ग्रामस्थांनाच विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी प्रवेश नाकारून अपमानास्पद वागणूक दिल्याने काकडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यामुळे याबाबत पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी १२ आॅक्टोबरला ग्रामसभाच बोलाविण्यात आली आहे.

ठळक मुद्देउद्घाटनप्रसंगी प्रवेश नाकारून अपमानास्पद वागणूक१२ आॅक्टोबरला विशेष ग्रामसभा

उद्घाटनाला डावलले : १२ आॅक्टोबरला विशेष ग्रामसभाअस्तगाव : शिर्डी विमानतळास जागा दिलेल्या काकडी ग्रामस्थांनाच विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी प्रवेश नाकारून अपमानास्पद वागणूक दिल्याने काकडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यामुळे याबाबत पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी १२ आॅक्टोबरला ग्रामसभाच बोलाविण्यात आली आहे.२ आॅक्टोबरची विशेष ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करून ४ आॅक्टोबरला ही सभा ठेवण्यात आली होती. पण ४ तारखेस फक्त औपचारिक चर्चा करून १२ आॅक्टोबरला सकाळी ९ वाजता विशेष ग्रामसभा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला.काकडी गावातील ग्रामस्थांनी जमीन देऊन एवढे मोठे योगदान दिले असतानाही उद्घाटनस्थळी ग्रामस्थांनाच प्रवेश नाकारण्यात आला. उलट त्यावेळी ग्रामस्थांना घराबाहेर पडण्यास पोलिसांनी प्रतिबंध केला. या अपमानास्पद वागणुकीमुळे काकडी ग्रामस्थ संतापले आहेत. याशिवाय काकडी गावातील अनेक प्रकल्पग्रस्तांना सरकारने शब्द दिल्याप्रमाणे अजून नोकºया दिलेल्या नाहीत. जमिनीचा योग्य मोबदला नाही. तसेच सध्या विमानतळावर काकडी ग्रामस्थांना येऊ दिले जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जमीन अधिग्रहणाचे काम सुरू असताना सरकारकडून गावासाठी अनेक आश्वासने देण्यात आली. पण त्याची पूर्तता झाली नाही. या बाबींच्या पाठपुराव्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. विमानतळात ज्या ज्या ग्रामस्थांना नोकरी दिली आहे, त्यांना विमानतळ प्राधिकरण केव्हाही काढू शकते. त्यामुळे जे तेथे नोकरीस लागले आहेत, त्यांनीसुद्धा ग्रामसभेला यावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.तेराशे एकर शेतजमीन विमानतळास दिलीगाव एकत्र नसल्याचा फायदा विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे. प्राधिकरण काकडी ग्रामस्थांना जर विमानतळावर येऊ देत नसेल तर त्यांनासुद्धा आमच्या ग्रामपंचायत हद्दीतून जाण्याचा अधिकार नाही. काकडी गावातील जवळपास १३०० एकर शेतजमीन विमानतळात गेलेली आहे. पण सरकारला आमच्या योगदानाची जाणीव नाही. त्यामुळे आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.